शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
3
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
4
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
5
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
6
Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
7
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
8
"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
9
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
10
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
11
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
12
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
13
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
14
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
15
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
16
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
17
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
18
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
19
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात वेळेचं बंधन पाळायला हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:07 IST

वेळ संध्याकाळची होती... लग्नाला जायची तयारी करत होतो... बघता बघता साडेसात वाजले होते... लग्नाची वेळ साडेसहाची होती... भारतीय वेळेनुसार लग्न एक-दीड तास उशिरा लागते म्हणून घरातून उशिरा निघालो...मनाची प्रचंड घालमेल सुरू असते. लग्न लागणार तर नाही ना! आपल्या हातून लग्न निसटून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत ...

वेळ संध्याकाळची होती... लग्नाला जायची तयारी करत होतो... बघता बघता साडेसात वाजले होते... लग्नाची वेळ साडेसहाची होती... भारतीय वेळेनुसार लग्न एक-दीड तास उशिरा लागते म्हणून घरातून उशिरा निघालो...मनाची प्रचंड घालमेल सुरू असते. लग्न लागणार तर नाही ना! आपल्या हातून लग्न निसटून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. लग्न मंडपात जाऊन पोहचलो. लग्न एका प्राध्यापकाचं होतं. वेळेनुसार लागेल असं वाटलं होतं. अनेकजण इकडे तिकडे फिरत होते. भेटत होते. लग्नाची वेळ तर होऊन गेली होती. इकडे तिकडे बघत होतो.एका प्राध्यापकाने आवाज दिला, ‘बसा सर.’ पुढे साहेब आलेले आहेत. त्यांना भेटायचं तर भेटून घ्या. साहेब दोनशे किलोमीटर अंतरावरून आले होते. त्यांच्याजवळ जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तेवढ्यात एक दुसरे साहेब त्यांच्याजवळ येऊन बसले. गप्पा मारत मारत नवरदेवाच्या वरातीचे दृश्य स्क्रीनवर दाखवले. साहेबांनी पाहिले. आता आले वाटते नवरा-नवरी. एक जण म्हणाला, ‘नाही, ते तिकडेच मंदिरावर आहेत.’ हे दृश्य ड्रोनच्या साह्याने दाखवले आहे.रात्रीचे साडेआठ वाजले होते. मी साहेबांना म्हणालो, जेवण करून घेऊ. साहेब म्हणाले, ‘लग्न लागल्यावर जेऊ.’ मलाही एकट्याला जेवायला जाता येत नव्हते. मीही त्यांच्याजवळ बसलो. अखेर साहेब थकले. म्हणाले, ‘जरा बाहेर फिरून येऊ. पाणी पिऊन येऊ.’ रात्रीचे साडेनऊ वाजले. नवरदेवाची वरात चालू होती. बाहेर येऊन अर्धा तास फिरून मध्ये जाऊन बसलो. नवरा मुलगा वाजत गाजत प्रवेशद्वाराजवळ आला. नवरी आणि नवरीला स्टेजवर यायला अर्धा तास लागला. तोपर्यंत पाहुणे मंडळी ताटकळत बसली होती. वेळेचे भान कुणालाच नाही. दोन्ही मंडळी शिकलेली. पण दुसऱ्यांचा विचार नाही, कदर नाही. आपल्या प्रेमासाठी दूरदूरून माणसे आली आहेत. आपण वेळेनुसार लग्न लावले म्हणजे रात्री जाण्यासाठी त्यांना त्रास नको, ही भावना कुणाच्या चेहºयावर नाही. आपल्या मस्तीतच ही माणसं.सायंकाळी साडेसहाची वेळ लग्नाची; पण रात्रीचे सव्वादहा वाजले, लग्न अजून लागले नव्हते. नवरा नवरी स्टेजवर आले. बसले. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. सत्कारार्थीचे नावे पुकारली गेली. एक साहेब सोडले तर बाकी सगळे निघून गेली. सामान्य माणसं मात्र तशीच बसून राहिली. खरं तर आपल्याकडे आलेल्या माणसांचा आपण विचारच करत नाहीत. उलट त्यांचे शोषण करतो. लग्नातही वेळ पाळायला हवी. पण हल्ली ती फॅशनच झाली आहे. सुशिक्षितांचाही यामध्ये फार मोठा सहभाग असतो. पण वेळचे महत्त्व लग्नप्रसंगी राहिलेले दिसत नाही. खरं तर प्रत्येक माणसाची कदर करायला हवी. वेळेचे महत्त्व जाणायला हवे, असे मला वाटते. आज आम्ही शिकलो, मोठे झालो, पण वेळेची कदर करायला नाही शिकलो. हल्ली तर अनेकजण लग्न वेळेवर लागत नाही म्हणून जायचे टाळतात. काहीजण जातात, जेवण करतात, नवरा किंवा नवरीच्या मंडळींना भेटतात व निघून येतात. काहीजण घरबसल्या कुणाजवळ तरी मुंदी वाजवायला देतात. असा माणसांचा तºहेवाईकपणा लग्नप्रसंगी बघायला मिळतो. हे वाईट आहे. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते असं म्हणतात. ती मर्यादा आपण सुशिक्षितांनी तरी पाळायला हवी. कुणाच्या लग्नाला जायचं म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो आहे. शिकलेल्यात आणि अडाणी माणसांत काहीच फरक नाही, अशी म्हणण्याची पाळी येणार नाही. नाहीतर हल्ली अडाणी बरे असेच म्हणावे लागत आहे. कारण हल्ली शिकलेले, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मात्र वेळेचं भान पाळताना दिसत नाहीत. हे फार वाईट आहे. तरीही..‘वेळेसारखं महत्त्वकशाला नाहीकारण गेलेली वेळपुन्हा परत येत नाही’म्हणून वेळेचं भान सगळ्यांनी पाळायला हवं.- प्रा.डॉ.सतीश मस्के