शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी केले परीक्षांचे नियोजन, उपसंचालक म्हणाले असे कुठलेही आदेश नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:41 IST

कर्मचा-यांचे वेतन रोखू नका : पुढील शासन आदेश येत नाही तोपर्यंत परीक्षा नाही...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अजूनही शाळा बंदच आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहणार असून दरम्यान होणाऱ्या प्रथम चाचणी व सहामाही परीक्षा घेण्याचा निर्णय काही शाळांनी घेतला आहे. त्यासाठी शाळेत एकत्र येण्यासाठी सांगितले जावून जो शिक्षक हजर न झाल्यास पगार कपात केली जाईल, अशी तंबी दिली जात आहे. दरम्यान, या प्रकाराची शिक्षण उपसंचालकांनी गंभीर दखल घेतली असून आॅनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त परीक्षा घेण्याचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले असून शासनाचे पुढील निर्देश येत नाही तोपर्यंत परीक्षा होणार नाही, असे त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.दरवर्षी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यात परीक्षांना सुरूवात व्हायची. मात्र, यंदा कोरोना विषाणूने थैैमान घातल्यामुळे १५ जूनला शाळेची घंटाच वाजली नाही, अर्थात शाळा अजूनही बंद आहेत. आता शाळा सुरू व्हायला कुठला महिना उजाडणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. या कोरोनाच्या काळात शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैेक्षणिक नुकसान होवू नये म्हणून आॅनलाईन, आॅफलाईन व दुरूस्थ शिक्षणाबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, काही शाळा चाचणी व सहामाही परीक्षा नियोजनासाठी शिक्षकांना शाळेत एकत्र करीत आहेत. शिक्षक हजर न झाल्यास पगारात कपात केली जाईल, अशी तंबीही दिली जात आहे़ त्यामुळे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांवर ताण पडत आहे, असे उपसंचालक नितीन उपासनी यांच्या पत्रकात म्हटले आहे.परीक्षांचे आदेश दिलेले नसताना नियोजन....२६ आॅक्टोंबरपासून पन्नास टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच चाचणी व सहामाही परीक्षांच्या आयोजनाबाबत शिक्षण विभागाने कुठलेही आदेश केलेले नसताना शाळांनी परीक्षा सूचना केल्या आहेत, असे उपंसचालकांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकाराची त्यांनी दखल घेवून आॅनलाईन शिक्षणा व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षा घेण्याचे शासनाने आदेश दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचारी यांचे आॅनलाईन कर्तव्यकाळ गृहीत धरून कोणत्याही कर्मचा-यांचे वेतन राखू नये असे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.परीक्षांचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांना एकत्र आणले जात आहे, हा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येत आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन आदेश देत नाही तोपर्यंत परीक्षा नाही.- नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव