शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

केटी वेअर असूनही नसल्यासारखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:02 PM

कजगाव : केटी वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने होते पाण्याची गळती, बंधाऱ्याच्या पायावर स्लॅबची गरज

आॅनलाई लोकमतकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव, दि. २१ : कजगाव, उमरखेड व पासर्डी या तीन गावालगत तितूर नदीपात्रात साधारण पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे तीन के.टी.वेअर सन २००७ मध्ये बनविण्यात आले. या तिघे के.टी.वेअरचे काही काम निधीअभावी अपूर्ण पडले तर के.टी.वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने गळती थांबत नसल्याने यात पाण्याचा साठा होत नाही.या तिघा के.टी. वेअरची स्थिती ही ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच काहीशी झाली आहे. या महत्त्वपूर्ण बाबीकडे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष देऊन अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करावा. या के.टी.वेअरच्या पायावर एक ते दीड मीटरच्या स्लॅबची पडदी ओतण्याची गरज आहे. जेणेकरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी येथे अडेल व पाण्याचा साठा येथे होणार आहे.सन २००६ मध्ये कजगाव, उमरखेड, पासर्डी या तीन गावांसाठी तीन के.टी. वेअर मंजूर करण्यात आले. यात कजगावच्या के.टी. वेअरसाठी अंदाजे एक कोटी तेरा लाख रुपये खर्च झाले.याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे ३८ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण अडीच ते तीन किलोमीटर, उमरखेड येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ७९ लाख रुपये खर्च झाले. याची पाणी अडविण्याची क्षमता १९ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण दोन ते अडीच किलोमीटर, तर पासर्डी येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ८२ लाख रुपये खर्च झाले.याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे १८.५ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र दोन ते अडीच किलोमीटर असे हे अंदाजे पावणेतीन कोटी रुपयांचे भव्य के.टी. वेअर या भागात उभे झाल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, पुन्हा या भागात केळी बहरेल, पासर्डी ते उमरखेड या दरम्यानची शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल, या आशेवर सारेच होते.मात्र के.टी. वेअरच्या अपूर्ण कामामुळे पाहिजे त्या प्रमाणात या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविता येत नव्हते, तर काही प्रमाणात अडकलेल्या पाण्यास प्लेटांच्या गळतीमुळे अडकलेले पाणी वाहून जात असल्याने के.टी. वेअर कोरडा पडत असतो. यामुळे हे के.टी.वेअर असूनही नसल्यासारखेच झाले आहे.आठ गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागणारकजगाव, उमरखेड, तांदुळवाडी, पिंप्री, भोरटेक, घुसर्डी, पासर्डी, मळगाव या गावांना केवळ तितूर नदीचा सहारा आहे. कारण गिरणेच्या लाभ क्षेत्रामध्ये जरी ही गावे मोडली जातात तरी मात्र कोणताही लाभ या गावांना गिरणेचा नाही. सारी दारोमदार तितूर नदीवर आहे आणि या नदीच्या प्रवाहात अनेक सिमेंट बंधारे बनत असल्याने प्रत्येक गावाचे पाणी त्या-त्या बंधाºयात अडकत असल्याने पाणी खालच्या गावापर्यंत पोहचत नसल्याने या आठ गावांची स्थिती भविष्यात फार बिकट होऊ शकते. कारण या नदीवर अनेक ठिकाणी विनागेटचे सिमेंट बंधारे बनविण्यात आले असल्याने या नदीचे पाणी भडगाव व पाचोरा तालुक्यातील या आठ गावात पोहचणार नाही. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बागायत शेतीचा प्रश्न उभा राहू शकतो. यासाठी ठोस अशी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Bhadgaon भडगाव