शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

शेती आणि शेतकºयांची व्यथा

By ram.jadhav | Updated: November 14, 2017 00:30 IST

शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़

ठळक मुद्दे ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावेशेतीसाठी लागणारे पाणी मिळावेशेतकºयांनी आत्महत्या करू नयेत

आॅनलाईन लोकमत, दि़ १४, नोव्हेंबर -

डॉ.अशोक ओ. पाटील बिडगाव ता.चोपडा : शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़ मात्र केवळ सरकारवर अवलंबून न राहता शेतकºयांनी स्वत:ही काही अडचणींवर मात करण्यासाठी उपाय शोधावेत यादृष्टीने प्रयत्न करायला हवे़ याबाबत एका माजी कृषी अधिकाºयांनी मांडलेली काही माहिती़ इथे कुठलेही तक्ते अथवा आकडेवारी नाही. शेतकºयांना आज असलेल्या काही अडचणींबाबत व शासनाने शेतकºयांसाठी काय केले पाहिजे याबाबत थोडक्यात उहापोह करण्यात आला आहे़आपल्या देशात जमीनधारकता (लँड होल्डींग) फार कमी आहे. शेतीसाठी मजूर उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत ते फार महाग आहेत. यामुळे सुध्दा शेती परवडत नाही. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. जमीनधारकता कमी असल्यामुळे शेतकरी शेतीसाठी लागणारी यंत्रे घेऊ शकत नाही, म्हणून शासनाने जे तरुण होतकरू आहेत, अशा तरुणांना अनुदानावर बँकेचे कर्ज करून यंत्रे उदा.- ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, नांगर, पेरणीयंत्र आदी उपलब्ध करून दिले जावेत़वीजेची समस्या मोठी :शेतकºयांची फार मोठी समस्या आहे ती म्हणजे वीज. शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होण्याचे एक प्रमुख कारण आहे. शेतकºयांना शेतीसाठी जी वीज लागते ती जितके तास दिली जाते ती फूल व्होल्टेज (शेती पंपासाठी लागणारे) मध्ये द्यायला हवी. व्होल्टेज कमी/जास्तमुळ पंप जळतात. वर्षातून १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. हे केल्यास शेतकरी वीज बिल भरतीलच. नाही भरल्यास वीज जोडणी तोडावी़ या तरुणांनी शेतकºयांना कमी दराने भाड्याने ही यंत्रे उपलब्ध करून द्यावीत. काही प्रमाणात तरुणांचा बेकारीचा प्रश्न सोडविण्यासही मदत होईल आणि शेतकºयांचेही पैसे वाचतील.शासनाने ठिबक सिंचनासाठी जास्तीतजास्त सबसिडी द्यायला हवी. यातून पाण्याची बचत होईल आणि उपलब्ध पाण्यावर अधिकाधिक क्षेत्र बागायती पिकाखाली आणता येईल व शाश्वत शेती करता येईल़ शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव मिळावा : शेतकºयांच्या मालाला जर उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला. वीज, पाणी व्यवस्थित दिले, तर कुठलाही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही आणि वीज बिलही थकणार नाही.वॉटर कॉन्झरव्हेशन, पाणी अडवा-पाणी जिरवा यासाठी खेड्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे, तेथे लहान लहान बांध घालून पाणी अडवायला पाहिजे. कारण आज आपली महाराष्ट्राची मुख्य समस्या शेतीसाठी लागणाºया पाण्याची आहे. आज शेतकºयांच्या विहिरी ट्यूबवेल पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. धरण बांधणे हा सुध्दा पर्याय आहे. परंतु धरण बांधल्यानंतर कालव्याच्या माध्यमातून ते पाणी शेतकºयांच्या बांधावर लवकरात लवकर कसे जाईल आणि शेतकरी बागायती शेती कशी करेल हे फार महत्वाचे आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक पाणी आहे.जमिनीचे आरोग्य तपासले पाहिजे : जमिनीचा सामू, उपलब्ध मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये याबाबत अतिशय प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. जेणेकरून खतांवर होणारा विनाकारणचा खर्च वाचू शकेल़ नाही तर शेतकरी शेतांमध्ये अनभिज्ञपणे खतांचा वापर करत असतो. कोणीही आत्महत्या करू नये. कारण दररोज सायंकाळी तुमची वाट बघणारे असतात आणि ज्यांचे भविष्य फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे ते कुटुंब तुमच्यामागे आहे.शेतकºयांना सर्व प्रकारची किटकनाशके बुरशीनाशके व इतर नियंत्रित किमतीत व गुणवत्ता तपासून मिळायला हवेत़ जेणेकरून शेतकºयांचे आर्थिक नुकसान न होता, त्यांना योग्य परिणाम मिळतील़ तसेच यवतमाळ सारख्या दुर्घटना होणार नाहीत़