शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

By विलास बारी | Updated: January 5, 2024 23:49 IST

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेचे लाभार्थी जिल्ह्यात ‘दिन दुगना रात चाैगुना’ झाल्याबाबतची वृत्तमालिका प्रसिद्ध करीत यातील अनागोंदी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर जून महिन्यातील २८ कोटींवरील बिल सहा कोटी ५५ लाख ८९ हजार ३१ रुपयांवर आले आहे. ‘लोकमत’मुळे शासनाचे तब्बल २१ कोटी ६९ हजार रुपयांची रक्कम वाचली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या या याेजनेच्या अनागोंदी संदर्भात चौकशी समिती नियुक्त करून लेखापरीक्षण करण्याची गरज आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांना माध्यान्ह व रात्रकालीन जेवणासाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजना सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर याठिकाणी भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फुडस् प्रा. लि. या कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान झालेले दुर्लक्ष, करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनाकडे केलेला कानाडोळा, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना देण्यात आलेली मंजुरी या सर्व बाबी लोकमतने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघड केल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्याचे बिल आले ६ कोटी ५५ लाखांवर

लोकमतची वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने फक्त नोंदीत कामगारांना लाभ देण्यावर भर दिला. त्यामुळे खरे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जून २०२३ या महिन्यात असलेले २८ कोटींवरील बिल हे ऑक्टोबर २०२३ या महिन्यात सहा कोटी ५५ लाख ८९ हजार ३१ रुपयांवर आले आहे. ‘लोकमत’ने या योजनेतील अनागोंदी समोर आणल्यानंतर शासनाचे एकट्या जळगाव जिल्ह्यात महिन्याला तब्बल २१ कोटी ६९ लाख रुपये वाचले आहे.अनागोंदीला चाप, नंतर योजनाच केली बंद

या योजनेतील अनागोंदीला चाप बसल्याने ठेकेदार कंपनीच्या महिन्याच्या बिलात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यानंतर शासनाने या योजनेसाठी निधीचे कारण पुढे करीत नोव्हेंबर महिन्यापासून योजनाच बंद केली. सुरुवातीच्या काळात मंजूर निधीची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी थांबविली असती तर, योजना बंद करण्याची शासनावर वेळ आली नसती.

चाैकशी समितीसह लेखा परीक्षणाची गरजया योजनेतील मोठ्या प्रमाणात असलेली अनागोंदी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातील या योजनेच्या चाैकशीसाठी समिती नियुक्त करून लेखा परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा