शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शासकीय योजनांच्या जत्रेत जळगावचा पाळणा! दोघा अधिकाऱ्यांच्या प्रयोगाची राज्यभरात अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:10 IST

या तंबूने अनेकांना हात दिल्याचे उघड होताच राज्य शासनही या ‘मॉडेल’च्या प्रेमात पडले आणि हा प्रयोग राज्यभरात राबविण्याचे आदेश काढले.

कुंदन पाटील

जळगाव : चाळीसगावच्या तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्याने शासकीय योजनांना एका तंबूत आणले आणि कानाकोपऱ्यातल्या जनतेच्या पदरात योजनांचा लाभ टाकला. चाळीसगावमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यापाठोपाठ जामनेरांच्या दिमतीलाहा हा तंबू उभा राहिला. या तंबूने अनेकांना हात दिल्याचे उघड होताच राज्य शासनही या ‘मॉडेल’च्या प्रेमात पडले आणि हा प्रयोग राज्यभरात राबविण्याचे आदेश काढले.

२०१६ मध्ये चाळीसगावचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी जिल्ह्यात हा प्रयोग राबविला होता. त्यांनी महसुल विभागाचे महाशिबिर भरविले आणि त्यात चाळीसगाव तालुक्यातील १० हजार ग्रामस्थांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय सोय केली होती.

या महाशिबिराच्या माध्यमातून जनतेच्या प्रस्तावांना तालुका, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरुन अत्यल्प कालावधीत मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर जळगावचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी जामनेर गाठले आणि त्याठिकाणीही महाशिबीर घेतले होते. त्यानंतर भांडे यांची कल्याणला बदली झाली. हा प्रयोग कल्याणमध्येही राबविला गेला. त्याचीच दखल घेत शासनाने जळगावचे ‘मॉडेल’ची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

कसे आहे मॉडेल?

काच छताखाली राज्य शासनाचे विविध विभाग एकत्रित आणले. आणि त्यांची बैठक घेतली. विविध योजनांसाठी अर्ज उपलब्ध करुन पात्र लाभार्थ्यांकरवी ते भरुन घेतले आणि ते प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठांकडे पाठविले गेले. अचूक व निर्दोष असणाऱ्या या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी मिळाली. त्यामुळे चाळीसगावच्या हजारो लाभार्थ्यांमधील ‘शासकीय काम आणि थोडा थांब’चा समज पुसला गेला.

या उपक्रमाला चाळीसगाकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनीही महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. म्हणून लाभार्थ्यांपर्यंत अल्पकालावधीतच योजना पोहचत्या करता आल्या.-मनोजकुमार घोडे-पाटील, उपायुक्त, मनपा, नाशिक.