शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘ती’ सहा बालके मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे

By admin | Published: July 27, 2016 12:11 AM

टाटिया शिशुगृह प्रकरण : दोषींवर कारवाईचे दिले संकेत

 
 
 
जळगाव : टाटिया शिशुगृहाच्या ताब्यातील ‘त्या’ तीन महिन्याच्या बालकासह अन्य पाच बालकांना संगोपनासाठी पुन्हा संस्थेच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संस्थेचे सचिव वीरेंद्रप्रकाश धोका यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे. शुक्रवारी त्यांनी मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान, शिशुगृहातील अनागोंदी व बालक नेण्याच्या प्रकरणात शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, परंतु दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुंडे यांनी विधानसभेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने व्यवस्थापकावर दबाव टाकून त्यांच्या परिचित व्यक्तीला हे तीन महिन्याचे बाळ बेकायदेशीरपणे देण्यात भाग पाडले आहे. याबाबत संस्थेने पोलीस स्टेशनला तक्रारही दिली आहे. आता अन्य बालकेही औरंगाबाद येथे हलविण्यात आली आहेत. संगोपनासाठी ती सर्व बाळे आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी धोका यांनी मुंडे यांच्याकडे केली.
जालन्याचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणाची आपण माहिती घेतली आहे. आयुक्त स्तरावर त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसातही तक्रार देण्यात आलेली आहे. बालकांच्या संगोपनाचा विषय असल्याने कोणत्याही शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, मात्र अनियमितता व गैरप्रकार झाला असेल तर संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. 
 
 
पुनर्वसनासाठी मंत्र्यांना निवेदन
जळगाव : शहरातील दहा वर्षीय पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेतून तिला तत्काळ पाच लाखाची मदत मंजूर करावी या मागणीसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या राज्य सहसंयोजक तथा बाल हक्क आयोगाच्या माजी सदस्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली.या भेटीत त्यांनी मुंडे यांना घटनेची माहिती दिली.
पीडित मुलगी सध्या बाल निरीक्षणगृहात आहे. मनोधैर्य योजनेतून मिळालेली रक्कम सज्ञान झाल्यानंतर तिला मिळू शकेल, जेणे करुन या रकमेतून तिचे पुनर्वसन होईल व भावी आयुष्य सुखकर होईल.या मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रय}शील आहोत. दरम्यान, या मुलीला तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी प्रा.पाटील यांना दिले. गेल्या आठवडय़ात प्रा.पाटील यांनी पीडित मुलगी व तिच्या आजीची भेट घेऊन मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत बाल कल्याण अधिका:यांशी चर्चा केली होती.
 
शिशुगृह प्रशासनाकडून न्यायालयात याचिका
 बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार टाटिया शिशुगृहातील 6 बालकांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. या आदेशाविरोधात आता टाटिया शिशुगृह प्रशासनाने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
प्रभारी अधीक्षक गणेश परदेशी यांनी मूळ संस्थेच्यावतीने याचिका दाखल केली असून त्यात, बाल कल्याण समितीने बालकांना औरंगाबादला हलविण्यासाठी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.