शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:11 IST

वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळासर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांची शोकसंवेदनाअटलजींच्या कवितेने झाली सुरुवात

जळगाव : वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.‘अटल अनंतात, अनंत हृदये अटल संगे !’ हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अटलजींनी रचलेल्या 'उनकी याद करे' या कवितेने झाली. या कवितेला जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानने स्वरबध्द केले होते. त्यानंतर अटलजींवरील ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अटलजी यांचे विचार, कविता व त्यांचे जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरतील असे त्यांनी सांगितले.माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी अटलजींच्या निधनामुळे एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मुकलो असल्याचे सांगितले.‘अटलजी म्हणजे पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व, राजकारणी होते. त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ८ परिणामकारक निर्णय झाल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार ए.टी.पाटील, जनसंघाचे कार्यकर्ते गजानन जोशी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमिल देशपांडे, आर.पी.आयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रा.स्व. संघाचे योगेश्वर गर्गे, आम आदमी पार्टीचे ईश्वर मोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राजेंद्र फडके, जळगांव शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, मुकुंद मेटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी शांतीमंत्र व दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी