शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

टाकळी प्र.चा.भागात १० दिवसांपासून पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:09 IST

टाकळी प्र.चा. भागात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्दे१० हजार लोकवस्तीसणासुदीतही हालग्राम पंचायतीने त्वरित पाणीपुरवठ्याचे नियोजन करून सुरळीत करावा५० रुपये तासाने विकत घ्यावे लागतेय पाणी

चाळीसगाव, जि.जळगाव : शहराच्या पूर्वेला असणाऱ्या भडगाव रोडलगतच्या टाकळी प्र.चा. भागात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याची तक्रार याभागातील रहिवाशांनी केली आहे.टाकळी प्र.चा.हा भाग शहरालगतच असल्याने १० हजारांहून अधिक लोकवस्ती या भागात वास्तव्यास आहे. नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. नळांना गेल्या १० दिवसात एकदाही पाणी न आल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.११ वर्षांनंंतर यंदा प्रथमच गिरणा धरण ओव्हर फ्लो झाले. टाकळी प्र.चा. गावाची रहिपुरी लगत गिरणा नदीत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. नदी धो धो वाहत असतानाही टाकळी प्र.चा.भागात पाण्याचा ठणठणाट आहे.परिसरात सार्वजनिक विहिरी व कूपनलिका नसल्याने रहिवाश्यांना थेट शहरात विकतचे पाणी आणण्यासाठी धाव घ्यावी लागते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पाणी टंचाईच्या समस्येला महिला वर्गाला तोंड द्यावे लागत आहे. ग्राम पंचायतीने त्वरित पाणीपुरवठ्याचे नियोजन करून तो सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.५० रुपये तासाने विकत घ्यावे लागतेय पाणीचाळीसगाव शहराला लागूनच असलेल्या टाकळी प्र. चा. हा शहरी भागाप्रमाणे सधन भाग आहे. असे असतानाही गेल्या १० ते १२ दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना अक्षरश: ५० रुपये तासप्रमाणे बोअरींग मालकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChalisgaonचाळीसगाव