शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

जळगावात कारागृहातील कैदी पलायनप्रकरणी दोन कर्मचारी निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:37 IST

उपमहानिरीक्षकांची कारवाई

ठळक मुद्देकारागृहाच्या भींतीची उंची वाढविणारहलगर्जीपणा खपवून घेणार नाही

जळगाव : येथील कारागृहातून दोन कैदी पसार झाल्याने भिशी अमलदार बाळू उत्तम बोरसे व रात्री पाळीचे अमलदार वासुदेव हिरामण सोनवणे या दोघांना कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन काळात बोरसे याचे मुख्यालय नाशिक तर सोनवणे याचे जालना देण्यात आले आहे.दरम्यान, आरोपींनी पलायन केल्याने या कारागृहाची लवकरच उंची वाढविण्यात येईल व सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यिात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.प्राथमिक चौकशीत भिशी अमलदार बाळू बोरसे व सोनवणे दोषी आहेत. या प्रकरणाची दक्षता पथकामार्फत विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. आणखी जो दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा. बिलवाडी, ता. जामनेर) व रवींद्र भिमा मोरे (वय २९, रा. बोदवड) या दोन्ही कैद्यांना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या कामासाठी बराकमधून बाहेर काढण्यात आले होते. कारागृह रक्षकाची नजर चुकवून हे दोघेही पसार झाले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात आले होते. चौकशीनंतर त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.दोन वर्षांच्या कालावधीत दोन वेळा आरोपी पलायनाच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाशी चर्चा करुन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. कारागृहात काही उपायोजना करण्याच्याही सूचना देसाई यांनी दिल्या.हलगर्जीपणा खपवून घेणार नाहीबाळू बोरसे यांच्यावर ११ कैद्यांची जबाबदारी असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. देसाई यांनी कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले. दक्षता पथकाने चौकशी करताना कारागृहातील इतर आरोपींना या प्रकाराची माहिती होती का?, कारागृह प्रशासन कुठे कमी पडले याचीही माहिती जाणून घेतली. दक्षता पथकाकडून चौकशी अहवाल महानिरीक्षकांना सादर केला जाणार आहे.अंतर्गत गटबाजीची घेतली दखलकारागृहात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा मुद्दा छेडला असता, देसाई म्हणाले या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. त्याचे परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येतील. या गटबाजीचा परिणाम आरोपींवर देखील होत आहे. अनेक अधिकाºयांच्या तक्रारी आहेत. त्याचे पुरावे देखील आपल्याकडे आलेले आहेत, असेही देसाई यांनी मान्य केले. दुपारपर्यंत चौकशी करुन देसाई औरंगाबाद येथे रवाना झाले.दोन पथके रवानाकारागृहातून दोन आरोपी पलायन झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांचे दोन स्वतंत्र पथके रवाना झाली आहेत. गुरुवारी अमळनेर पोलिसांच्या तावडीतूनही गुन्हेगाराने पलायन केल्याने त्याच्याही शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले.अधीक्षकासह इतर पदे वाढविण्यावर भरकारागृह अधीक्षक डी.टी. डाबेराव यांच्या निलंबनानंतर कारागृहाचे अधीक्षक पद रिक्त आहे. प्रभारीवरच कामकाज केले जात आहे. त्यामुळे आता सर्वात आधी अधीक्षकाचे पद भरले जाणार असून शिपाई संवर्गातील पदे वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. जळगाव कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची आहे. परंतु, सद्यस्थितीत येथे ४५० कैदी आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान ८० शिपाई हवेत, प्रत्यक्षात आज ४० रक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यावर प्रचंड भार येत आहे, असेही योगेश देसाई म्हणाले. औरंगाबाद विभागात १४ कारागृह आहेत. नवीन शंभर पदे भरुन त्यांचे नियोजन करुन कर्मचारी वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगJalgaonजळगाव