शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

कविवर्य विंदा करंदीकरांच्या साहित्याचा वेध घेणारा ‘स्वच्छंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:33 IST

यंदाचे वर्ष हे कविवर्य विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम जळगाव येथील व.वा.वाचनालयातर्फे शनिवार, दि.१८ आॅगस्ट रोजी वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. विंदांच्या या कार्यक्रमाचा कवयित्री डॉ.अस्मिता गुरव यांनी ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये घेतलेला आढावा...

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारेवेड्या मुशफिराला सामील सर्व तारेमी चालतो अखंड चालायचे म्हणूनधुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे....चुकली दिशा तरीही... म्हणणारे कविवर्य विं.दा.करंदीकर यांनी कवितेची दिशा किती आणि कशी अचूक असावी याचे आपल्या समग्र साहित्यातून दर्शन घडवले. विंदांची कविता ही अनेक विषयांचा वेध घेणारी कविता. आशयघन कविता लिहिणाऱ्या या कविराजाने कवितेत वेगवेगळे प्रयोग केले आणि रसिकांना ते मनापासून आवडले... अर्वाचिनीकरण, तालचित्रे/स्वरचित्रे, मुक्त सुनीत, गझल आणि मुक्तछंद ही त्यातली काही उदाहरणे... शब्दांना अर्थाची खोली असते तेव्हा कविता मनाचा ठाव घेते. यावर विंदांचा दृढ विश्वास म्हणून त्यांनी कवितेतला अर्थ जपला, भाव जोपासला... शब्दांची जुळवा जुळव करण्याची ‘कारागिरी’ केली नाही तर मनाच्या तळातून आलेली कविता टिपली. ‘विरुपिका’ हा काव्यप्रकार विंदांनी कवितेत आणला आणि रसिकांना तो भावला. विंदांनी बालकविता लिहिली, सामाजिक प्रवृत्तीवर प्रहार करणारी ‘माझ्या मना बन दगड’ सारखी कविता लिहिली तशीच तत्त्वचिंतनात्मक ‘अष्टदर्शन’ सारखी कविता लिहिली. प्रकृती-पुरुष, विरह-मिलन बंधन-मुक्ती अशा वेगवेगळ्या संकल्पनांची उकल करणाºया राधा-कृष्णाच्या ऐहिक आणि आत्मिक सुखाच्या आंतरिक ओढीचा वेध घेणारी ‘मुक्ती मधले मोल हरवले’ ही कविता लिहिली. या कवितेत जगण्याच्या आणि जीवनमुक्तीच्या सर्व पातळींचे उत्कट दर्शन विंदांनी घडवले.संत ज्ञानदेवांच्या ‘अमृतानुभवा’चे विंदांनी अर्वाचिन मराठीत रुपांतर केले असून ‘आकाशाचा अर्थ’, ‘आम्रयोग’, ‘स्पर्श पालवी’ हे त्यांचे ललितबंधही भावपूर्ण आहेत. विंदा जसे उत्तम कवी होते. तसेच ते मर्मज्ञ समीक्षक म्हणूनही ओळखले जात होते. तत्त्वचिंतनात्मक दृष्टी होती तशी खट्याळपणा ही त्यांची वृत्ती होती. त्यांनी पारंपरिक छंद आणि मुक्तछंद यातून ‘स्वच्छंद’ नावाचा नवा छंद आपल्या कवितेतून आणला आणि स्वच्छंदमय कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. युरोपातील आणि भारतातील आठ तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचे निरूपण करणाºया ओव्या त्यांनी लिहिल्या; त्यातही चार्वकाचे इहवादी तत्त्वज्ञान त्यांनी अत्यंत रसाळपणे मांडलय. विं.दा.करंदीकर या नावाच्या कवीने मराठी साहित्याला, रसिकांना भरभरून दिलं. करंदीकर-बापट-पाडगावकर या त्रिमूर्तीनी मराठी रसिकांना सुंदर गाणी, गझल आणि मुख्य म्हणजे कविता ऐकण्याचे संस्कार केले... गावोगावी कविताचे कार्यक्रम करून लोकांपर्यंत कविता पोहोचवण्याचं व्रत घेऊन कवितेचं देणं देऊन रसिकांना समृद्ध केलं.अर्धीच रात्र वेडी, अर्धी पुरी शहाणीभोळ्यासदाफुलीची ही रोजची कहाणीआता न सांध्यतारा करणार रे पहाराफुलणार नाही आता श्वासात गूढ गाणीमग्रुर प्राक्तताचा मी फाडला नकाशाविझेल तेथेच सारे मागचे इशारेचुकली दिशा तरीही आकाश एक आहेहे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारेविंदांचं कविचा वाचन हे ज्यांनी त्यांच्या तोंडून गझल ऐकलीय, कविता ऐकलीय त्यांना तो आनंद काय होता ठावूकच आहे... विल्यम शेक्सपिअर तुकाराम महाराजांना भेटायला येतो. ही कविता विंदांच्या तोंडून ‘विल्या’ आणि ‘तुक्या’ या शब्दातून ऐकताना अक्षरश: तो प्रसंग साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. शब्द आणि स्वरावरची सादरीकरणाची ही हुकूमत विंदांकडे होती. ज्ञानपीठ सन्मान विजेत्या विंदांची कविता ही लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आनंद देणारी आहे. यंदाचे वर्ष हे कविवर्य विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘स्वच्छंद’ या डॉ.विद्याधर करंदीकर लिखित कार्यक्रमाचे येथील वल्लभदास वालजी वाचनालयातर्फे शनिवार दिनांक १८ आॅगस्ट रोजी वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा. संहिता डॉ.विद्याधर करंदीकर, निर्मिती संकल्पना, नेपथ्य वामन पंडित, संगीत माधव गावकर, सहभाग वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, गौरी ताम्हणकर, माधव गावकर आणि रंगमंच बाळा आर्डेकर.या कार्यक्रमात विंदांच्या समग्र साहित्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न असून आजवर या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अभिवाचनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे नेटके स्वरूप म्हणजे ‘स्वच्छंद....’ निवडक कविता, वेचक ललितबंध, विरूपिका, काव्य गायन अर्थात विंदाच्या साहित्याची सुरेख-सुरेल मैफल म्हणजे स्वच्छंद...!- डॉ.अस्मिता गुरव, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव