शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

जळगावातील प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे ‘तोरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट झाली असून, आता शहरातील असा ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट झाली असून, आता शहरातील असा एकही रस्ता नाही की, ज्या रस्त्यावर खड्डे आणि चिखल नाही. आता जळगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनधारकांचे स्वागत खड्डे व चिखलाने भरलेल्या रस्त्यांनी होत असून, ही परिस्थिती आता केव्हा बदलेल, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान, शहरात कोणत्याही मार्गाने प्रवेश करा, वाहनधारकांना खराब रस्त्यांचाच सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता असो वा राज्य शासनाच्या अखत्यारित येणारा रस्ता किंवा मग महापालिकेच्या हद्दीतील रस्ता असो, सर्वच रस्त्यांची स्थिती अतिशय विदारक आहे. जीवघेणे खड्डे, चिखल आणि धुळीचा सामना करूनच जळगावात प्रवेश मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ भाग असो वा उपनगरातील भाग, सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांची स्थिती देखील काही वेगळी नाही.

या रस्त्यांची केली पाहणी

१. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरात विविध भागांकडून येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली असता, सर्वच भागांकडून शहरात येणाऱ्या रस्त्यांची स्थिती एकसारखीच असल्याचे आढळून आले.

२. कानळदा, ममुराबाद व आसोदा या भागांकडून शहरात येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर चिखल पसरलेला होता. कानळदा रस्त्यालगतची स्थिती ही अनेक वर्षांपासून कायम असून, रस्ता दुरुस्त कोण करणार, असा प्रश्न याठिकाणी अनेक वर्षांपासून कायम आहे.

३. शिरसोली, पाचोऱ्याकडून येणाऱ्या रस्त्यालगतदेखील अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम झालेले नाही. गायत्री नगर ते शिरसोली नाका, यादरम्यानच्या रस्त्याची स्थिती तर वाईट आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची काही महिन्यांपूर्वीच दुरुस्ती केली होती.

४. राष्ट्रीय महामार्गावरून बांभोरीकडून येतानाही महामार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बांभोरी पुलापासून खोटेनगर स्टॉपपर्यंत खड्डेच-खड्डे आहेत.

५. भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यालगतची परिस्थिती काही वेगळी नाही. डॉ. उल्हास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढील परिस्थितीही वाहनधारकांची परीक्षा घेणारीच आहे.

मुख्य भागात अमृतची कामे, इतर भागांतील खड्डे कशामुळे?

मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या प्रश्नावर नेहमी अमृतच्या कामांना दोष दिला जात आहे. ज्या भागात अमृत अंतर्गत भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्या रस्त्यांची स्थिती तर खराब आहे. मात्र, अनेक भागात अमृत अंतर्गत कामे झाली नसताना देखील रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे कारण मात्र मनपाकडून सांगितले जात आहे. मात्र, मनपाकडून प्रत्येक खराब असलेल्या रस्त्याचे खापर अमृत योजनेवर फोडले जात आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.