शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

निकाल व गुणवत्तेत हवी समानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 6:53 PM

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे ...

विद्यार्थ्यांचा समग्र व सर्वांगीण विकास होण्यासाठी गुण महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान महत्त्वाचे आहे़ कोणत्याही विषयाचे ज्ञान अवगत झाले, म्हणजे आपोआप गुणात्मक वाढ होते़ महाराष्ट्र राज्य बोर्डाने विज्ञान व गणित या विषयांत अंतर्गत गुणदान पद्धती सुरू ठेवलेली आहे़ ती मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विषयांसाठीच रद्द केली आहे़ हे अव्यवहार्य वाटते़ कारण, भाषेचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेतून करता येणे शक्य नाही़ भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता आले पाहिजे. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे तिच्या प्रकटीकरणावर अवलंबून असते़ एखाद्या विद्यार्थ्याने भाषा विषयाच्या लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले. मात्र, व्यवहारात किंवा वक्तृत्व स्पर्धेत त्यास जर शुद्ध बोलता येत नसेल तर मिळालेले गुण अर्थशून्य आहेत़ म्हणूनच भाषा विषयांचे मूल्यमापन हे कौशल्याधिष्ठित असते. तसेच तेस तोंडी व लेखी परीक्षेद्वारेसुद्धा व्हायला हवे. अंतर्गत गुण देतांना शाळेने तसेच विषय शिक्षकांनी कोणतेही हितसंबंध, प्रलोभन अथवा गुण-वाढ यांचा विचार करू नये़ विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा तसेच भाषेच्या उपयोजनाबाबत सर्वांगीण आढावा घ्यावा. त्यानंतर गुणदान करावे. यामध्ये पारदर्शकता असावी़ तोंडी परीक्षेत कितीही गुण असो, लेखी परीक्षेत मात्र एक तृतीयांश गुण असायलाच हवेत. निकालातील गुण आणि गुणवत्ता यात मात्र तफावत जाणवायला नको.-गोपाळ आनंदा बानाईतजिल्हास्तरीय इंग्रजी विषयतज्ज्ञ, वरणगाव़, ता़ भुसावऴ