जिल्हा परिषदेत २० पासून बदली प्रक्रियेला सुरुवात
By Admin | Updated: May 18, 2014 01:30 IST2014-05-18T01:30:53+5:302014-05-18T01:30:53+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेत येत्या २० तारखेपासून बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषदेत २० पासून बदली प्रक्रियेला सुरुवात
जळगाव : जिल्हा परिषदेत येत्या २० तारखेपासून बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यातच शासनाने शिक्षकांच्या बदलींना स्थगिती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घ्यावे. पण बदली करू नयेत, असे निर्देश आल्याची चर्चा होती. पण जि.प.प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला नाही. २० रोजी बाल कल्याण विभाग, कृषी, पशुसंवर्धन व आरोग्य विभाग २१ रोजी ग्रामपंचायत विभाग, अर्थ आणि बांधकाम विभाग, २२ रोजी शिक्षण विभाग, २३ रोजी सामान्य प्रशासन, ग्रामीण पाणीपुरवठा व सिंचन विभागातील बदलीस पात्र कर्मचार्यांच्या समुपदेशनाने बदली केल्या जातील. समुपदेशनासाठी शाहू महाराज सभागृहामध्ये व्यवस्था आहे.