चार गावांत वादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:11+5:302021-06-02T04:14:11+5:30
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील ...

चार गावांत वादळाचा फटका
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील पिंपरीसेकम, फुलगाव, साकरी, जाडगाव या भागांतील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झाले. आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने नुकसान झाल्याच्या घटनेनंतर, आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांनी ३१ रोजी तालुक्यातील बाधित क्षेत्रातील नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर, नुकसानीचा आकडा समोर येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. बहुतांश शेती क्षेत्र हे खाली आहे. बागायती क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केळ्याचे पीक उभे आहे. याच केळी पिकावर वादळी पावसाचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून या पिकांचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. मात्र, त्या तुलनेत नुकसानभरपाई मिळत नसल्याने, शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. मागील वर्षापासून कोरोनाचे सावट असल्यामुळे शेेतकऱ्यांना उत्पन्न काही प्रमाणात का होईना झाले. मात्र, त्याला योग्य भाव न मिळाल्याने उत्पन्न जेमतेमच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना, शासन स्तरावरून उदार मनाने मदत द्यावी, तसेच यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शासन स्तरावर प्रयत्न करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून होत आहे.
===Photopath===
010621\01jal_8_01062021_12.jpg
===Caption===
वादळी पावसात नुकसान पिकाची पाणी करताना आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे.