शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तक्रारीच्या पडताळणीनंतरच होणार अपात्रतेची सुनावणी; राजकीय हस्तक्षेपाला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 19:42 IST

ग्रा.पं. विभागासाठी तक्रारीनिहाय जबाबदारी निश्चित

कुंदन पाटील/जळगावजळगाव : ग्रा.पं.सदस्य, सरपंचाविषयी तक्रार आणि अविश्वास प्रस्ताव दाखल करुन अपात्रतेच्या कारवाईसाठी यापुढे थेट सुनावणी होणार नाही. तर आलेल्या तक्रारी आणि अविश्वास प्रस्तावाची पडताळणी केल्यावरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. त्यासाठी तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय जबाबदाऱ्या वाटप केल्या आहेत.

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रा.पं.विभागात तक्रार दाखल केली जायची. त्यानुसार संबंधितांकडून चौकशी अहवाल मागितला जायचा. अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर वादी आणि प्रतिवादींच्या वकीलांकडून युक्तिवाद केला जायचा. सुनावण्या आटोपल्यावर जिल्हाधिकारी अपात्रतेची कारवाई करायचे. ही कारवाई केल्यानंतर बऱ्याचदा विभागीय आयुक्तांकडूनल न्यायालयाकडून कारवाईला स्थगीती मिळायची. त्यामुळे प्रशासनाचा प्रचंड वेळ वाया जायचा. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या पद्धतीला दूर केले आहे. सबळ पुरावे उपलब्ध करण्यासाठी तक्रारींनुसार विभागनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत केली आहे. त्यामुळे यापुढे तक्रार दाखल झाल्यास त्यातील आरोपांची पडताळणी केली जाईल. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. त्यानंतरच अंतिम सुनावणी होणार आहे.

आरोपातील कलमनिहाय चौकशीसाठी जबाबदारीकलम-चौकशी अहवालाची जबाबदारी१) जात वैधता प्रमाणपत्र (कलम १० (१-अ) ब ३०-अ-१ अ)- जात पडताळणी समिती, निवडणुक निर्णय अधिकारी२)हितसंबंध किंवा लाभ (कलम १४-ग)-जि.प.सीईओ, गटविकास अधिकारी.३) निवडणूक खर्च (कलम १४-ब)-तहसीलदार, निवडणुक अधिकारी.४)दोनपेक्षा जास्त अपत्ये (कलम १४-ज-१)-प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, पोलीस पाटील.५)अतिक्रमण (कलम-१४ (ज-३)-तहसीलदार, बीडीओ, भूमीअभिलेख अधिकारी.६)शौचालय वापर (कलम (१४ (ज-५)-बीडीओ, पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक.७)कर व फी भरणा (कलम १४ (ह)-बीडीओ, ग्रामसेवक.८)अविश्वास ठराव (कलम ३५)-उपविभागीय अधिकारी.९)राजीनाम्याबाबत (कलम २९/३/ब)-बीडीओ, ग्रामसेवक, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल.१०)पैसे वसुलीचे अधिकार (कलम १७९)-गटविकास अधिकारी.११)ग्रामसभेच्या बैठका-गटविकास अधिकारी.