शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

चोपडा व जळगाव तालुक्यांतून येणारी वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांतून शहराकडे येणाऱ्या शनिपेठ व सुरत रेल्वेगेट या दोन्ही प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांतून शहराकडे येणाऱ्या शनिपेठ व सुरत रेल्वेगेट या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर मंगळवारी सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. सुरत रेल्वेगेटवर सकाळी ११ वाजता, तर शनिपेठ भागातील रस्त्यावर दुपारी १ वाजेच्या सुमारास ही वाहतूक कोंडी झाली. चोपडा व जळगाव तालुक्यांतून शहरात येण्यासाठी हेच दोन मार्ग आहेत. मात्र, या दोन्ही रस्त्यांवर सातत्याने कोंडी होत असल्याने आता शहरात प्रवेश करणेदेखील कठीण झाले आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या नवीन बांधकामासाठी हा पृूल बंद करण्यात आल्यापासून चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांतून येणाऱ्या वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. आता हा पूल बंद होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व वाहतुकीचा भार या दोन्ही रस्त्यावर आहे.

बेशिस्त वाहनधारकांमुळे चक्का जाम

सुरत रेल्वेगेटजवळ एकामागून एक रेल्वे गाड्या गेल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. गेट उघडल्यानंतर रेल्वे मालधक्क्याकडून, निमखेडी व शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांनी एकाच वेळी रेल्वेगेट ओलांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांचा मार्ग मालधक्क्याकडून येणाऱ्या वाहनधारकांनी रोखल्यामुळे शिवाजीनगरकडील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे खोळंबली, त्यातच बेशिस्त रिक्षाचालक व काही मोटारसायकलस्वारांनी विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू केल्यामुळे निमखेडी रस्त्याकडून येणारी वाहतूकदेखील खोळंबली. सुमारे अर्धातास सर्वच वाहने एकाच जागेवर थांबली होती.

वाळूचे डंपर फसल्याने वाहतूक कोंडी

शनिपेठकडून ममुराबाद रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतदेखील मंगळवारी पुन्हा वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी १ वाजता वाळूचे डंपर अमृतच्या कामामुळे खोदलेल्या खड्ड्यात फसले, यामुळे मागील येणारी वाहतूकदेखील खोळंबली. डंपर काढता येत नसल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात अनेक अवजड वाहनेदेखील दाखल झाल्याने ही कोंडी आणखीच वाढत गेली.

वाहनधारकांनीच पार पाडली वाहतूक पोलिसांची भूमिका

सुमारे तासभर संपूर्णपणे वाहतूक खोळंबल्यामुळे काही वाहनधारकांनीच आपली वाहने बाजूला उभी करून, स्वत:च वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका वाहतूक पोलिसाने देखील पुढाकार घेत, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवजड वाहनांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास चांगल्याच अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, दोन्हीही ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ही कोंडी वाढतच जाते.