शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अजूनही विहिरींना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 17:36 IST

महिंदळे परिसरातील स्थिती

महिंदळे, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला तरीही परिसरात अजूनही पावसाची हुलकावणीच आहे.यामुळे विहिरींनी अजूनही तळ गाठला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महिंदळे परिसरातील शेतक-यांनी विहीरींच्या तोडक्या पाण्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली होती मात्र विहीरींचे पाणी आटल्यामुळे टॅकरने विहिरीत पाणी टाकले व कपाशी पिक जगवले. परंतु शेवटी पाऊस नसल्यामुळे तेही पीक वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळी कपाशीची वाढ खुंटली आहे.मृग नक्षत्रात परिसरात पावसाचे आगमन यावर्षी झालेच नाही, त्यामुळे शेतक-यांना पेरण्या आर्द्रा नक्षत्रात कराव्या लागल्या... त्याही तोडक्या पावसाच्या बळावर. पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या व उगवनही चांगली झाली.परंतू जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत ओलावाच नाही. गेल्या आठ दिवसापासून तर तुरळक सरीही परिसरात नाहीत. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विहीरींनी पुर्ण तळ गाठला आहे.उन्हाळी कपाशी पाण्याअभावी माना टाकायला लागली आहे. विहीरींमध्ये त्यांना द्यायला पाण्याचा थेंब नाही.त्यामुळे त्यांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू पिकेही मोठ्या जोमाने जमिनितून वर आली आहेत पण त्यांनाही आता पाण्याची अवश्यकता आहे . ती पिकेही पाण्याअभावी निपचित पडली आहे. आता मात्र पाऊस आला नाही तर शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट समोर उभे दिसायला लागले आहे.चाऱ्याचे भाव गेले गगनालापावसाळा लागून दिड महिना संपत आला. परंतु परिसरात अजून जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत चारा उगवला नाही. शेतकऱ्यांचा नियोजित चारा आता संपत आला आहे. पाऊस लांबल्यामुळे चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. परंतू चाºयाचे भाव गगनाला पोहचले आहेत.त्यामुळे परिसरातील पशूधन संकटात आले आहे. कवडीमोल भावातही पशूधन कुणी घ्यायला तयार नाही. यामुळे शेतकºयांना आता आकाशाकडे चातकाप्रमाने पाण्याची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.