शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

शाळांनी केले परीक्षांचे नियोजन, उपसंचालक म्हणाले असे कुठलेही आदेश नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:41 IST

कर्मचा-यांचे वेतन रोखू नका : पुढील शासन आदेश येत नाही तोपर्यंत परीक्षा नाही...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अजूनही शाळा बंदच आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहणार असून दरम्यान होणाऱ्या प्रथम चाचणी व सहामाही परीक्षा घेण्याचा निर्णय काही शाळांनी घेतला आहे. त्यासाठी शाळेत एकत्र येण्यासाठी सांगितले जावून जो शिक्षक हजर न झाल्यास पगार कपात केली जाईल, अशी तंबी दिली जात आहे. दरम्यान, या प्रकाराची शिक्षण उपसंचालकांनी गंभीर दखल घेतली असून आॅनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त परीक्षा घेण्याचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले असून शासनाचे पुढील निर्देश येत नाही तोपर्यंत परीक्षा होणार नाही, असे त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.दरवर्षी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यात परीक्षांना सुरूवात व्हायची. मात्र, यंदा कोरोना विषाणूने थैैमान घातल्यामुळे १५ जूनला शाळेची घंटाच वाजली नाही, अर्थात शाळा अजूनही बंद आहेत. आता शाळा सुरू व्हायला कुठला महिना उजाडणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. या कोरोनाच्या काळात शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैेक्षणिक नुकसान होवू नये म्हणून आॅनलाईन, आॅफलाईन व दुरूस्थ शिक्षणाबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, काही शाळा चाचणी व सहामाही परीक्षा नियोजनासाठी शिक्षकांना शाळेत एकत्र करीत आहेत. शिक्षक हजर न झाल्यास पगारात कपात केली जाईल, अशी तंबीही दिली जात आहे़ त्यामुळे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांवर ताण पडत आहे, असे उपसंचालक नितीन उपासनी यांच्या पत्रकात म्हटले आहे.परीक्षांचे आदेश दिलेले नसताना नियोजन....२६ आॅक्टोंबरपासून पन्नास टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच चाचणी व सहामाही परीक्षांच्या आयोजनाबाबत शिक्षण विभागाने कुठलेही आदेश केलेले नसताना शाळांनी परीक्षा सूचना केल्या आहेत, असे उपंसचालकांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकाराची त्यांनी दखल घेवून आॅनलाईन शिक्षणा व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षा घेण्याचे शासनाने आदेश दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचारी यांचे आॅनलाईन कर्तव्यकाळ गृहीत धरून कोणत्याही कर्मचा-यांचे वेतन राखू नये असे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.परीक्षांचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांना एकत्र आणले जात आहे, हा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येत आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन आदेश देत नाही तोपर्यंत परीक्षा नाही.- नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव