शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

लग्नात वेळेचं बंधन पाळायला हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:07 IST

वेळ संध्याकाळची होती... लग्नाला जायची तयारी करत होतो... बघता बघता साडेसात वाजले होते... लग्नाची वेळ साडेसहाची होती... भारतीय वेळेनुसार लग्न एक-दीड तास उशिरा लागते म्हणून घरातून उशिरा निघालो...मनाची प्रचंड घालमेल सुरू असते. लग्न लागणार तर नाही ना! आपल्या हातून लग्न निसटून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत ...

वेळ संध्याकाळची होती... लग्नाला जायची तयारी करत होतो... बघता बघता साडेसात वाजले होते... लग्नाची वेळ साडेसहाची होती... भारतीय वेळेनुसार लग्न एक-दीड तास उशिरा लागते म्हणून घरातून उशिरा निघालो...मनाची प्रचंड घालमेल सुरू असते. लग्न लागणार तर नाही ना! आपल्या हातून लग्न निसटून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. लग्न मंडपात जाऊन पोहचलो. लग्न एका प्राध्यापकाचं होतं. वेळेनुसार लागेल असं वाटलं होतं. अनेकजण इकडे तिकडे फिरत होते. भेटत होते. लग्नाची वेळ तर होऊन गेली होती. इकडे तिकडे बघत होतो.एका प्राध्यापकाने आवाज दिला, ‘बसा सर.’ पुढे साहेब आलेले आहेत. त्यांना भेटायचं तर भेटून घ्या. साहेब दोनशे किलोमीटर अंतरावरून आले होते. त्यांच्याजवळ जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तेवढ्यात एक दुसरे साहेब त्यांच्याजवळ येऊन बसले. गप्पा मारत मारत नवरदेवाच्या वरातीचे दृश्य स्क्रीनवर दाखवले. साहेबांनी पाहिले. आता आले वाटते नवरा-नवरी. एक जण म्हणाला, ‘नाही, ते तिकडेच मंदिरावर आहेत.’ हे दृश्य ड्रोनच्या साह्याने दाखवले आहे.रात्रीचे साडेआठ वाजले होते. मी साहेबांना म्हणालो, जेवण करून घेऊ. साहेब म्हणाले, ‘लग्न लागल्यावर जेऊ.’ मलाही एकट्याला जेवायला जाता येत नव्हते. मीही त्यांच्याजवळ बसलो. अखेर साहेब थकले. म्हणाले, ‘जरा बाहेर फिरून येऊ. पाणी पिऊन येऊ.’ रात्रीचे साडेनऊ वाजले. नवरदेवाची वरात चालू होती. बाहेर येऊन अर्धा तास फिरून मध्ये जाऊन बसलो. नवरा मुलगा वाजत गाजत प्रवेशद्वाराजवळ आला. नवरी आणि नवरीला स्टेजवर यायला अर्धा तास लागला. तोपर्यंत पाहुणे मंडळी ताटकळत बसली होती. वेळेचे भान कुणालाच नाही. दोन्ही मंडळी शिकलेली. पण दुसऱ्यांचा विचार नाही, कदर नाही. आपल्या प्रेमासाठी दूरदूरून माणसे आली आहेत. आपण वेळेनुसार लग्न लावले म्हणजे रात्री जाण्यासाठी त्यांना त्रास नको, ही भावना कुणाच्या चेहºयावर नाही. आपल्या मस्तीतच ही माणसं.सायंकाळी साडेसहाची वेळ लग्नाची; पण रात्रीचे सव्वादहा वाजले, लग्न अजून लागले नव्हते. नवरा नवरी स्टेजवर आले. बसले. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. सत्कारार्थीचे नावे पुकारली गेली. एक साहेब सोडले तर बाकी सगळे निघून गेली. सामान्य माणसं मात्र तशीच बसून राहिली. खरं तर आपल्याकडे आलेल्या माणसांचा आपण विचारच करत नाहीत. उलट त्यांचे शोषण करतो. लग्नातही वेळ पाळायला हवी. पण हल्ली ती फॅशनच झाली आहे. सुशिक्षितांचाही यामध्ये फार मोठा सहभाग असतो. पण वेळचे महत्त्व लग्नप्रसंगी राहिलेले दिसत नाही. खरं तर प्रत्येक माणसाची कदर करायला हवी. वेळेचे महत्त्व जाणायला हवे, असे मला वाटते. आज आम्ही शिकलो, मोठे झालो, पण वेळेची कदर करायला नाही शिकलो. हल्ली तर अनेकजण लग्न वेळेवर लागत नाही म्हणून जायचे टाळतात. काहीजण जातात, जेवण करतात, नवरा किंवा नवरीच्या मंडळींना भेटतात व निघून येतात. काहीजण घरबसल्या कुणाजवळ तरी मुंदी वाजवायला देतात. असा माणसांचा तºहेवाईकपणा लग्नप्रसंगी बघायला मिळतो. हे वाईट आहे. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते असं म्हणतात. ती मर्यादा आपण सुशिक्षितांनी तरी पाळायला हवी. कुणाच्या लग्नाला जायचं म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो आहे. शिकलेल्यात आणि अडाणी माणसांत काहीच फरक नाही, अशी म्हणण्याची पाळी येणार नाही. नाहीतर हल्ली अडाणी बरे असेच म्हणावे लागत आहे. कारण हल्ली शिकलेले, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मात्र वेळेचं भान पाळताना दिसत नाहीत. हे फार वाईट आहे. तरीही..‘वेळेसारखं महत्त्वकशाला नाहीकारण गेलेली वेळपुन्हा परत येत नाही’म्हणून वेळेचं भान सगळ्यांनी पाळायला हवं.- प्रा.डॉ.सतीश मस्के