शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

स्वामी विवेकानंदजी, रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चहा’ या सदरात साहित्यिक डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांचा विशेष लेख.

चहा घ्या.. स्वत: बनवलेल्या चहाचा पेला पुढे करत लोकमान्य टिळक हसले. प्रसन्न चित्ताने स्वामींनी पेला स्वीकारला. स्थळ बेलूर मठ, दक्षिणेश्वर, कलकत्ता. जायफळ, जायपत्री, वेलदोडे, लवंग यासोबत चक्क केशर घातलेल्या ह्या ‘मुघलाई’ चहाचा गंध आगळा वेगळा होता. स्वामी विवेकानंद हे चहाचे खरे दर्दी. त्यांच्या तोंडून वाहवा ऐकून लोकमान्य सुखावले. कारण ते स्वत:ही चहाचे दर्दी. साधा एक कप चहा प्यायल्यामुळे टिळकांच्या जीवनात प्रचंड वादळ निर्माण झाले होते. हे आज आपल्याला खरे वाटेल काय? ऑक्टोबर 1890 मध्ये ‘चर्च ऑफ होली नेम’ चर्च मधल्या सभेत पुण्यातले दिग्गज जमले होते. सभेनंतर लोकमान्य आणि महादेव गोविंद रानडे यांनी तेथे चहापान केले. झाले! एका वादळाची ही सुरुवात होती. ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्राने या सभेत चहापान केलेल्या 50 लोकांची यादी जाहीर केली. त्यांना धर्माबाहेर का काढू नये, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मठ पुणेकरांनी त्यांना ‘बाटले’ असे जाहीर करत त्यांच्यावर बहिष्कार टाकला. प्रकरण थेट शंकराचार्यापयर्र्त गेले. टिळकांनी ‘मी काशीस प्रायश्चित्त घेतले आहे’, असे बचावात सांगितले. तरी दोन वर्षे त्यांना घरच्या कार्यासाठी पुरोहित मिळाला नाही म्हणे. स्वामींच्या बेलूर मठातही चहाचा वापर होत असे. कलकत्त्यातील कर्मठ ब्राrाणांना विवेकानंदांचे विचार जाचत होते. कारण धर्मातील अनिष्ठ रुढी व परंपरांवर ते उग्र भाष्य करत होते. विवेकवादी विचार मांडत होते. कर्मठांना मठातल्या चहापानाचे हे आयते कोलीत मिळाले. चहा पिणे म्हणजे पाप, बाटणे असा प्रचार होत होता. कर्मठांच्या प्रभावामुळे म्युनिसिपालीटीने बेलूर मठ म्हणजे खाजगी चहाबाग आहे, असे नमूद करून मठावरचे कर वाढवले. स्वामीजींनी याविरुद्ध न्यायालयात तक्रार केली व केस जिंकली. स्वामीजींनी जगभरातल्या वेगवेगळ्या चहापानाच्या पद्धतींबद्दल सविस्तर नोंदी त्यांच्या ‘परिव्राजक’ या पुस्तकात केल्या आहेत. ‘इंग्लंड आणि रशिया सोडल्यास पश्चिमेत इतरत्र चहापानाची फारशी पद्धत नाही.’ दूध किंवा लिंबू घातल्यास चहाची चव कशी बदलते याची नोंद त्यांनी केली आहे. स्वामींच्या कुटुंबात मात्र चहापानाची पद्धत होती. एकदा त्यांच्या घरात भंगारातून जुनी पुरानी किटली कोणीतरी आणली. कळकट किटलीतला भुसा काढला. तो काय किटली शुद्ध चांदीची होती. चहा हा आरोग्याला घातक नाही, असे मत स्वामीजींनी नोंदवले आहे. स्वामीजींच्या समकालीन अशी आणखी एक दिग्गज व्यक्ती कलकत्त्यात होती. त्यांनी तर कविता रचली होती. या तहानलेल्या आत्म्यानो, किटली उकळत आहे. याहो या, अहो सुरातालात उकळी फुटत आहे, ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून रवींद्रनाथ टागोर होते! रवींद्रनाथांना वेगळ्याच प्रकारचे चहा आवडत. होकी चा, हिरवा पेको, पांढरा चहा आणि काकडीच्या स्वादाचे मिश्रण असलेला त्यांना आवडणारा चहा आजच्या घडीला ‘रवींद्रनाथ चहा’ म्हणून विकला जातोत. एकदा जपानमध्ये टागोरांनी चक्क बशीत ओतून चहा प्यायला सुरुवात केली. त्यांचा मान राखत सारे जपानी बशीत ओतून चहा पिऊ लागले! सर्वसामान्य भारतीय मात्र चहाबद्दल अनभिज्ञ होते. ते थेट पहिले महायुद्ध संपेर्पयत.