जळगाव : तालुक्यातील रिधुर येथील तरुणभिमराव सखाराम कोळी (वय ३४ ) यांनी स्वतःच्या शेतातच लिंबाच्या झाडाला ठीबक नळीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी खबर दिल्यावरुन तालुका पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अनिल फेगडे करीत आहेत.
रिधुर येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 20:31 IST