शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आजीचे शब्द ठरले प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:40 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कवयित्री शरयू खाचणे...

बालपणापासूनच खरं तर मला कवितांची खूप आवड होती. शाळेत कुठलीही मराठी हिंदी, इंग्रजी अगदी कुठलीही कविता शिकवली गेली की घरी येऊन तिला वेगवेगळ्या चालींवर म्हणून पहायचा जणू छंदच लागला होता मला. आणि मग सारखा विचार यायचा कविता तयार कशी होते? ते शब्द कसे सुचतात? ते यमक वगैरे तेव्हा कळत नव्हते. तरी तो ओळींचा समसमानपणा मनाला आवडायचा. मग मीही वेडेवाकडे प्रयत्न करून पहायचे पण नाही जमायचं.एक दिवस आजी गाणं गुणगुणत होती. मी विचारलं, तर ती म्हणाली, असंच आलं, म्हणाली, ‘आम्ही शेतात काम करता करता म्हनत त्याच्यानं कामाचा थकवा वाटेना आम्हाले.’ आजीला जात्यावरच्या ओव्याही छान येत होत्या.‘माही संगातीन चांगोनातिले सैपाक जमेना’अशा ओळी आजी म्हणून दाखवायची. मग मी नेहमी आजीजवळ बसून तिला ओव्या म्हणायला लावायचे.‘यक चिमनं पाखरूत्याचं इतुसं लेकरूदाना चोचमधी दबीसनपोट लेकराचं भरू’अशा काही ओव्या आजी ऐकवायची.मला अतिशय आवडायच्या त्या.मलाही वाटायचे की मी असंच लिहू शकेल का? आजी दोन चार ओळीच म्हणायची. त्याला अनुसरून मी आधी दोन ओळी लिहिल्या. त्याच गुणगुणत राहिले काही दिवस. आजीला ऐकवल्या आणि पहिलं बक्षीस चॉकलेटच्या स्वरूपात मिळालंआजी म्हटली, ‘गह्यरं मस्त गानं लिहिते वं माय माही नात’हे शब्द प्रेरणादायी ठरले.आजीच्या आनंदासाठी रोज तिला काही तरी ऐकवायला लागले.कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेताना हळूहळू कळू लागले कवितांचे प्रकार, त्यातले बारकावे.पुढे मी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. तरी कवितेशी नाळ मात्र घट्ट होती.करता करता एक डायरीत जवळपास ६०-७० कविता लिहिल्या. पण त्या फक्त डायरीतच होत्या. सासरी येताना मी ती डायरी सासरी घेऊन गेले आणि नकळत एक दिवस ती आमच्या अण्णांच्या हातात पडली आणि तिचं सोनं झालं. त्यांनी ती माझ्या नणंदबाई प्रा.संध्या महाजन यांच्याकडे पोहोचवली आणि त्यांनी पुस्तक रुपात मला अनोखी भेट दिली. अशाप्रकारे माझा पहिला काव्यसंग्रह ‘जीवन गाणे’ प्रकाशित झाला.‘जीवनगाणे’वरून मला प्रेरणा मिळाली आणि माझा दुसरा काव्यसंग्रह ‘मन... एक स्वच्छंदी पाखरु’ प्रकाशित झाला. काहीतरी वेगळं म्हणून मी त्याला वेगवेगळ्या चित्रकाव्याने सजविला. ग्राफिक्स आणि कॅलिग्राफीच्या साह्याने त्याला अधिक आकर्षक असे स्वरूप देऊन हा संग्रह काव्यरसिकांसाठी उपलब्ध करून दिला.-शरयू जीवन खाचणे

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव