शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

मुलांच्या ‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांकडून ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:32 IST

शिक्षणासाठीही बनवाबनवी : मूळ रहिवाशांचे पाल्य राहिले वंचित; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव : मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणाºया २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र, दुसरीकडे काही पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी जळगाव तालुक्यातील वावडदा येथे वास्तव्यास नसतानाही भाडेकरू दाखवून प्रवेशास पात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार मूळ गावातील पालकांच्या तक्रारीनंतर समोर आला आहे़ याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून १३ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे़आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल, वंचित घटकांतील मुलांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार यंदा आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २८७ शाळांमध्ये ३ हजार ५९४ जागा आहेत़ त्यासाठी ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३ हजार ३४१ विद्यार्थी प्रथम फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़गावातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीतप्रवेशासाठी लवकर क्रमांक लागावा, त्याचबरोबर हवी ती शाळा मिळावी म्हणून १३ पालकांनी वावडदा येथे भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला व त्यात त्यांच्या पाल्यांना लॉटरीही लागली़ दुसरीकडे मात्र, मूळ गावात राहत असलेल्यांच्या पाल्यांचे नाव प्रतीक्षा यादीत गेले़ त्यात रेणूका पाटील, ओम संदीप पवार, श्रेयस पवार, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ दरम्यान, या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले, त्यांचे पालक वावडदा गावातच वास्तव्यास नसून त्यांनी बनावट भाडेकरू दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोदविल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला.ते पालक गावात राहत नसल्याचे सरपंचांचे पत्रज्या विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, त्यांच्या पालकांनी वावडदा सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गावात संपूर्ण चौकशी पाहणी केली असता जे १३ विद्यार्थी एल़एच़पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे, त्यांचे पालक गावात राहतच नसल्याचे समोर आले़ त्यानंतर सरपंचांनी याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून प्रवेशास पात्र ठरलेल्या त्या विद्यार्थ्यांचे पालक गावात राहत नसल्याचे पत्र दिले आहे़शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्तवावडदा सरपंच यांनी केलेली तक्रार शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे़ त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ तर संबंधित शाळेलाही चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़पत्ता बदलविण्यासाठी धडपडशहरातील काही पालकांकडूनही लवकरात लवकर आरटीई प्रवेशासाठी क्रमांक लागवा म्हणून आधारकार्डमधील पत्त्यांमध्ये बदल करण्यासाठी धडपड सुरू असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे़ तर काहींनी शाळेच्या काही अंतरावरचं घर असल्याचे दाखवून काही पालकांकडूनही ‘शाळा’ केली जात असल्याचा समोर येत आहे़ज्या पालकांनी चुकीची माहिती भरली असेल, त्यांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील़ प्रवेश रद्द करण्याचा अधिकार हा गटशिक्षणाधिकारी यांनाही आहे़- बी़एस़अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव