शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बोगस कीटकनाशकप्रकरणी दुकानाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST

मुक्ताईनगर : बोगस कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकान व शेतीची पाहणी करून तपासणी केली. ...

मुक्ताईनगर : बोगस कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकान व शेतीची पाहणी करून तपासणी केली.

कीटकनाशकांच्या नावावर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील विजय कुलकर्णी या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. मुक्ताईनगरातील सागर सीड्स या कृषी दुकानातून बायो ३०३ कंपनी दमणचे हे कीटकनाशक घेतले होते. मिरची पिकावर फवारणी केली असता लाखो रुपयांच्या मिरचीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संबंधित दुकानदाराची तक्रार केली होती. कृषी अधिकारी त्या कीटकनाशकाच्या बाटलीचे नमुने घेण्यासाठी त्या दुकानात गेले असता दुकानात ते कीटकनाशक शिल्लक नसल्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी सांगितले.

शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर लाॅट नंबर नसल्याने तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी त्या दुकानदाराला नोटीस बजावली.

याप्रकरणी तपासणीसाठी जळगाव येथील कृषी विभागाचे गुणनियंत्रण अधिकारी अरुण तायडे व तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी २० रोजी नुकसानग्रस्त मिरची पिकाची पाहणी केली तसेच मुक्ताईनगरातील सागर सीड्स या कृषी दुकानात जात येथे पाहणी केली. नुकसानीचे मिरचीचे दोन रोपे अधिकाऱ्यांनी घेतले. तपासणीसाठी ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांकडे पाठविले असल्याचे तालुका कृषी अधिकारी माळी यांनी सांगितले.