शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

गावांमध्येही वाढली ‘कोरोना’ ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:51 IST

बाहेरगावाहून येणाऱ्यांना प्रवेश बंद : चौकशी करूनच प्रवेश, आव्हाणे, कठोरा, नांदगावसह अनेक गावांमध्ये नाकाबंदी

जळगाव : शहराप्रमाणे आता ‘कोरोना ची दहशत गावांमध्येदेखील पसरत जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये बाहेरगावाहन येणाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गावाचाच रहिवासी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून बाहेर गावाला वास्तव्याला आहे. अशा नागरिकांनाही आधी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात आहे.महाराष्टÑात लॉक डाऊन झाल्यानंतरही ग्रामीण भागात ‘कोरोना’ बाबत नागरिक फारसे गांभिर्याने घेत नव्हते. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर ग्रामीण भागातही आता ‘कोरोना’ ची दहशत पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व युवकांनीच आता गावात येणा-यांबाबत खबरदारी घेतली आहे.मंदिर, सप्ताह, यात्रा, लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रमही रद्दअनेक गावांमध्ये मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कारोनामुळे अनेक दशकांची परंपरा असलेले सप्ताह देखील ग्रामस्थांनी रद्द केले आहेत. यासह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी या गावाने पुढील आठवड्यात भरणारी यात्रा देखील रद्द केली आहे. यासह लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रम रद्द करून, नवीन मुहूर्त शोधला जात आहे.तर अनेकांकडे घरातल्या घरात छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, कार्यक्रम पार पाडले जात आहेत.मुंबई-पुण्याहून येणाºयांचा ओघ सुरुचसंपुर्ण देशात लॉक डाऊन आहे. यासह जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबई-पुण्याहून आपल्या मुळगावी येणाºयांची संख्या मोठी आहे. रात्री-बेरात्री मिळेल त्या वाहनाने प्रवेश करून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. प्रशासनाने कितीही खबरदारी घेतली तरी प्रशासनाला अंधारात ठेवून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. त्यामुळेच आता गावांमध्येहीअशा नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच काही नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा, खासगी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात१४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जात आहे.‘कोरोना’मुळे आता लॉक डाऊन असल्याने संपुर्ण देशातील कारभार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत रब्बीचा हंगाम काढणीवर आला असतानाही, शेतकºयांना शेतांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे गहू, हरभरा काढणीसह केळीला पाणी देण्याचेही काम रखडली आहेत. गहू काढणीसाठी यंत्र मिळत नसल्याने जुन्या पध्दतीने गहू कापून तो काढला जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव