शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू- वरांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 3:53 PM

४५ दिवस मेहनत घेणार : गाव पाणीदार करण्यासाठी टाकळीकर सरसावले

पाळधी ता जामनेर : तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे गाव पाणीदार करण्यासाठी नव वधू-वरांनी लग्न मंडपात बोहल्यावर चढण्यापूवी गावातील श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.टाकळी बुद्रुक या गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला आहे. ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात झाली आहे व यात दररोज शेकडोच्या वर महिला व पुरुष सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत आहेत. नोकरी निमित्त गेलेले गावकरी,माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक या बरोबरच सुट्टीवर आलेले सैनिक कैलास नरवाडे यांनी सुद्धा श्रमदानात आपला सहभाग नोंदवलाया सर्वांचा उत्साह पाहून गावातील युवक गजानन सपकाळ याने गाव पाणीदार झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्धार केला होता परंतु श्रमदानाचे ७०टक्के काम पूर्ण झाल्याने या युवकाने लग्न लागण्यापूर्वी नववधू व वºहाडी मंडळीसह गावाबाहेरील श्रमदानाच्या कार्यात श्रमदान करून हातभार लावत गावकऱ्यांसह पाणी फाउंडेशन टीमचा उत्साह वाढविला.दररोज शेकडो गावकरी करतात श्रमदान८ एप्रिल पासून श्रमदानास सुरुवात झाली असून ४५ दिवस ही स्पर्धा चालणार आहे.यात सुरुवातीला अवघड वाटणारे काम आता गावातील सर्व जाती धर्माचे लोक सर्व मतभेद विसरून एकत्र आल्याने सहज शक्य वाटत आहे. श्रमदान करण्यासाठी लागणारे साहित्य हे वेगवेळ्या संस्था व दानशूर व्यक्तीकडून उपलब्ध करून दिले आहे.