शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:25 IST

भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते

ठळक मुद्देभय्यूजी महाराज हे चाळीसगावी आल्यानंतर श्यामल जाधव यांच्याकडे जेवणात खान्देशी मेनू असायचा. थालीपिठ, मिरचीचा ठेचा, वांग्याची भाजी, पिठलं आणि भाकरी असे खान्देशी खाद्यपदार्थ ते आवडीने खात.श्याम जाधव यांनी ‘सूर्र्याेदय’ अध्यात्मिक परिवारातर्फे चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविले. अमळनेर येथे महाराजांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात चाळीसगाव तालुक्यातील ५१ जोडप्यांचे विवाह अवघ्या सव्वा रुपयात महाराजांच्या ट्रस्टमार्फत झाले.३ जून रोजी श्यामल जाधव यांच्याशी भय्यूजी महाराज भ्रमणध्वनीवरुन बोलले. हा मामा आणि भाची यांच्यातला शेवटचा मोबाईल संवाद ठरला. ‘बरेच दिवस झाले. चाळीसगावला फेरी झाली नाही. श्यामल मी येतोय, लवकरच तुुझ्याकडे चाळीसगावला,’ असं सांगताना श्यामल जाधव यांना गहिवरुन आ

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव (जि.जळगाव) : ‘श्यामल मी औरंगाबादला चाललोय. वाटेत तुझ्या घरी जेवण घेईल. छान पिठलं आणि भाकरी बनव... ‘मामा भय्यूजी महाराजांचा फोनवरचा हा निरोप ऐकला की, सगळं घर आनंदून जायचं. आता पुन्हा असा फोन येणार नाही. भय्यूजी महाराजांच्या आठवणींचा बांध फुटला अन् श्यामल जाधव यांना हुंदका अनावर झाला. भय्यूजी महाराज आणि श्यामल जाधव यांचे मामा - भाची असं नातं. महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण जाधव कुटूंबिय सुन्न झाले आहे.चाळीसगावच्या हनुमानवाडीत राहणाऱ्या श्याम आणि श्यामल जाधव यांच्या कुटुंबाशी भय्यूजी महाराजांचे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुंबध आहेत.२५ ते ३० वेळा भय्यूजी महाराज चाळीसगावी आपल्या भाचीला भेटण्यासाठी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे मुक्काम करुन महाराजांनी येथे गप्पांच्या मैफीलीही रंगवल्या आहेत. चाळीसगावात त्यांच्या ‘सूर्योदय’ परिवाराचे ३०हून अधिक साधक आहेत. त्यांच्यामार्फत परिसरात अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात.सांगोल्यात झाली नाती घट्टभय्यूजी महाराज यांची एक बहिण विजयालक्ष्मी साळुंखे ह्या सांगोल्यात (जि.सोलापूर) राहतात. विजयालक्ष्मी ह्या श्यामल जाधव यांच्या सख्ख्या काकू. बालपणापणासूनच भय्यूजी महाराज सांगोल्यात बहिणीकडे येतं. श्यामल यांचा विवाह चाळीसगाव येथील श्याम जाधव यांच्याशी झाल्यानंतर भय्यूजी महाराज आवर्जून येथे यायचे. मराठवाड्यात जाताना चाळीसगाव येथे भाचीच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय महाराजांचा पुढचा प्रवास सुरू होत नव्हता.भय्यूजी महाराज यांच्याशी आमचे नातेसंबंध असले तरी ते आमच्या परिवाराचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत- श्यामल व श्याम जाधव, चाळीसगाव. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपChalisgaonचाळीसगाव