शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रामेश्वर कॉलनीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:17 IST

कारण अस्पष्ट : घरमालकाच्या रिकाम्या खोलीत घेतला गळफास

जळगाव : रामेश्वर कॉलनीत योगिता लिलाधर जयकर (१५, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ) या मुलीने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. दरम्यान, योगिता हिने आत्महत्या का? केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. योगिता ही यंदा दहावीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री योगिता हिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर सर्व जण झोपले, पहाटेच्या सुमारास उठून ती घराशेजारीच घरमालकाच्या एका रिकाम्या खोलीत गेली व तेथे तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७.३० कुटुंब झोपेतून उठले असता योगिता घरात नव्हती. शेजारी जावून पाहिले असता शेजारच्या खोलीत ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसली.आईने फोडला हंबरडायोगिताने गळफास घेतल्याचे दिसताच आईने हंबरडा फोडला. त्यामुळे कुटुंब धावून आले. त्यांनी भाऊ व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी योगिता हिला खाली उतरवून रिक्षातून दोन रुग्णालयांमध्ये नेले. तत्पूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. योगिता हीच्या वडीलांचे निधन झालेले आहे. ती आई, बहिण व भाऊ यांच्यासोबत राहत होती. रामेश्वर कॉलनीतील विद्यालयात ती शिक्षण घेत होती. उपनिरीक्षक संदीप पाटील व कॉ.विश्वजित सोनवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव