शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

सुनील झवर माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय; चौकशीत सर्व निष्पन्न होईल- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:46 IST

पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झवर  हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहे. पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.  गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात पाऊस नसल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी  पत्रकारांशी बोलताना झवर यांच्याविषयी त्यांनी वरील वक्तव्य केले. 

कोणी सांगावे, निकटवर्तीय नाही?

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात मास्टरमाईंड सुनील झवर याला अटक झाल्यानंतर त्याचे कोणा-कोणाशी संबंध आहे, कोण निकटवर्तीय आहे, या विषयी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच झवर याच्याकडे काही मंडळींचे कागदपत्रेही सापडले. या अटकेनंतर झवर हे आपले निकटवर्तीय असण्याविषयी  गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. कायद्यानुसार जे होईल ते होणारच आहे. झवर हे तर सर्वांचेच निकटवर्तीय असून तसे नसल्यास कोणी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

सरसकट मदत करा

पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्या करूनही त्या वाया जात आहे. सर्वच पिके नष्ट झाले असून नदी, नाले, धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी,  जो पर्यंत ढग आहे, तोपर्यंत कृत्रिम पावसासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. या विषयी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष  लालचंद पाटील, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

मंत्र्यांचे केवळ दौरे, जिल्हावासीयांची निराशा

महाविकास आघाडीतील मंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे दौरे करीत आहे. त्यांनी यावे, मात्र जिल्ह्यासाठी काहीतरी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हे मंत्री येऊन निघून जातात, मात्र शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार करीत नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. गावागावत विजेचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनाही पुरेसी वीज मिळत नाही, रोहित्र जळाले तर ते मिळत नाही व ऑईलचे कारण सांगितले जाते. इतकी बिकट राज्यात कधी नव्हती. अशा परिस्थितीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव