शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आधीच त्यांचे गाव लांब, मग काय विचारता! जळगावमध्ये शिकायला आलेले काही विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाताच आले नाही

By अमित महाबळ | Updated: October 23, 2022 22:14 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत.

जळगाव : दिवाळीचा सगळीकडे उत्साह आहे. बाहेरगावी शिक्षण वा नोकरीसाठी गेलेले जळगावात परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत दीपोत्सव साजरा करत आहे पण जळगावमध्ये बाहेरगावहून शिकायला आलेले काही विद्यार्थी असेही आहेत, की त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जाता आलेले नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत. ऋची झा ही विद्यार्थिनी एमबीबीएसच्या चतुर्थ वर्षाला आहे. ती चार वर्षांपासून जळगावात शिकायला आहे. आताची तिची दुसरी दिवाळी अशी आहे, की तिला घरी जाता आलेले नाही. परिवारासोबत दिवाळी साजरी करता येत नसल्याची रूखरूख तिच्या मनात आहे. तिचे गाव (कोची) केरळमध्ये आहे. जळगावहून गावी जायला दोन दिवस लागतात आणि पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यासाला महत्त्व द्यावे लागत आहे.

ती जळगावात, बहिण दिल्लीत, भाऊ केरळमध्ये -ऋची हिची बहीण सिव्हील सर्व्हिसची तयारी करण्यासाठी दिल्लीत आहे. लहान भाऊ, आई व वडील केरळमध्ये आहेत. हॉस्टेल लाईफची सवय झाली आहे. दिवाळीचा आनंद म्हणून एक दिवस अभ्यासातून सुटी घेईल, सगळ्या जणी मिळून जेवायला जाऊ. तेच आमच्यासाठी सेलिब्रेशन असेल, असे ऋची म्हणाली. हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनी दिवाळीसाठी आपापल्या गावी गेलेल्या आहेत.

रेल्वे वा विमानाने जा, मिरांगासाठी प्रवास बराच मोठा -नवी पेठेतील विद्यार्थी वसतिगृहात राहणारा मिरांगा हा मूळचा अरूणाचल प्रदेशातील आहेत. इटानगरजवळ त्याचे गाव आहे. जळगावहून रेल्वेने जायचे तर अडीच दिवस लागतात. मुंबईमार्गे विमानाने जायला एक दिवस लागतो. रेल्वे वा विमान कसेही जा, गोहात्तीपासून पुढे सात ते आठ तासांचा बसचा प्रवास करावाच आहे. पुढच्या महिन्यात त्याचीही परीक्षा आहे. त्यामुळे तो दिवाळीला घरी गेला नाही. घरी आई-वडील, बहिण व भाऊ आहेत. त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करायला मिळणार नाही पण जळगावमध्ये मित्रांसोबत दिवाळी साजरी करू, असे मिरांगा म्हणाला.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयDiwaliदिवाळी 2022