शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते? स्टार ११२६ मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते? मागणी ...

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

स्टार ११२६

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

मागणी : भाजप म्हणते उघडायला हवीत, तर सेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी म्हणते कोरोना गेल्यानंतरच मंदिरे उघडावीत

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनाने काही महिने मंदिरांसह विविध धार्मिक स्थळेही बंद ठेवली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही खबरदारी म्हणून शासनाने मंदिरे बंद ठेवली होती; मात्र दुसरी लाट पूर्णपणे निवळली असली तरी, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंदिरे न उघडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे; परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्याप्रमाणे मंदिरेदेखील उघडण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपाने दोन दिवसांपूर्वी राज्यभर ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर आंदोलन केले.

या आंदोलनामुळे मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली असून, काही वर्गातून मात्र कोरोना संपेपर्यंत तरी सरकारने मंदिरे न उघडण्याची मागणी होत आहे. याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मंदिरे उघडण्याबाबत त्यांच्या मनातले जाणून घेतले असता, त्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे, मंदिरे उघडणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे कोरोनानंतर मंदिरे उघडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

इन्फो :

मंदिरांवर अनेकांची उपजिविका असल्याने मंदिरे उघडावीत -

सरकारने अनलॉकनंतर सर्व प्रकारची दुकाने आणि बाजारपेठा उघडण्याची परवानगी दिली. मग, मंदिरे उघडण्यासाठी परवानगी का नाही. गेल्या दीड वर्षांपासून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद असल्यामुळे, मंदिरांवर अवलंबून असलेल्या अनेकांच्या उपजीविकेवर यामुळे परिणाम झाला आहे. ते बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे सरकारने कमीत-कमी २० लोकांच्या परवानगीची अट घालून, मंदिरे उघडणे गरजेचे आहे. अशी आमची मुख्य मागणी आहे.

सुरेश भोळे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, भाजपा.

मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय हा जनतेच्याच हिताचा :

मंदिरे उघडण्याला आमचा विरोध नाही; मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो जनतेच्या हिताचा आहे. त्यात उगाचच मंदिरे उघडण्याची मागणी करून धरणे आणि राजकारण करणे, हे योग्य नाही. राज्यात सर्व वयोगटातील लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सरकार योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेईल. सरकारच्या योग्य निर्णयांचे राजकारण न करता, समर्थन करणे गरजेचे आहे.

-ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावरच, मंदिरे उघडावीत :

मंदिरे उघडायला हवीत, अशी आमचींही इच्छा आहे; मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊनच सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा कोरोना बांधितांची संख्या वाढू नये, म्हणून सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी करणे योग्य नाही. सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावरच, मंदिरे उघडणे गरजेचे आहे.

ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

केंद्राच्या गाइडलाइननुसारच मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जे अनुभवले, ते पुन्हा तिसऱ्या लाटेत होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जी गाइडलाइन्स दिली आहे, त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे हे जनतेच्याच हिताचे आहे. सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करीत असताना, मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकारण करणे योग्य नाही.

-विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.