शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सुरतालाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:14 PM

गीत महोत्सव : कलाकारांच्या सादरीकरणाने संध्याकाळ झालीखान्देश सं सुरमय

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव, जि.जळगाव, दि.१० : सुरांची दिव्यानुभूती, तालाची नादमयता आणि सुरतालाच्या रंगलेल्या रोमांचकारी जुगलबंदीने खान्देश संगीत महोत्सवाचा कळसाध्याय गाठत रसिकांना भारावून टाकले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता राजपूत लोकमंगल कार्यालयात झालेल्या स्वरोत्सवात चाळीसगावकरांची सायंकाळ सूरमयी झाली.महोत्सवाचे दीपप्रज्वालन व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रशांत मोराणकर, उद्योगपती प्रवीणभाई पटेल, अंबाजी ग्रुपचे मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, शरद मोराणकर आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बासरी वादक पंडित विवेक सोनार, सचिव घनश्याम सोनार यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला स्थानिक कलावंतांनी समूह गायन, सरगम व बासरी वादन सादर केले.‘तेरोहि ध्यान धरू दाता’चाळीसगावचे भूमिपुत्र धृपद गायक सागर मोराणकर यांनी राग गावतीमध्ये अलाप जोड व त्यानंतर चौतालात ‘तेरोहि ध्यान करू दाता’ यासह सुरतालात ‘कर्म करिजो मेरे साई’ तर सुततालातील ‘दुर्गे भवानी माता काली’ ही बंदीश सादर करून टाळ्यांची दाद मिळवली.रंगली सुरतालाची जुगलबंदीपंडित विवेक सोनार यांनी बासरीवर राग यमन सादर केला. त्यांना तबल्यावर उस्ताद फजल कुरेशी यांनी साथसंगत केली. बासरीचे सुर आणि तबलाचा ताल ही जुगलबंदी रसिकांना खिळवून ठेवणारी ठरली. विवेक सोनार यांनी सादर केलेल्या ‘धून’लाही दाद मिळाली.सुफी बंदीशीने सांगतामहोत्सवाची सांगता गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांच्या गायनाने झाली. त्यांनी पारंपरिक सुफी बंदीश ‘करिम करो’ सादर करून वाह..वाह.. मिळवली. त्यांनीच गायलेल्या भैरवीने सांगताही झाली.यावेळी पंजडत विवेक सोनार यांनी गुरुकुल प्रतिष्ठान राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नारायणदास अग्रवाल, वसंतराव चंद्रात्रे, नवीन दुग्गड, प्रेमचंद खिंवसरा, दिलीप रामराव चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.विजय गर्गे यांनी केले.

टॅग्स :musicसंगीत