शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेती आणि शेतकºयांची व्यथा

By ram.jadhav | Updated: November 14, 2017 00:30 IST

शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़

ठळक मुद्दे ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावेशेतीसाठी लागणारे पाणी मिळावेशेतकºयांनी आत्महत्या करू नयेत

आॅनलाईन लोकमत, दि़ १४, नोव्हेंबर -

डॉ.अशोक ओ. पाटील बिडगाव ता.चोपडा : शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़ मात्र केवळ सरकारवर अवलंबून न राहता शेतकºयांनी स्वत:ही काही अडचणींवर मात करण्यासाठी उपाय शोधावेत यादृष्टीने प्रयत्न करायला हवे़ याबाबत एका माजी कृषी अधिकाºयांनी मांडलेली काही माहिती़ इथे कुठलेही तक्ते अथवा आकडेवारी नाही. शेतकºयांना आज असलेल्या काही अडचणींबाबत व शासनाने शेतकºयांसाठी काय केले पाहिजे याबाबत थोडक्यात उहापोह करण्यात आला आहे़आपल्या देशात जमीनधारकता (लँड होल्डींग) फार कमी आहे. शेतीसाठी मजूर उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत ते फार महाग आहेत. यामुळे सुध्दा शेती परवडत नाही. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. जमीनधारकता कमी असल्यामुळे शेतकरी शेतीसाठी लागणारी यंत्रे घेऊ शकत नाही, म्हणून शासनाने जे तरुण होतकरू आहेत, अशा तरुणांना अनुदानावर बँकेचे कर्ज करून यंत्रे उदा.- ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, नांगर, पेरणीयंत्र आदी उपलब्ध करून दिले जावेत़वीजेची समस्या मोठी :शेतकºयांची फार मोठी समस्या आहे ती म्हणजे वीज. शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होण्याचे एक प्रमुख कारण आहे. शेतकºयांना शेतीसाठी जी वीज लागते ती जितके तास दिली जाते ती फूल व्होल्टेज (शेती पंपासाठी लागणारे) मध्ये द्यायला हवी. व्होल्टेज कमी/जास्तमुळ पंप जळतात. वर्षातून १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. हे केल्यास शेतकरी वीज बिल भरतीलच. नाही भरल्यास वीज जोडणी तोडावी़ या तरुणांनी शेतकºयांना कमी दराने भाड्याने ही यंत्रे उपलब्ध करून द्यावीत. काही प्रमाणात तरुणांचा बेकारीचा प्रश्न सोडविण्यासही मदत होईल आणि शेतकºयांचेही पैसे वाचतील.शासनाने ठिबक सिंचनासाठी जास्तीतजास्त सबसिडी द्यायला हवी. यातून पाण्याची बचत होईल आणि उपलब्ध पाण्यावर अधिकाधिक क्षेत्र बागायती पिकाखाली आणता येईल व शाश्वत शेती करता येईल़ शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव मिळावा : शेतकºयांच्या मालाला जर उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला. वीज, पाणी व्यवस्थित दिले, तर कुठलाही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही आणि वीज बिलही थकणार नाही.वॉटर कॉन्झरव्हेशन, पाणी अडवा-पाणी जिरवा यासाठी खेड्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे, तेथे लहान लहान बांध घालून पाणी अडवायला पाहिजे. कारण आज आपली महाराष्ट्राची मुख्य समस्या शेतीसाठी लागणाºया पाण्याची आहे. आज शेतकºयांच्या विहिरी ट्यूबवेल पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. धरण बांधणे हा सुध्दा पर्याय आहे. परंतु धरण बांधल्यानंतर कालव्याच्या माध्यमातून ते पाणी शेतकºयांच्या बांधावर लवकरात लवकर कसे जाईल आणि शेतकरी बागायती शेती कशी करेल हे फार महत्वाचे आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक पाणी आहे.जमिनीचे आरोग्य तपासले पाहिजे : जमिनीचा सामू, उपलब्ध मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये याबाबत अतिशय प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. जेणेकरून खतांवर होणारा विनाकारणचा खर्च वाचू शकेल़ नाही तर शेतकरी शेतांमध्ये अनभिज्ञपणे खतांचा वापर करत असतो. कोणीही आत्महत्या करू नये. कारण दररोज सायंकाळी तुमची वाट बघणारे असतात आणि ज्यांचे भविष्य फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे ते कुटुंब तुमच्यामागे आहे.शेतकºयांना सर्व प्रकारची किटकनाशके बुरशीनाशके व इतर नियंत्रित किमतीत व गुणवत्ता तपासून मिळायला हवेत़ जेणेकरून शेतकºयांचे आर्थिक नुकसान न होता, त्यांना योग्य परिणाम मिळतील़ तसेच यवतमाळ सारख्या दुर्घटना होणार नाहीत़