शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

शेतकरी जीवनातील उत्सव तिफन नांदवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:58 IST

‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...

तिफन भरणे हे जसे कौशल्याचे काम तसेच तिफनवर पेरणी करणे हेसुद्धा कौशल्याचेच काम. तिफन हाकताना दोन तासांमधील अंतर वाढणार नाही (म्हणजे फट पडणार नाही) किंवा दोन तासांमधील अंतर कमी होणार नाही. (म्हणजे दोन तास मिळणर नाही) याची काळजी घ्यावी लागते. फट पडल्यास वा दोन तास मिळाल्यास आंतर मशागत नीट करता येत नाही. म्हणून तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत असणाऱ्या कमीच असतं. सर्वच शेतकरी, शेतमजुरांना तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत नसे. त्यामुळे ज्यांना हे कौशल्य अवगत आहे त्यांचा पेरणीच्या काळात भाव वधारलेला असे. इतर मजुरांच्या तुलनेत त्यांना दीड दोनपट मजुरी मिळायची.मी नांगरणी, वखरणी तर यांत्रिक पद्धतीने होतेच पण आताशा पेरणीसुद्धा यांत्रिक पद्धतीने व्हायला लागली आहे. पूर्वी पेरणी व्हायची ती तिफनवरच. कपाशी पेरायची तर मोघ्यावर आणि ज्वारी पेरायची तर चाड्यावर ‘तिफन’ म्हटलं तर एक शेती अवजार. पण तिफनविषयी किती पवित्र भावना, कृतज्ञ श्रद्धा असायची शेतकºयाच्या मनात. पेरणी करण्यासाठी तिफन शेतात न्यावयाची तर तिला आधी सुताराकडून नांदवून आणत असतं. तिफन नांदवणे हा पेरणीला सुरूवात करायाच्या वेळचा शेतकºयांच्या जीवनातील एक उत्सवी सोहळा. मुळात पेरणी हाच एक उत्सव होता. त्यात तिफन नांदवण्याच्या पवित्र, कृतज्ञ भावनेची भर. पेरणीला सुरुवात करावयाची तर जमिनीत पुरेसी ओल झाल्याशिवाय पेरणी करत नसत. धुळ पेरणी असा काही प्रकार नव्हताच रात्री पुरेसा पाऊस पडून गेलेला. पहाटेच्या वेळी ही आभाळ भरून आलेलं. सर्वदूर आभाळाची आश्वासक वत्सला सावली. वातावरणात सुखावणारा सुखद गारवा. चित्तवृत्ती उल्हासित, प्रसन्न करणारं आल्हाददायक पावसाळी वातावरणं. पेरणीला सुरुवात व्हायची ती बहुधा अशा वातावरणात.अशा वातावरणातच शेतात पेरणीला सुरुवात करण्याआधी तिफन सुताराकडे नांदवायाला नेत असत. सोबत तिफनची पूजा करायला पुजेचं ताट. त्यात हळद, कुंकू, फुलं, दिवा, प्रसादासाठी गूळ असे. तिफनला नैवैद्य ही दाखवत असत दहीभाताचा. सुरुवातीला सुतार आपल्या गणिती नजरेनं न्याहाळून, दोरी लावून तिफन गुण्यात आहे की नाही याच अवलोकन करायचा. अभियांत्रिकी दृष्टीत ती. समजा तिफन गुण्यात नसेल तर तिला गुण्यात लावून द्यायचा.ही एक कौशल्याची कारागिरी. गुण्यात तिफन भरणारे तज्ज्ञ सुतार तुलनेने कमीच असत. त्याबाबतीच आमच्या गावच्या शंभु सुताराचा ‘तिफन भरावी तर शंभु मिस्तरीनच’ असा लौकिक होता.तिफन हाकणं हे जसं कौशल्याच काम तसच चाड्यावर पेरणी करण हे सुद्धा कौशल्याचेच काम. चाड्यावर बियाणं भरली मुड अशी चाळवयाची की, तिफनच्या तीन ही तासात सारखच बियाण पडलं पाहिजे. एखादं तास दाट तर एखाद विरळ असे होता कमा नये. त्यामुळे ही पेरणीची मूठ चाळवण हेदेखील कौशल्याच. चाड्यावर पेरणी करणाºया बायाही मोजक्याच असत. त्यांना ही तुलनेने जास्तच मजुरी मिळायची. त्यामुळेच पेरणीची मूठ हा विशिष्ट वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. पेरणीची मूठला बाणीची मूठ असा लक्षणार्थ प्राप्त झाला आहे. नाही तरी शेतकरी म्हणतातच ‘मढ झाकून ठेवा पण पेरणीची वेळ साधा’ यावरून कृषीजल जीवनात पेरणी या कृषी कार्याला किती महत्त्व होतं याची जाणीव होेते.आता ट्रॅक्टरवर पेरणी करतात. पेरणीसाठी ट्रॅक्टर शेतात नेताना ट्रॅक्टरला तिफन सारख नांदवताना मी तरी अजून पाहिल नाही. पाऊस पाण्याचा भरवसा नाही.म्हणून धूळ पेरणी असा एक पेरणीचा प्रकार आता अनुभवाला येतो.ना खाली जमिनीत ओल, ना वरती आभाळाची वत्सल सावली. रणरणत्या उन्हात घाम पुसतच बियाण धुळीच्या हवाली करायचं. पेरणी हे आता उरलं आहे ते केवळ एक कृषीकर्म, त्यातल पावित्र्य, आत्मियता पार आटून गेलीयं. पेरणीच्या बाबतीत हळवी असणारी मनं आता पार बोथट झाली हेत. यांत्रिकतेमुळे कृषीकर्मातील भावोत्कटता पार हरवून गेलीच हेच खरे.-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगा

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर