शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:11 IST

वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळासर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांची शोकसंवेदनाअटलजींच्या कवितेने झाली सुरुवात

जळगाव : वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.‘अटल अनंतात, अनंत हृदये अटल संगे !’ हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अटलजींनी रचलेल्या 'उनकी याद करे' या कवितेने झाली. या कवितेला जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानने स्वरबध्द केले होते. त्यानंतर अटलजींवरील ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अटलजी यांचे विचार, कविता व त्यांचे जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरतील असे त्यांनी सांगितले.माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी अटलजींच्या निधनामुळे एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मुकलो असल्याचे सांगितले.‘अटलजी म्हणजे पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व, राजकारणी होते. त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ८ परिणामकारक निर्णय झाल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार ए.टी.पाटील, जनसंघाचे कार्यकर्ते गजानन जोशी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमिल देशपांडे, आर.पी.आयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रा.स्व. संघाचे योगेश्वर गर्गे, आम आदमी पार्टीचे ईश्वर मोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राजेंद्र फडके, जळगांव शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, मुकुंद मेटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी शांतीमंत्र व दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी