शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

सुनील झवर माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय; चौकशीत सर्व निष्पन्न होईल- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:46 IST

पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झवर  हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहे. पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.  गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात पाऊस नसल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी  पत्रकारांशी बोलताना झवर यांच्याविषयी त्यांनी वरील वक्तव्य केले. 

कोणी सांगावे, निकटवर्तीय नाही?

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात मास्टरमाईंड सुनील झवर याला अटक झाल्यानंतर त्याचे कोणा-कोणाशी संबंध आहे, कोण निकटवर्तीय आहे, या विषयी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच झवर याच्याकडे काही मंडळींचे कागदपत्रेही सापडले. या अटकेनंतर झवर हे आपले निकटवर्तीय असण्याविषयी  गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. कायद्यानुसार जे होईल ते होणारच आहे. झवर हे तर सर्वांचेच निकटवर्तीय असून तसे नसल्यास कोणी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

सरसकट मदत करा

पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्या करूनही त्या वाया जात आहे. सर्वच पिके नष्ट झाले असून नदी, नाले, धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी,  जो पर्यंत ढग आहे, तोपर्यंत कृत्रिम पावसासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. या विषयी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष  लालचंद पाटील, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

मंत्र्यांचे केवळ दौरे, जिल्हावासीयांची निराशा

महाविकास आघाडीतील मंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे दौरे करीत आहे. त्यांनी यावे, मात्र जिल्ह्यासाठी काहीतरी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हे मंत्री येऊन निघून जातात, मात्र शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार करीत नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. गावागावत विजेचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनाही पुरेसी वीज मिळत नाही, रोहित्र जळाले तर ते मिळत नाही व ऑईलचे कारण सांगितले जाते. इतकी बिकट राज्यात कधी नव्हती. अशा परिस्थितीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव