शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

जळगावातील प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे ‘तोरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट झाली असून, आता शहरातील असा ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट झाली असून, आता शहरातील असा एकही रस्ता नाही की, ज्या रस्त्यावर खड्डे आणि चिखल नाही. आता जळगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनधारकांचे स्वागत खड्डे व चिखलाने भरलेल्या रस्त्यांनी होत असून, ही परिस्थिती आता केव्हा बदलेल, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान, शहरात कोणत्याही मार्गाने प्रवेश करा, वाहनधारकांना खराब रस्त्यांचाच सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता असो वा राज्य शासनाच्या अखत्यारित येणारा रस्ता किंवा मग महापालिकेच्या हद्दीतील रस्ता असो, सर्वच रस्त्यांची स्थिती अतिशय विदारक आहे. जीवघेणे खड्डे, चिखल आणि धुळीचा सामना करूनच जळगावात प्रवेश मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ भाग असो वा उपनगरातील भाग, सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांची स्थिती देखील काही वेगळी नाही.

या रस्त्यांची केली पाहणी

१. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरात विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली असता, सर्वच भागांकडून शहरात येणाऱ्या रस्त्यांची स्थिती एकसारखीच असल्याचे आढळून आले.

२. कानळदा, ममुराबाद व आसोदा या भागांकडून शहरात येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर चिखल पसरलेला होता. कानळदा रस्त्यालगतची स्थिती ही अनेक वर्षांपासून कायम असून, रस्ता दुरुस्त कोण करणार, असा प्रश्न याठिकाणी अनेक वर्षांपासून कायम आहे.

३. शिरसोली, पाचोऱ्याकडून येणाऱ्या रस्त्यालगतदेखील अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम झालेले नाही. गायत्री नगर ते शिरसोली नाका, यादरम्यानच्या रस्त्याची स्थिती तर वाईट आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची काही महिन्यांपूर्वीच दुरुस्ती केली होती.

४. राष्ट्रीय महामार्गावरून बांभोरीकडून येतानाही महामार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बांभोरी पुलापासून खोटेनगर स्टॉपपर्यंत खड्डेच-खड्डे आहेत.

५. भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यालगतची परिस्थिती काही वेगळी नाही. डॉ. उल्हास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढील परिस्थितीही वाहनधारकांची परीक्षा घेणारीच आहे.

मुख्य भागात अमृतची कामे, इतर भागांतील खड्डे कशामुळे?

मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या प्रश्नावर नेहमी अमृतच्या कामांना दोष दिला जात आहे. ज्या भागात अमृत अंतर्गत भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्या रस्त्यांची स्थिती तर खराब आहे. मात्र, अनेक भागात अमृत अंतर्गत कामे झाली नसताना देखील रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे कारण मात्र मनपाकडून सांगितले जात आहे. मात्र, मनपाकडून प्रत्येक खराब असलेल्या रस्त्याचे खापर अमृत योजनेवर फोडले जात आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.