शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:11 IST

वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळासर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांची शोकसंवेदनाअटलजींच्या कवितेने झाली सुरुवात

जळगाव : वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.‘अटल अनंतात, अनंत हृदये अटल संगे !’ हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अटलजींनी रचलेल्या 'उनकी याद करे' या कवितेने झाली. या कवितेला जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानने स्वरबध्द केले होते. त्यानंतर अटलजींवरील ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अटलजी यांचे विचार, कविता व त्यांचे जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरतील असे त्यांनी सांगितले.माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी अटलजींच्या निधनामुळे एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मुकलो असल्याचे सांगितले.‘अटलजी म्हणजे पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व, राजकारणी होते. त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ८ परिणामकारक निर्णय झाल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार ए.टी.पाटील, जनसंघाचे कार्यकर्ते गजानन जोशी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमिल देशपांडे, आर.पी.आयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रा.स्व. संघाचे योगेश्वर गर्गे, आम आदमी पार्टीचे ईश्वर मोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राजेंद्र फडके, जळगांव शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, मुकुंद मेटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी शांतीमंत्र व दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी