शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तक्रारीच्या पडताळणीनंतरच होणार अपात्रतेची सुनावणी; राजकीय हस्तक्षेपाला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 19:42 IST

ग्रा.पं. विभागासाठी तक्रारीनिहाय जबाबदारी निश्चित

कुंदन पाटील/जळगावजळगाव : ग्रा.पं.सदस्य, सरपंचाविषयी तक्रार आणि अविश्वास प्रस्ताव दाखल करुन अपात्रतेच्या कारवाईसाठी यापुढे थेट सुनावणी होणार नाही. तर आलेल्या तक्रारी आणि अविश्वास प्रस्तावाची पडताळणी केल्यावरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. त्यासाठी तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय जबाबदाऱ्या वाटप केल्या आहेत.

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रा.पं.विभागात तक्रार दाखल केली जायची. त्यानुसार संबंधितांकडून चौकशी अहवाल मागितला जायचा. अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर वादी आणि प्रतिवादींच्या वकीलांकडून युक्तिवाद केला जायचा. सुनावण्या आटोपल्यावर जिल्हाधिकारी अपात्रतेची कारवाई करायचे. ही कारवाई केल्यानंतर बऱ्याचदा विभागीय आयुक्तांकडूनल न्यायालयाकडून कारवाईला स्थगीती मिळायची. त्यामुळे प्रशासनाचा प्रचंड वेळ वाया जायचा. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या पद्धतीला दूर केले आहे. सबळ पुरावे उपलब्ध करण्यासाठी तक्रारींनुसार विभागनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत केली आहे. त्यामुळे यापुढे तक्रार दाखल झाल्यास त्यातील आरोपांची पडताळणी केली जाईल. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. त्यानंतरच अंतिम सुनावणी होणार आहे.

आरोपातील कलमनिहाय चौकशीसाठी जबाबदारीकलम-चौकशी अहवालाची जबाबदारी१) जात वैधता प्रमाणपत्र (कलम १० (१-अ) ब ३०-अ-१ अ)- जात पडताळणी समिती, निवडणुक निर्णय अधिकारी२)हितसंबंध किंवा लाभ (कलम १४-ग)-जि.प.सीईओ, गटविकास अधिकारी.३) निवडणूक खर्च (कलम १४-ब)-तहसीलदार, निवडणुक अधिकारी.४)दोनपेक्षा जास्त अपत्ये (कलम १४-ज-१)-प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, पोलीस पाटील.५)अतिक्रमण (कलम-१४ (ज-३)-तहसीलदार, बीडीओ, भूमीअभिलेख अधिकारी.६)शौचालय वापर (कलम (१४ (ज-५)-बीडीओ, पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक.७)कर व फी भरणा (कलम १४ (ह)-बीडीओ, ग्रामसेवक.८)अविश्वास ठराव (कलम ३५)-उपविभागीय अधिकारी.९)राजीनाम्याबाबत (कलम २९/३/ब)-बीडीओ, ग्रामसेवक, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल.१०)पैसे वसुलीचे अधिकार (कलम १७९)-गटविकास अधिकारी.११)ग्रामसभेच्या बैठका-गटविकास अधिकारी.