शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जळगावमध्ये गिरणेच्या आवर्तनाचे पाणी आणखी १५ दिवस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:32 IST

कुंदन पाटील जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी ...

कुंदन पाटील

जळगाव : गिरणा धरणातून सोडलेल्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या चारीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आणखी आगामी १५ दिवस पाण्याचा प्रवाह कायम राहणार आहे. रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे पाणी शेवटच्या पाटचारीपर्यंत पोहोचत नसल्याची काही शेतकऱ्यांची तक्रार होती. त्याची दखल घेत प्रशासनाने आवर्तन दि.२० ऐवजी २५ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ‘रब्बी’ला पाण्याचे पुरेसे बुस्टर मिळण्यास मदत होणार आहे.

पिण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा नदी आणि बोरी नदीच्या माध्यमातून एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांसाठी आणि तिथल्या अधिग्रहित केलेल्या विहिरींसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्याची नियोजन आहे. गिरणाच्या माध्यमातून पाच तर बोरीच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. 

टंचाई आराखड्यानुसार नियोजन

जिल्हा प्रशासनाने ४३२ गावांना संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे गृहित धरुन उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार १९ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या जाणार असून ४०२ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विहिरींना पाणी उपलब्ध करण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभाग सजग राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव