शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

खान्देशातील काही ज्ञात, काही अज्ञात संत-महंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:24 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये साहित्यिक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

श्री दासगणू विरचित श्री भक्तीसारामृत ग्रंथातूनही खान्देशच्या संत परंपरेचा एक धागा उलगडताना दिसतो. औरंगाबाद नजीकच्या अवणे शिवणे गावात गोपजींच्या वंशातले बापूजीपंत पिता व उमाबाई माता यांचे चिरंजीव दादा महाराज यांचा प्रवास खान्देशात झाला होता. दादांचे मूळचे नाव विठ्ठल. हे पारोळा, बोदवड येथे आले होते. ते सिन्नरलाही आले होते. धुळ्याजवळच्या डोंगराळ गावी परमानंद आणि लालमती हे सदाचरणी दाम्पत्य राहात होते. या राजपूत परिवारात पौष वद्य चतुर्थी 1760 साली टीकारामजींचा जन्म झाला. त्यांनी खूप लांबवरची यात्रा केली. उग्र तपाचरण केले. अनेक साधू संतांशी संवाद साधला. तापी काठावर त्यांना नाथ पंथात दीक्षा मिळाली. धुळे, पारोळा येथे त्यांचे वास्तव्य होते. संत टीकाराम यांची शिष्य परंपरा संप्रदायमुक्त असल्यामुळे त्यांचे गुल मोहम्मद, त्रिंबकराव कन्नडकर, वामनराव आवराढकर, वेरुळचे बाबा अग्नीहोत्री हे सत्पुरुष शिष्य होते. संत टीकाराम यांनी विपुल ग्रंथलेखन केले. पुढे त्यांच्या गादीवर लक्ष्मणसिंह यांचे पुत्र मेघराजनाथ गंगारामनाथ बसले. चैत्र शुद्ध द्वादशी शनिवारी प्रदोष काळी 1845 साली त्यांचे निर्वाण झाले. नगर जिल्हय़ातल्या भाम पाटोदे नामक नगरीत गोदावरीच्या तटावर वज्रा नदीकाठी विठ्ठलपंत, रुख्मिणी हे दाम्पत्य राहात होते. त्यांच्या वंशातली गंगाधररावांची मुले जळगाव जामोद येथे वाढली. पुढे पांडुरंग दीनानाथ इथेच वास्तव्याला होते. माहूर गडावर नारायण नामक एक कण्वशाखीय ब्राrाण गृहस्थ होते. त्यांच्या परिवारातले हरिदास नर्मदा काठावरून प्रदक्षिणा करून खंडवा येथून रावेरला आले होते. ब:हाणपूर येथून ते रावेरला आले. खरे तर ते श्री वालचंद शेठजींच्या प्रयत्नामुळे यावलला आले. पुढे त्यांच्या परंपरेतले नानाबुवा खंडवा येथे गादीवर विराजमान झाले. यांच्या प्रयत्नांमुळे रावेर येथे एका नव्या भागवत धर्माची गुढी उभारली गेली होती. इसवी सन 1300 सालची ही घटना आहे. रावेर येथे बारी समाजाचे श्री आवजी सिद्ध महाराजांचा जन्म झाला. पिता महादेव, माता पार्वती. महाराज सूरदारांप्रमाणे जन्मत:च प्रज्ञाचक्षू होते. बालपणी माता-पिता निवर्तले. मावशीने पालनपोषण केले. मावशीकडे सुनगावसाठी प्रस्थान करताना महाराजांनी आपली नेत्रव्यथा आणि एकूणच जीवनातील व्यथा सांगितली. मार्गात बंभाडा येथे श्री कोथलकर परिवारात विश्राम केला. मावशी लेकराला शिवमहात्म्य सांगत होती. माघ महिना होता. महादेवाच्या दर्शनाला दिंडी निघाली होती. आवजीने मावशीला दिंडी कुठे आणि का निघाली आहे, असे विचारले असता मावशीने सारी कथा निवेदिली. आपले जीवन महादेवाप्रती समर्पित करण्याच्या भावनेने महाराज प्रेरित झाले. सालबर्डीच्या गुंफेत महाराजांनी दिंडीसोबत शिवप्रतिमेचे दर्शन घ्यायचे ठरवले. नेत्रहीन असल्यामुळे शिवदर्शन होणे तर काही शक्य नव्हते. आपण शिवदर्शनाला असमर्थ आहोत, असे वाटून महाराजांनी दरीत उडी ठोकली. माता पार्वतीने त्याना वरचेवर ङोलून घेतले. प्रत्यक्ष दर्शन दिले. महाराज तृप्त झाले. आपणास नेत्रज्योती प्राप्त व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली असता त्यांचे जीवन पालटले. महाराजांना जगदंबेने आदेश दिला की आता त्यांनी गृहस्थधर्माचे आचरण करावे पण महाराजांनी परत दरीत उडी मारली असता महादेवाने त्यांना गृहस्थ धर्माचे पालन करायचा सल्ला दिला पण महाराजांनी आपले जीवन शिवचरणी समर्पित करायचा निश्चय केला होता. मावशी वाट बघत राहिली. मावशीला स्वप्नदर्शन झाले आणि सारी कथा कळली. गाडगे महाराजांच्या परंपरेत बारी समाजातल्या रुपलाल महाराजांचे नाव येते. संत रुपलाल महाराज पहूरचे निवासी होते. जळगाव जामोद येथे 1937 साली 21 दिवस निराहार राहून त्यांनी नामसप्ताह आयोजित केला होता. त्यांनी एका धर्मशाळेची निर्मिती केली. या कार्यक्रमासाठी गाडगे बाबा यांच्यासमवेत संत मंडळ उपस्थित होते. पुढे महाराज आकोट येथे गेले. आकोटचा समारंभ पूर्ण झाल्यावर हिमालयात 12 वर्षे तपसाधना केली. 1971 साली महाराज अंजनगाव सुर्जी येथे आले. तिथे सन 1976 साली एका विठ्ठल मंदिराची उभारणी केली. पंढरपूर येथेही धर्मशाळा उभारली. 17 एप्रिल 1994 साली महाराजांनी देह ठेवला. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आजही अंजनगाव सुर्जी व जळगाव जामोद येथे चैत्र शुध्द पंचमी दिनी साजरा होतो.