शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

तहानलेल्या ‘मन्याड’ धरणलाही लागली भरण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:56 IST

मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.

ठळक मुद्देपिकासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवितयाआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते

आडगाव/सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.मन्याड धरण १० सप्टेंबरपर्यंत कोरडेठाक होते. त्यानंतर धरण परिसरात पाऊस पडला. १७-१८ तारखेपर्यंत धरणाने शून्याचा आकडा पास केला. त्यानंतर १९ व २० रोजी नांदगाव परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने मन्याड धरणाच्या वर असलेले माणिकपुंज धरण १०० टक्के भरल्याने त्याचा विसर्ग मन्याड धरणात होऊ लागला. साधारणत: दोन ते अडीच हजार क्युसेस पाणी मन्याड धरणात येऊ लागले आहे. या धरणात २१ रोजी उपयुक्त साठ्यात सव्वा ते दीड फुटाने वाढ झाली. वरील सखल भागात दोन दिवस पाऊस न पडल्याने वरील धरणाचा विसर्ग कमी झाला. २२ रोजी मन्याड धरणात फक्त दीड /दोन फुटाने वाढ झाली. २३ रोजी माणिकपुंज धरणातून होणारा विसर्ग २०० ते २५० क्युसेसने सुरू होता. त्याच्याने सकाळी अकरा-बारापर्यंत मन्याड धरण साडेपाच टक्क्यांपर्र्यंत पोहचले. थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने मन्याड धरणाचा लेटलतीफ प्रवास सुरू झाल्याने देर है, लेकीन अंधेर नही असे म्हणण्याची वेळ मन्याड परिसरातील नागरिकांवर आली आहे.पावसाळ्यातील आॅगस्ट महिना संपला तरीदेखील मन्याड परिसरात पाऊसच नसल्याने शेतकरी, शेतमजूर, नागरिक चांगलेच धास्तावले होते. गेल्यावर्षी शून्यावर असलेले धरण यावषीर्ही शून्यावरच राहते की काय, असा प्रश्न पडला होता. पोळा सणदेखील सायंकाळपर्यंत कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. परंतु पोळ्याच्या रात्रीच मन्याड परिसरात पहिलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवित झाल्या. पोळ्यानंतर मन्याड परिसरात खरा पावसाळा सुरू झाल्याने कोरड्याठाक विहिरींनीही आतापर्यंत पन्नाशी गाठली. त्यामुळे मन्याड परिसरातील नागरिकांचे निम्मे जलसंकट कमी झाले आहे.मन्याडही १०० टक्के भरावेजिल्ह्यातील बहुतेक धरणांनी सरासरी ओलांडल्याने त्याला अपवाद आहे फक्त मन्याड धरण व पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण. तेही म्हसवे धरणातून कालव्याद्वारे भरले जात आहे. प्रश्न आहे तो मन्याड धरणाचा. परतीच्या पावसाने मन्याडदेखील १०० टक्के भरावे, अशी अपेक्षा मन्याड परिसरातील नागरिक करीत आहे. नांदगाव परिसरात व धरण परिसरात अजून दोन/ तीन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याडही शतकाकडे वाटचाल करेल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.सायगाव येथून जवळ असलेल्या मन्याड धरणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. यामुळे पीक घेण्यासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माणिक पुंज धरण १०० टक्के भरल्याने मन्याड धरण भरण्यासाठी आता अडचण येणार नाही. पण त्यासाठी दोन ते तीन दमदार पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे. त्यामुळे मन्याड धरणावर अवलंबून राहणाºया खेड्यांचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे. याआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव