शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

नदीकाठावरील गावांचे सांडपाणी वाघूर धरणात

By admin | Updated: April 25, 2017 00:25 IST

जळगाव, जामनेरकर पिताहेत दूषित पाणी : कांग व वाघूर नद्या बनल्या प्रदूषित, सांडपाण्याच्या निच:याची सोयच नाही

लियाकत सैयद/ मोहन सारस्वत ल्ल जामनेरजामनेर येथील कांग नदीपात्रातील दूषित पाणी तसेच तालुक्यातील नेरी, हिवरखेडे, गारखेडे आदी गावांचे सांडपाणी सुयोग्य निचरा होण्याच्या सोयीअभावी वाघूर धरणात जाऊन मिसळत असल्याने धरणाचे पाणी दूषित होत आहे व हेच पाणी जळगाव, जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे दहा गावांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरणाची  सोय  आहे त्या ठिकाणी किमान पाणी शुद्ध करून पुरवठा होतो, मात्र ज्या गावात शुद्धीकरणाची यंत्रणाच नाही त्या गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. जामनेर येथे  सहा महिन्यांपासून कांग नदीचे पात्र कोरडे असून,  पात्रात शहरातील विविध भागातील गटार व नाल्याचे दूषित  पाणी सोडले जाते व हेच पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. अशीच स्थिती नेरी, हिवरखेडे व गारखेडे या गावांची आहे. वास्तविक जामनेर पालिकेने शहरातील गटार व नाल्यातून वाहणारे दूषित पाणी नदीपात्रात न सोडता इतरत्र वळविणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने  हेच  पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. धरणक्षेत्राच्या अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित  पाण्याची ही समस्या वाढली आहे. नेरी बुद्रूक व पहूरपेठ ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून त्यांची लोकसंख्यादेखील जास्त आहे. या  गावांच्या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे गावातील गटारी व शौचालयाचे घाण पाणी नदीपात्रात येत असल्याने हेच घाण पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिसळते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, जामनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी कांग नदी ही पावसाळ्याचे 4 महिने प्रवाही असते, त्यानंतर ती कोरडी पडते. त्यात शहरातील सांडपाणी मोठय़ा प्रमाणात वाहून येऊन ते डबक्याच्या रूपाने पात्रात साचलेले असते व हेच पाणी पुढे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरला जाऊन मिळत असल्याने धरणातील पाणी दूषित होत असते. तसेच नदी पात्रात काटेरी झाडेदेखील वाढलेली आहेत. पालिकेने दूषित  पाणी इतरत्र वळविण्याचे व नदीपात्र स्वच्छतेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.सात लाख लोकसंख्या पितेय वाघूरचे पाणीएमआयडीसी वगळता जळगावसह जामनेर शहर व तालुक्यातील शिंगाईत, खांदगाव, डोहरी, नेरी बुद्रूक, नेरी दिगर, गाडेगाव, रोटवद, पळासखेडे (मि)े, मोहाडी, हिवरखेडे बुद्रूक, करमाड व मोरगाव. तसेच  वराडसीम ता. भुसावळ व काही गावांतील जनता वाघूर धरणाचे पाणी पिते. सुमारे सात लाख लोकसंख्या वाघूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सांडपाणी मिश्रित हे पाणी ही जनता पित आहे. गेल्या महिन्यापासून जळगाव शहरात दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. त्याचे हे एक कारणही असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वाघूर धरणाचे बॅकवॉटर हिवरखेडे बुद्रूक गावार्पयत पोहचले असून येथील गटार व शौचालयाचे घाण पाणी थेट त्यात जाते, परिणामी धरणाचे पाणी दूषित होत आहे.  या गंभीर प्रकाराकडे हिवरखेडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.4नेरी बुद्रूक व नेरी दिगर ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून लोकसंख्या सुमारे 20 हजारांच्या जवळपास आहे, मात्र गावातील सांडपाण्याचा निचरा करणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट वाघूर नदीपात्रातच साचते आणि पुढे वाहत जाते.काय म्हणतात, धरणावरील अभियंताकांग व वाघूर नदी काठावरील गावांनी दूषित पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा राबवावी, तसेच आपल्या गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरविणेसाठी जलशुद्धीकरण केंद्रे सुरू करावे, या व्यतिरिक्त आम्ही काय करणार ?-सी.के. पाटील, सहायक, अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव.‘वाघूर नदीपात्रात पहूरपेठ ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी शोषखड्डे निर्माण केले असून गावातील गटारीचे पाणी त्यात सोडले जाते, त्यामुळे आमच्या गावातील दूषित पाणी वाघूर धरणात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-प्रदीप लोढा, सरपंच, पहूरपेठ ग्रामपंचायत ‘नेरी गावातील सांडपाणी सध्या वाघूर नदीपात्रात तुंबलेले आहे. जून महिन्यापूर्वी गावातील सांडपाणी बाजार पट्टय़ाजवळ मोठा शोषखड्डा बांधून त्यात सोडण्याची योजना आहे.-राजश्री रवींद्र पाचपोळे, सरपंच, ग्रामपंचायत नेरी बुद्रूक.‘सध्या जामनेर शहरातील सर्व सांडपाणी कांग नदीपात्रात जात असले तरी भविष्यात भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.                                                  -शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, जामनेर.