आत्महत्येला सागरच जबाबदार : माधुरी सादरेंचे प्रतिज्ञापत्र
By Admin | Updated: October 29, 2015 00:26 IST2015-10-29T00:26:49+5:302015-10-29T00:26:49+5:30
जळगाव : निलंबित पोलीस निरीक्षक सादरे यांना आत्महत्या करण्यास वाळू व्यावसायिक सागर चौधरी हाच जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र अशोक सादरे यांच्या प} ी माधुरी सादरे यांनी नाशिक न्यायालयात सादर केले आहे.

आत्महत्येला सागरच जबाबदार : माधुरी सादरेंचे प्रतिज्ञापत्र
जळगाव : निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना आत्महत्या करण्यास वाळू व्यावसायिक सागर चौधरी हाच जबाबदार आहे. त्याच्यावर जळगावमध्ये अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे राजकीय लोकांशी संबंध आहेत. त्याच्या गुंडगिरीमुळे आमचे कुटूंब दहशतीखाली असल्याचे प्रतिज्ञापत्र अशोक सादरे यांच्या प} ी माधुरी सादरे यांनी नाशिक न्यायालयात सादर केले आहे.
प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, सागर याने अतिशय निर्दयीपणे व नियोजनपूर्वक संघटित गुन्हेगारीचे कृत्य करून सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे समाजविघातक कृत्य केले आहे. पती अशोक सादरे हे घरात एकमेव कर्तेपुरुष होते. आता कुटुंबात विधवा प
घातपाताची शक्यता व राजकीय आश्रय
सागर हा कुख्यात व सराईत गुन्हेगार आहे. आमच्या महितीनुसार त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई झालेली आहे. हा पूर्व इतिहास पाहता त्याच्याकडून घातपात होण्याची शक्यता आहे. त्याला राजकीय आश्रय आहे.
फिर्याद रद्दसाठी सागरचा अर्ज
सादरे यांच्या प्रकरणात आरोपी सागर चौधरी याने 482 अन्वये फिर्याद रद्द व्हावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याचे वृत्त आहे. या अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी कामकाज होणार आहे. नाशिक न्यायालयानेही त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी कामकाज ठेवले आहे.
साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता
अन्य दोन आरोपी हे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याने तपासात ढवळाढवळ व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. तसे झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही, असेही माधुरी सादरे यांनी नाशिक येथील न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ते प्रतिज्ञापत्र
दैनंदिन डायरी गायब
अशोक सादरे यांची दैनंदिन डायरी गायब झाल्याचेही लक्षात आले आहे. तपासकामी ही डायरी सापडणे महत्त्वाचे आहे. सागर याने यापूर्वी प्रांताधिकारी पल्लवी निर्मळ, नायब तहसीलदार चंद्रसिंह राजपूत, पो.कॉ.संजय बडगुजर, आनंदसिंग पाटील यांच्याविरुध्द तक्रारी केल्या आहेत. नंतर या तक्रारी खोटय़ा असल्याचे सिध्द झाले आहे.
}ी, दोन मुले, वृध्द आई असा परिवार आहे. ‘लोकमत’ला प्राप्त झाले आहे.