शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्वामी विवेकानंदजी, रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चहा’ या सदरात साहित्यिक डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांचा विशेष लेख.

चहा घ्या.. स्वत: बनवलेल्या चहाचा पेला पुढे करत लोकमान्य टिळक हसले. प्रसन्न चित्ताने स्वामींनी पेला स्वीकारला. स्थळ बेलूर मठ, दक्षिणेश्वर, कलकत्ता. जायफळ, जायपत्री, वेलदोडे, लवंग यासोबत चक्क केशर घातलेल्या ह्या ‘मुघलाई’ चहाचा गंध आगळा वेगळा होता. स्वामी विवेकानंद हे चहाचे खरे दर्दी. त्यांच्या तोंडून वाहवा ऐकून लोकमान्य सुखावले. कारण ते स्वत:ही चहाचे दर्दी. साधा एक कप चहा प्यायल्यामुळे टिळकांच्या जीवनात प्रचंड वादळ निर्माण झाले होते. हे आज आपल्याला खरे वाटेल काय? ऑक्टोबर 1890 मध्ये ‘चर्च ऑफ होली नेम’ चर्च मधल्या सभेत पुण्यातले दिग्गज जमले होते. सभेनंतर लोकमान्य आणि महादेव गोविंद रानडे यांनी तेथे चहापान केले. झाले! एका वादळाची ही सुरुवात होती. ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्राने या सभेत चहापान केलेल्या 50 लोकांची यादी जाहीर केली. त्यांना धर्माबाहेर का काढू नये, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मठ पुणेकरांनी त्यांना ‘बाटले’ असे जाहीर करत त्यांच्यावर बहिष्कार टाकला. प्रकरण थेट शंकराचार्यापयर्र्त गेले. टिळकांनी ‘मी काशीस प्रायश्चित्त घेतले आहे’, असे बचावात सांगितले. तरी दोन वर्षे त्यांना घरच्या कार्यासाठी पुरोहित मिळाला नाही म्हणे. स्वामींच्या बेलूर मठातही चहाचा वापर होत असे. कलकत्त्यातील कर्मठ ब्राrाणांना विवेकानंदांचे विचार जाचत होते. कारण धर्मातील अनिष्ठ रुढी व परंपरांवर ते उग्र भाष्य करत होते. विवेकवादी विचार मांडत होते. कर्मठांना मठातल्या चहापानाचे हे आयते कोलीत मिळाले. चहा पिणे म्हणजे पाप, बाटणे असा प्रचार होत होता. कर्मठांच्या प्रभावामुळे म्युनिसिपालीटीने बेलूर मठ म्हणजे खाजगी चहाबाग आहे, असे नमूद करून मठावरचे कर वाढवले. स्वामीजींनी याविरुद्ध न्यायालयात तक्रार केली व केस जिंकली. स्वामीजींनी जगभरातल्या वेगवेगळ्या चहापानाच्या पद्धतींबद्दल सविस्तर नोंदी त्यांच्या ‘परिव्राजक’ या पुस्तकात केल्या आहेत. ‘इंग्लंड आणि रशिया सोडल्यास पश्चिमेत इतरत्र चहापानाची फारशी पद्धत नाही.’ दूध किंवा लिंबू घातल्यास चहाची चव कशी बदलते याची नोंद त्यांनी केली आहे. स्वामींच्या कुटुंबात मात्र चहापानाची पद्धत होती. एकदा त्यांच्या घरात भंगारातून जुनी पुरानी किटली कोणीतरी आणली. कळकट किटलीतला भुसा काढला. तो काय किटली शुद्ध चांदीची होती. चहा हा आरोग्याला घातक नाही, असे मत स्वामीजींनी नोंदवले आहे. स्वामीजींच्या समकालीन अशी आणखी एक दिग्गज व्यक्ती कलकत्त्यात होती. त्यांनी तर कविता रचली होती. या तहानलेल्या आत्म्यानो, किटली उकळत आहे. याहो या, अहो सुरातालात उकळी फुटत आहे, ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून रवींद्रनाथ टागोर होते! रवींद्रनाथांना वेगळ्याच प्रकारचे चहा आवडत. होकी चा, हिरवा पेको, पांढरा चहा आणि काकडीच्या स्वादाचे मिश्रण असलेला त्यांना आवडणारा चहा आजच्या घडीला ‘रवींद्रनाथ चहा’ म्हणून विकला जातोत. एकदा जपानमध्ये टागोरांनी चक्क बशीत ओतून चहा प्यायला सुरुवात केली. त्यांचा मान राखत सारे जपानी बशीत ओतून चहा पिऊ लागले! सर्वसामान्य भारतीय मात्र चहाबद्दल अनभिज्ञ होते. ते थेट पहिले महायुद्ध संपेर्पयत.