शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

जळगाव जिल्ह्यात ४०० पदांच्या भरतीची प्रक्रिया रद्द

By अमित महाबळ | Updated: September 25, 2022 17:56 IST

जळगाव जिल्ह्यात ४०० पदांच्या भरतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 

जळगाव: राज्य सरकारकडून आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्गाची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदमार्फत होणाऱ्या ४०० पदांच्या भरतीला खो बसला आहे. ही भरती यापुढे नेमकी केव्हा होईल हे अद्याप शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती; पण ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे सरकारला ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापुढे जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषद स्तरावर भरावीत, असा निर्णय झाला होता. या निर्णयामुळे जळगाव जि. प. मधील आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील सुमारे ४०० पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बिंदू नामावली तपासणीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली होती. मात्र, अचानक शासनाने ही भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील परीक्षेच्या जाणून घ्या अटीरद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. नवीन जाहिरातीनुसार, नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क व इतर अटी लागू राहतील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे. मात्र, परीक्षा होईपर्यंत उमेदवार वाढत्या वयामुळे बाद होणार असल्यास त्यांच्याबाबत काय निर्णय असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही.

 

टॅग्स :JalgaonजळगावjobनोकरीHealthआरोग्य