शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

‘शासन आपल्या दारी’च्या मंडपाखाली ‘पैशांचा खेळ चाले’! बिल सादर न करताही कार्यक्रमापोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:19 IST

पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कुंदन पाटील -जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मंडपाखाली जनतेच्या पैशांची उधळण सुरु असल्याची टीका होऊ लागली आहे. तशातच पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सोयीच्या राजकारणासाठी जनतेच्या पैशांची उधळण सुरु केली असल्याची टीका आता राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.

दि.१२ रोजी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा तालुकास्तरीय पहिला कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे तीनदा संभाव्य दौरे रद्द झाले. त्यामुळे दि.७ सप्टेंबर रोजीपासून टाकण्यात आलेला मंडप सलग ६ दिवस ‘जैसे थे’च होता. साहजिकच त्याचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार असल्याचे समीकरण निश्चीत झाले होते. तशातच मंगळवारी या कार्यक्रमासाठी असलेल्या मंडपाचे बिल अदा करण्यासाठी ५० लाखांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. बिल सादर झाले नसतानाही आणि प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही राज्य शासनाकडून वाटल्या जाणाऱ्या ‘खैराती’विषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जळगावसाठी ५० लाख तर....जळगाव येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. त्यासाठी तीन मोठे डोम उभारण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तीन डोमपोटी सादर केलेल्या बिलापोटी १ कोटींच्या खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यापोटीही ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जळगावच्या कार्यक्रमातील डोमच्या तुलनेत पाचोऱ्यात एकमेव डोम उभारण्यात आला होता. तरीही डोमच्या बिलापोटी ५० लाखांचा निधी राज्य शासनाने सहजच उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मंडपांआड ‘पैशांचा खेळ चाले’ अशा शब्दात विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे.

पाचोऱ्यातील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बिल अद्याप सादर करण्यात आलेले नाही. मात्र ५० लाखांचा निधी बॅंक खात्यात जमा झाला आहे.-भूषण अहिरे, प्रांताधिकारी, पाचोरा.

‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली पैशांची लूट सुरु आहे. या कार्यक्रमासाठी होणारा करोडांचा खर्च शेतकऱ्यांसाठी हितासाठी वापरला असता तर बरे वाटले असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी समर्थकांसाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘लूट मोहिम’ सुरु केली आहे.-संजय सावंत, संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना