शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:25 IST

भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते

ठळक मुद्देभय्यूजी महाराज हे चाळीसगावी आल्यानंतर श्यामल जाधव यांच्याकडे जेवणात खान्देशी मेनू असायचा. थालीपिठ, मिरचीचा ठेचा, वांग्याची भाजी, पिठलं आणि भाकरी असे खान्देशी खाद्यपदार्थ ते आवडीने खात.श्याम जाधव यांनी ‘सूर्र्याेदय’ अध्यात्मिक परिवारातर्फे चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविले. अमळनेर येथे महाराजांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात चाळीसगाव तालुक्यातील ५१ जोडप्यांचे विवाह अवघ्या सव्वा रुपयात महाराजांच्या ट्रस्टमार्फत झाले.३ जून रोजी श्यामल जाधव यांच्याशी भय्यूजी महाराज भ्रमणध्वनीवरुन बोलले. हा मामा आणि भाची यांच्यातला शेवटचा मोबाईल संवाद ठरला. ‘बरेच दिवस झाले. चाळीसगावला फेरी झाली नाही. श्यामल मी येतोय, लवकरच तुुझ्याकडे चाळीसगावला,’ असं सांगताना श्यामल जाधव यांना गहिवरुन आ

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव (जि.जळगाव) : ‘श्यामल मी औरंगाबादला चाललोय. वाटेत तुझ्या घरी जेवण घेईल. छान पिठलं आणि भाकरी बनव... ‘मामा भय्यूजी महाराजांचा फोनवरचा हा निरोप ऐकला की, सगळं घर आनंदून जायचं. आता पुन्हा असा फोन येणार नाही. भय्यूजी महाराजांच्या आठवणींचा बांध फुटला अन् श्यामल जाधव यांना हुंदका अनावर झाला. भय्यूजी महाराज आणि श्यामल जाधव यांचे मामा - भाची असं नातं. महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण जाधव कुटूंबिय सुन्न झाले आहे.चाळीसगावच्या हनुमानवाडीत राहणाऱ्या श्याम आणि श्यामल जाधव यांच्या कुटुंबाशी भय्यूजी महाराजांचे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुंबध आहेत.२५ ते ३० वेळा भय्यूजी महाराज चाळीसगावी आपल्या भाचीला भेटण्यासाठी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे मुक्काम करुन महाराजांनी येथे गप्पांच्या मैफीलीही रंगवल्या आहेत. चाळीसगावात त्यांच्या ‘सूर्योदय’ परिवाराचे ३०हून अधिक साधक आहेत. त्यांच्यामार्फत परिसरात अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात.सांगोल्यात झाली नाती घट्टभय्यूजी महाराज यांची एक बहिण विजयालक्ष्मी साळुंखे ह्या सांगोल्यात (जि.सोलापूर) राहतात. विजयालक्ष्मी ह्या श्यामल जाधव यांच्या सख्ख्या काकू. बालपणापणासूनच भय्यूजी महाराज सांगोल्यात बहिणीकडे येतं. श्यामल यांचा विवाह चाळीसगाव येथील श्याम जाधव यांच्याशी झाल्यानंतर भय्यूजी महाराज आवर्जून येथे यायचे. मराठवाड्यात जाताना चाळीसगाव येथे भाचीच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय महाराजांचा पुढचा प्रवास सुरू होत नव्हता.भय्यूजी महाराज यांच्याशी आमचे नातेसंबंध असले तरी ते आमच्या परिवाराचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत- श्यामल व श्याम जाधव, चाळीसगाव. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपChalisgaonचाळीसगाव