शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अजूनही विहिरींना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 17:36 IST

महिंदळे परिसरातील स्थिती

महिंदळे, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला तरीही परिसरात अजूनही पावसाची हुलकावणीच आहे.यामुळे विहिरींनी अजूनही तळ गाठला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महिंदळे परिसरातील शेतक-यांनी विहीरींच्या तोडक्या पाण्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली होती मात्र विहीरींचे पाणी आटल्यामुळे टॅकरने विहिरीत पाणी टाकले व कपाशी पिक जगवले. परंतु शेवटी पाऊस नसल्यामुळे तेही पीक वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळी कपाशीची वाढ खुंटली आहे.मृग नक्षत्रात परिसरात पावसाचे आगमन यावर्षी झालेच नाही, त्यामुळे शेतक-यांना पेरण्या आर्द्रा नक्षत्रात कराव्या लागल्या... त्याही तोडक्या पावसाच्या बळावर. पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या व उगवनही चांगली झाली.परंतू जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत ओलावाच नाही. गेल्या आठ दिवसापासून तर तुरळक सरीही परिसरात नाहीत. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विहीरींनी पुर्ण तळ गाठला आहे.उन्हाळी कपाशी पाण्याअभावी माना टाकायला लागली आहे. विहीरींमध्ये त्यांना द्यायला पाण्याचा थेंब नाही.त्यामुळे त्यांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू पिकेही मोठ्या जोमाने जमिनितून वर आली आहेत पण त्यांनाही आता पाण्याची अवश्यकता आहे . ती पिकेही पाण्याअभावी निपचित पडली आहे. आता मात्र पाऊस आला नाही तर शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट समोर उभे दिसायला लागले आहे.चाऱ्याचे भाव गेले गगनालापावसाळा लागून दिड महिना संपत आला. परंतु परिसरात अजून जोरदार पाऊस नसल्यामुळे जमिनीत चारा उगवला नाही. शेतकऱ्यांचा नियोजित चारा आता संपत आला आहे. पाऊस लांबल्यामुळे चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. परंतू चाºयाचे भाव गगनाला पोहचले आहेत.त्यामुळे परिसरातील पशूधन संकटात आले आहे. कवडीमोल भावातही पशूधन कुणी घ्यायला तयार नाही. यामुळे शेतकºयांना आता आकाशाकडे चातकाप्रमाने पाण्याची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.