शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या ‘मन्याड’ धरणलाही लागली भरण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:56 IST

मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.

ठळक मुद्देपिकासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवितयाआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते

आडगाव/सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.मन्याड धरण १० सप्टेंबरपर्यंत कोरडेठाक होते. त्यानंतर धरण परिसरात पाऊस पडला. १७-१८ तारखेपर्यंत धरणाने शून्याचा आकडा पास केला. त्यानंतर १९ व २० रोजी नांदगाव परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने मन्याड धरणाच्या वर असलेले माणिकपुंज धरण १०० टक्के भरल्याने त्याचा विसर्ग मन्याड धरणात होऊ लागला. साधारणत: दोन ते अडीच हजार क्युसेस पाणी मन्याड धरणात येऊ लागले आहे. या धरणात २१ रोजी उपयुक्त साठ्यात सव्वा ते दीड फुटाने वाढ झाली. वरील सखल भागात दोन दिवस पाऊस न पडल्याने वरील धरणाचा विसर्ग कमी झाला. २२ रोजी मन्याड धरणात फक्त दीड /दोन फुटाने वाढ झाली. २३ रोजी माणिकपुंज धरणातून होणारा विसर्ग २०० ते २५० क्युसेसने सुरू होता. त्याच्याने सकाळी अकरा-बारापर्यंत मन्याड धरण साडेपाच टक्क्यांपर्र्यंत पोहचले. थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने मन्याड धरणाचा लेटलतीफ प्रवास सुरू झाल्याने देर है, लेकीन अंधेर नही असे म्हणण्याची वेळ मन्याड परिसरातील नागरिकांवर आली आहे.पावसाळ्यातील आॅगस्ट महिना संपला तरीदेखील मन्याड परिसरात पाऊसच नसल्याने शेतकरी, शेतमजूर, नागरिक चांगलेच धास्तावले होते. गेल्यावर्षी शून्यावर असलेले धरण यावषीर्ही शून्यावरच राहते की काय, असा प्रश्न पडला होता. पोळा सणदेखील सायंकाळपर्यंत कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. परंतु पोळ्याच्या रात्रीच मन्याड परिसरात पहिलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवित झाल्या. पोळ्यानंतर मन्याड परिसरात खरा पावसाळा सुरू झाल्याने कोरड्याठाक विहिरींनीही आतापर्यंत पन्नाशी गाठली. त्यामुळे मन्याड परिसरातील नागरिकांचे निम्मे जलसंकट कमी झाले आहे.मन्याडही १०० टक्के भरावेजिल्ह्यातील बहुतेक धरणांनी सरासरी ओलांडल्याने त्याला अपवाद आहे फक्त मन्याड धरण व पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण. तेही म्हसवे धरणातून कालव्याद्वारे भरले जात आहे. प्रश्न आहे तो मन्याड धरणाचा. परतीच्या पावसाने मन्याडदेखील १०० टक्के भरावे, अशी अपेक्षा मन्याड परिसरातील नागरिक करीत आहे. नांदगाव परिसरात व धरण परिसरात अजून दोन/ तीन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याडही शतकाकडे वाटचाल करेल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.सायगाव येथून जवळ असलेल्या मन्याड धरणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. यामुळे पीक घेण्यासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माणिक पुंज धरण १०० टक्के भरल्याने मन्याड धरण भरण्यासाठी आता अडचण येणार नाही. पण त्यासाठी दोन ते तीन दमदार पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे. त्यामुळे मन्याड धरणावर अवलंबून राहणाºया खेड्यांचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे. याआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव