शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

मृतदेहांची हेळसांड रोखण्यासाठी ‘गाव तिथे स्मशानभूमी’! सातबाऱ्यावर नोंद घेण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:39 IST

शासकीय जमीनींचा वापर करण्याचे आदेश

कुंदन पाटील

जळगाव : दुर्गम तसेच अतिदुर्गम भागासह जिल्ह्यात उघड्यावर अंत्यसंस्कार होत असल्याने मृतदेहाची हेळसांड होत आहे. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी  प्रत्येक गावातील स्मशानभूमीची सातबाऱ्यावर नोंद घेण्याचे आणि प्रत्येक गावात स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तसे आदेश काढले आहेत.

प्रत्येक गावातील शासकीय जमिनीवर स्मशानभूमीसाठी भूखंड आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र अनेक ठिकाणच्या स्मशानभूमींची सातबाऱ्यावर नोंदी घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे कुठल्या गावात स्मशानभूमी नाही, याची माहिती तातडीने उपलब्ध होत नाही. परिणामी तिथल्या ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार आटोपावे लागतात. तसेच दुर्गम भागातील मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा प्रकारही अनेकदा उघड झाला आहे. ही बाब अतिशय वेदनादायी आहे. म्हणून गावातील शासकीय भूखंडावर स्मशानभूमी उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुक्ताईनगर, अमळनेर मागे

जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्मशानभूमींची संख्या पुरेसी आहे. मात्र मुक्ताईनगर, अमळनेर व पारोळा तालुक्यात सर्वात कमी स्मशानभूमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. ८१ गावे असताना मुक्ताईनगरमध्ये ६३, १५४ गावे असताना अमळनेरमध्ये १३९ तर ११४ गावे असताना पारोळा तालुक्यात केवळ १०१ स्मशानभूमी आहेत.

तालुकानिहाय स्मशानभूमी असलेली गावे

तालुका-गावे-स्मशानभूमी

जळगाव-९२-७०जामनेर-१५५-१५०धरणगाव-८९-८२एरंडोल-६५-६१भुसावळ-५४-४१यावल-८४-८३रावेर-११७-११५मुक्ताईनगर-८१-६३बोदवड-५२-४९पाचोरा-१२९-१२३चाळीसगाव-१३७-१३२भडगाव-६३-६०अमळनेर-१५४-१३९पारोळा-११४-१०१चोपडा-११६-११६