शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावरील गावांचे सांडपाणी वाघूर धरणात

By admin | Updated: April 25, 2017 00:25 IST

जळगाव, जामनेरकर पिताहेत दूषित पाणी : कांग व वाघूर नद्या बनल्या प्रदूषित, सांडपाण्याच्या निच:याची सोयच नाही

लियाकत सैयद/ मोहन सारस्वत ल्ल जामनेरजामनेर येथील कांग नदीपात्रातील दूषित पाणी तसेच तालुक्यातील नेरी, हिवरखेडे, गारखेडे आदी गावांचे सांडपाणी सुयोग्य निचरा होण्याच्या सोयीअभावी वाघूर धरणात जाऊन मिसळत असल्याने धरणाचे पाणी दूषित होत आहे व हेच पाणी जळगाव, जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे दहा गावांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरणाची  सोय  आहे त्या ठिकाणी किमान पाणी शुद्ध करून पुरवठा होतो, मात्र ज्या गावात शुद्धीकरणाची यंत्रणाच नाही त्या गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. जामनेर येथे  सहा महिन्यांपासून कांग नदीचे पात्र कोरडे असून,  पात्रात शहरातील विविध भागातील गटार व नाल्याचे दूषित  पाणी सोडले जाते व हेच पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. अशीच स्थिती नेरी, हिवरखेडे व गारखेडे या गावांची आहे. वास्तविक जामनेर पालिकेने शहरातील गटार व नाल्यातून वाहणारे दूषित पाणी नदीपात्रात न सोडता इतरत्र वळविणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने  हेच  पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. धरणक्षेत्राच्या अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित  पाण्याची ही समस्या वाढली आहे. नेरी बुद्रूक व पहूरपेठ ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून त्यांची लोकसंख्यादेखील जास्त आहे. या  गावांच्या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे गावातील गटारी व शौचालयाचे घाण पाणी नदीपात्रात येत असल्याने हेच घाण पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिसळते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, जामनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी कांग नदी ही पावसाळ्याचे 4 महिने प्रवाही असते, त्यानंतर ती कोरडी पडते. त्यात शहरातील सांडपाणी मोठय़ा प्रमाणात वाहून येऊन ते डबक्याच्या रूपाने पात्रात साचलेले असते व हेच पाणी पुढे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरला जाऊन मिळत असल्याने धरणातील पाणी दूषित होत असते. तसेच नदी पात्रात काटेरी झाडेदेखील वाढलेली आहेत. पालिकेने दूषित  पाणी इतरत्र वळविण्याचे व नदीपात्र स्वच्छतेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.सात लाख लोकसंख्या पितेय वाघूरचे पाणीएमआयडीसी वगळता जळगावसह जामनेर शहर व तालुक्यातील शिंगाईत, खांदगाव, डोहरी, नेरी बुद्रूक, नेरी दिगर, गाडेगाव, रोटवद, पळासखेडे (मि)े, मोहाडी, हिवरखेडे बुद्रूक, करमाड व मोरगाव. तसेच  वराडसीम ता. भुसावळ व काही गावांतील जनता वाघूर धरणाचे पाणी पिते. सुमारे सात लाख लोकसंख्या वाघूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सांडपाणी मिश्रित हे पाणी ही जनता पित आहे. गेल्या महिन्यापासून जळगाव शहरात दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. त्याचे हे एक कारणही असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वाघूर धरणाचे बॅकवॉटर हिवरखेडे बुद्रूक गावार्पयत पोहचले असून येथील गटार व शौचालयाचे घाण पाणी थेट त्यात जाते, परिणामी धरणाचे पाणी दूषित होत आहे.  या गंभीर प्रकाराकडे हिवरखेडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.4नेरी बुद्रूक व नेरी दिगर ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून लोकसंख्या सुमारे 20 हजारांच्या जवळपास आहे, मात्र गावातील सांडपाण्याचा निचरा करणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट वाघूर नदीपात्रातच साचते आणि पुढे वाहत जाते.काय म्हणतात, धरणावरील अभियंताकांग व वाघूर नदी काठावरील गावांनी दूषित पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा राबवावी, तसेच आपल्या गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरविणेसाठी जलशुद्धीकरण केंद्रे सुरू करावे, या व्यतिरिक्त आम्ही काय करणार ?-सी.के. पाटील, सहायक, अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव.‘वाघूर नदीपात्रात पहूरपेठ ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी शोषखड्डे निर्माण केले असून गावातील गटारीचे पाणी त्यात सोडले जाते, त्यामुळे आमच्या गावातील दूषित पाणी वाघूर धरणात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-प्रदीप लोढा, सरपंच, पहूरपेठ ग्रामपंचायत ‘नेरी गावातील सांडपाणी सध्या वाघूर नदीपात्रात तुंबलेले आहे. जून महिन्यापूर्वी गावातील सांडपाणी बाजार पट्टय़ाजवळ मोठा शोषखड्डा बांधून त्यात सोडण्याची योजना आहे.-राजश्री रवींद्र पाचपोळे, सरपंच, ग्रामपंचायत नेरी बुद्रूक.‘सध्या जामनेर शहरातील सर्व सांडपाणी कांग नदीपात्रात जात असले तरी भविष्यात भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.                                                  -शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, जामनेर.