शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘शासन आपल्या दारी’च्या मंडपाखाली ‘पैशांचा खेळ चाले’! बिल सादर न करताही कार्यक्रमापोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:19 IST

पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कुंदन पाटील -जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मंडपाखाली जनतेच्या पैशांची उधळण सुरु असल्याची टीका होऊ लागली आहे. तशातच पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सोयीच्या राजकारणासाठी जनतेच्या पैशांची उधळण सुरु केली असल्याची टीका आता राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.

दि.१२ रोजी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा तालुकास्तरीय पहिला कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे तीनदा संभाव्य दौरे रद्द झाले. त्यामुळे दि.७ सप्टेंबर रोजीपासून टाकण्यात आलेला मंडप सलग ६ दिवस ‘जैसे थे’च होता. साहजिकच त्याचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार असल्याचे समीकरण निश्चीत झाले होते. तशातच मंगळवारी या कार्यक्रमासाठी असलेल्या मंडपाचे बिल अदा करण्यासाठी ५० लाखांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. बिल सादर झाले नसतानाही आणि प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही राज्य शासनाकडून वाटल्या जाणाऱ्या ‘खैराती’विषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जळगावसाठी ५० लाख तर....जळगाव येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. त्यासाठी तीन मोठे डोम उभारण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तीन डोमपोटी सादर केलेल्या बिलापोटी १ कोटींच्या खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यापोटीही ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जळगावच्या कार्यक्रमातील डोमच्या तुलनेत पाचोऱ्यात एकमेव डोम उभारण्यात आला होता. तरीही डोमच्या बिलापोटी ५० लाखांचा निधी राज्य शासनाने सहजच उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मंडपांआड ‘पैशांचा खेळ चाले’ अशा शब्दात विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे.

पाचोऱ्यातील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बिल अद्याप सादर करण्यात आलेले नाही. मात्र ५० लाखांचा निधी बॅंक खात्यात जमा झाला आहे.-भूषण अहिरे, प्रांताधिकारी, पाचोरा.

‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली पैशांची लूट सुरु आहे. या कार्यक्रमासाठी होणारा करोडांचा खर्च शेतकऱ्यांसाठी हितासाठी वापरला असता तर बरे वाटले असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी समर्थकांसाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘लूट मोहिम’ सुरु केली आहे.-संजय सावंत, संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना