शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्येही वाढली ‘कोरोना’ ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:51 IST

बाहेरगावाहून येणाऱ्यांना प्रवेश बंद : चौकशी करूनच प्रवेश, आव्हाणे, कठोरा, नांदगावसह अनेक गावांमध्ये नाकाबंदी

जळगाव : शहराप्रमाणे आता ‘कोरोना ची दहशत गावांमध्येदेखील पसरत जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये बाहेरगावाहन येणाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गावाचाच रहिवासी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून बाहेर गावाला वास्तव्याला आहे. अशा नागरिकांनाही आधी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात आहे.महाराष्टÑात लॉक डाऊन झाल्यानंतरही ग्रामीण भागात ‘कोरोना’ बाबत नागरिक फारसे गांभिर्याने घेत नव्हते. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर ग्रामीण भागातही आता ‘कोरोना’ ची दहशत पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व युवकांनीच आता गावात येणा-यांबाबत खबरदारी घेतली आहे.मंदिर, सप्ताह, यात्रा, लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रमही रद्दअनेक गावांमध्ये मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कारोनामुळे अनेक दशकांची परंपरा असलेले सप्ताह देखील ग्रामस्थांनी रद्द केले आहेत. यासह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी या गावाने पुढील आठवड्यात भरणारी यात्रा देखील रद्द केली आहे. यासह लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रम रद्द करून, नवीन मुहूर्त शोधला जात आहे.तर अनेकांकडे घरातल्या घरात छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, कार्यक्रम पार पाडले जात आहेत.मुंबई-पुण्याहून येणाºयांचा ओघ सुरुचसंपुर्ण देशात लॉक डाऊन आहे. यासह जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबई-पुण्याहून आपल्या मुळगावी येणाºयांची संख्या मोठी आहे. रात्री-बेरात्री मिळेल त्या वाहनाने प्रवेश करून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. प्रशासनाने कितीही खबरदारी घेतली तरी प्रशासनाला अंधारात ठेवून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. त्यामुळेच आता गावांमध्येहीअशा नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच काही नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा, खासगी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात१४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जात आहे.‘कोरोना’मुळे आता लॉक डाऊन असल्याने संपुर्ण देशातील कारभार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत रब्बीचा हंगाम काढणीवर आला असतानाही, शेतकºयांना शेतांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे गहू, हरभरा काढणीसह केळीला पाणी देण्याचेही काम रखडली आहेत. गहू काढणीसाठी यंत्र मिळत नसल्याने जुन्या पध्दतीने गहू कापून तो काढला जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव