शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:21 IST

गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसांपासून नळांना पाणीच नाहीमनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनमनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष कायम

जळगाव : गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे. मनपाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेविका जिजाबाई भापसे यांनी दिला आहे.शहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र सुप्रीम कॉलनी व परिसरात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होतो मात्र गेल्या ११ दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा झालेला नाही. रविवारी १२ वा दिवस होता. आज पाणी पुरवठा करण्यात येईल अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र झाला नाही. मनपाच्या अधिकाºयांकडे याबाबत तक्रार करुनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज नगरसेविका जिजाबाई भापसे यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांना जाब विचारला. त्यांनी मनपात याबाबत तक्रार केली मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले असल्याची माहिती नगरसेविकापूत्र सुरेश भापसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सुप्रीम कॉलनी परिसरात नितीन साहित्यानगर, खुबचंद साहित्या नगर, इंद्रप्रस्थ पोलीस कॉलनी, अमीत कॉलनी, ताजनगर, उस्मानियानगर अशा अनेक कॉलन्यांमध्ये सुमारे २५ हजार रहिवासी वास्तव्य करतात. तळ हातावर पोट असलेल्या रहिवाशांना १२ दिवसांपासून पाणी न मिळाल्याने प्रचंड हाल होत आहे. सोमवारी पाणी पुरवठा न झाल्यास मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव