शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंदजी, रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:31 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चहा’ या सदरात साहित्यिक डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांचा विशेष लेख.

चहा घ्या.. स्वत: बनवलेल्या चहाचा पेला पुढे करत लोकमान्य टिळक हसले. प्रसन्न चित्ताने स्वामींनी पेला स्वीकारला. स्थळ बेलूर मठ, दक्षिणेश्वर, कलकत्ता. जायफळ, जायपत्री, वेलदोडे, लवंग यासोबत चक्क केशर घातलेल्या ह्या ‘मुघलाई’ चहाचा गंध आगळा वेगळा होता. स्वामी विवेकानंद हे चहाचे खरे दर्दी. त्यांच्या तोंडून वाहवा ऐकून लोकमान्य सुखावले. कारण ते स्वत:ही चहाचे दर्दी. साधा एक कप चहा प्यायल्यामुळे टिळकांच्या जीवनात प्रचंड वादळ निर्माण झाले होते. हे आज आपल्याला खरे वाटेल काय? ऑक्टोबर 1890 मध्ये ‘चर्च ऑफ होली नेम’ चर्च मधल्या सभेत पुण्यातले दिग्गज जमले होते. सभेनंतर लोकमान्य आणि महादेव गोविंद रानडे यांनी तेथे चहापान केले. झाले! एका वादळाची ही सुरुवात होती. ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्राने या सभेत चहापान केलेल्या 50 लोकांची यादी जाहीर केली. त्यांना धर्माबाहेर का काढू नये, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मठ पुणेकरांनी त्यांना ‘बाटले’ असे जाहीर करत त्यांच्यावर बहिष्कार टाकला. प्रकरण थेट शंकराचार्यापयर्र्त गेले. टिळकांनी ‘मी काशीस प्रायश्चित्त घेतले आहे’, असे बचावात सांगितले. तरी दोन वर्षे त्यांना घरच्या कार्यासाठी पुरोहित मिळाला नाही म्हणे. स्वामींच्या बेलूर मठातही चहाचा वापर होत असे. कलकत्त्यातील कर्मठ ब्राrाणांना विवेकानंदांचे विचार जाचत होते. कारण धर्मातील अनिष्ठ रुढी व परंपरांवर ते उग्र भाष्य करत होते. विवेकवादी विचार मांडत होते. कर्मठांना मठातल्या चहापानाचे हे आयते कोलीत मिळाले. चहा पिणे म्हणजे पाप, बाटणे असा प्रचार होत होता. कर्मठांच्या प्रभावामुळे म्युनिसिपालीटीने बेलूर मठ म्हणजे खाजगी चहाबाग आहे, असे नमूद करून मठावरचे कर वाढवले. स्वामीजींनी याविरुद्ध न्यायालयात तक्रार केली व केस जिंकली. स्वामीजींनी जगभरातल्या वेगवेगळ्या चहापानाच्या पद्धतींबद्दल सविस्तर नोंदी त्यांच्या ‘परिव्राजक’ या पुस्तकात केल्या आहेत. ‘इंग्लंड आणि रशिया सोडल्यास पश्चिमेत इतरत्र चहापानाची फारशी पद्धत नाही.’ दूध किंवा लिंबू घातल्यास चहाची चव कशी बदलते याची नोंद त्यांनी केली आहे. स्वामींच्या कुटुंबात मात्र चहापानाची पद्धत होती. एकदा त्यांच्या घरात भंगारातून जुनी पुरानी किटली कोणीतरी आणली. कळकट किटलीतला भुसा काढला. तो काय किटली शुद्ध चांदीची होती. चहा हा आरोग्याला घातक नाही, असे मत स्वामीजींनी नोंदवले आहे. स्वामीजींच्या समकालीन अशी आणखी एक दिग्गज व्यक्ती कलकत्त्यात होती. त्यांनी तर कविता रचली होती. या तहानलेल्या आत्म्यानो, किटली उकळत आहे. याहो या, अहो सुरातालात उकळी फुटत आहे, ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून रवींद्रनाथ टागोर होते! रवींद्रनाथांना वेगळ्याच प्रकारचे चहा आवडत. होकी चा, हिरवा पेको, पांढरा चहा आणि काकडीच्या स्वादाचे मिश्रण असलेला त्यांना आवडणारा चहा आजच्या घडीला ‘रवींद्रनाथ चहा’ म्हणून विकला जातोत. एकदा जपानमध्ये टागोरांनी चक्क बशीत ओतून चहा प्यायला सुरुवात केली. त्यांचा मान राखत सारे जपानी बशीत ओतून चहा पिऊ लागले! सर्वसामान्य भारतीय मात्र चहाबद्दल अनभिज्ञ होते. ते थेट पहिले महायुद्ध संपेर्पयत.