शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

मर्यादेयं विराजते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:35 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये नामवंत वकील तथा लेखक अॅड.सुशील अत्रे गेल्या पाच महिन्यांपासून ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहीत होते. आज त्यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग.

सर्व ज्ञात-अज्ञात वाचक मित्र हो, गेले पाच महिने आपण ‘प्रसंग असता लिहिले’ या सदराच्या माध्यमातून भेटतो आहोत. या लेखमालेला निमित्त झालं ते एका छोटय़ाशा ‘पोस्ट’चं. फेसबुकवरती मी ‘चंदाराणी’ नावाची एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर एक-दोन दिवसातच ‘लोकमत’चे निवासी संपादक आणि माङो मित्र मिलिंद कुलकर्णी भेटले. ते म्हणाले, तीच पोस्ट थोडी आणखी सविस्तर लिहा. आपण छापू. मग मी तेच ‘लेख’ या स्वरुपात लिहून पाठवलं. त्यावर त्यांचा लगेच फोन आला, की एक स्वतंत्र लेख छापण्यापेक्षा आपण लेखमाला सुरू करू आणि मी लिहिता झालो. ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहिण्यासाठी कोणताही विशिष्ट विषय नव्हता. तसं बंधनही नव्हतं. त्यामुळे मला हव्या त्या विषयावर मोकळेपणाने लिहिता आलं. ‘सोनू, तुझा माङयावर भरोसा नाय का?’सारख्या अल्पजीवी आणि तात्पुरत्या विषयापासून ‘जनरेशन गॅस’सारख्या सर्वकालीन, सार्वत्रिक विषयार्पयत मी इथे लिहिलं. केवळ लेखनाच्या माध्यमातूनही अनेक नवे मित्र मिळतात, हा अनुभव मी घेतला. काही मित्रांनी उत्साहाने आणि आपुलकीने विषयसुद्धा सुचवले. माङोच विषय आता मी वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की अनेक लेखांमध्ये ‘आमच्या काळी असं होतं..’ हा मुद्दा येतोच येतो. बहुदा हा वयाचा आणि प्रचंड गतीने बदलत चाललेल्या जीवनमानाचा एकत्रित परिणाम असावा. आपल्या जेव्हा हे लक्षात येतं, की आपल्या लहानपणीचे साधेसुधे, मजेशीर दिवस आपण काही झालं तरी परत आणू शकत नाही आणि आणले तरी ते आता कुणालाच नको आहेत. तेव्हा मग अशा लेखांमधून ‘त्या’ दिवसांचं कौतुक करण्याचा अट्टाहास आपण करतो. अशा वेळी मूळ लेखाचा विषय काहीही असला तरी कुठेतरी चुकारपणे एखादं वाक्य ‘आमच्या काळी..’च्या धर्तीवर डोकावतंच. माङया लेखांवर ज्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, त्यावरून हे लक्षात आलं, की केवळ लिहिणा:या मलाच नव्हे तर वाचणा:या अनेकांनाही त्यांचे ‘जुने दिवस’ आठवले. त्यात ते रंगून गेले. खरं तर असे लेख म्हणजे केवळ एक निमित्त होतं. त्यांचं महत्त्व तेवढंच ! कुठल्यातरी लेखाच्या निमित्ताने वाचणा:याच्या मनातली आठवणींची पोतडी उघडली जाते आणि त्यातून जादूसारख्या अनेक आठवणी बाहेर पडतात. मग तो लेख बाजूला पडतो आणि वाचक स्वत:मधेच गुंगून जातो. अशा निदान काही जणांच्या मनातल्या पोतडीची गाठ सोडवण्याचं काम माङया लेखांनी केलं असेल तरी त्याचा मला आनंद आहे. जिथे सर्वच प्रकारचे संवाद हळूहळू आटत चाललेत तिथे स्वत:शी संवाद तरी कुठे होतो आजकाल? त्याचीसुद्धा आता मुद्दाम, जाणीवपूर्वक सवय करून ठेवावी लागते. लेखन आणि वाचन हे स्वत:शी संवाद करण्याचे उत्तम मार्ग आहेत. अलिकडच्या काळात खरं तर लेखन खूप सोपं झालंय. म्हणजे असं की, त्या लेखनाला ‘आऊटलेट’ हमखास मिळतो. पूर्वी ‘लेखक’ म्हणजे एक स्वतंत्र वर्ग होता. ज्यांनी लिहिलेलं छापलं जातं किंवा इतर लोक वाचतात. असं काहीतरी लिहिणारे फारच थोडे होते. छपाईची साधनं, तंत्र या गोष्टी लक्षात घेता एखाद्याचं पुस्तक छापून ते प्रकाशित होणे हा दुर्मिळ योग होता. आपलं नाव कागदावर छापलेले याची देही याचि डोळा बघण्याची एकच संधी होती-लग्नपत्रिकेवरती ‘चि.’ किंवा ‘चि.सौ.कां.’च्या पुढे छापलं जाईल तेव्हाच ! पण आता तसं नाही. ‘छापणे’ याला उत्तम पर्याय आता उपलब्ध आहेत. फेसबुक किंवा व्हॉटस्अॅपवर आता कुणीही स्वत:ची मते ‘लिहू’ शकतो. त्याच्या कोणत्याही लेखनाला हा हक्काचा ‘आऊटलेट’ आता मिळू शकतो. कुणी ना कुणीतरी त्याचं लेखन वाचतंच ! पण अशा वेळी एक धोका कायम असतो. एखादी गोष्ट अति सोपी, अतिसुलभ झाली, की तिचा दर्जा आपोआपच घसरू लागतो. लेखनाचंही तेच होऊ शकतं. मग वाचणारा कुठेतरी, नकळत फेसबुक लेखनापेक्षा छापील मजकुराला जास्त पसंत करतो. जास्त विश्वासार्ह मानतो. बहुदा, त्यामुळेच वृत्तपत्रातल्या लेखमालेचं, पुरवणीचं महत्त्व आजही टिकून आहे- पुढेही राहीलच. शिरीष कणेकरांनी कुठल्याशा हिंदी चित्रपटाबद्दल लिहिलं होतं की त्या सिनेमाची एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे शेवटी तो (एकदाचा) संपतो. हे असलं काहीतरी ‘प्रसंग असता लिहिले’बाबत कोणी म्हणण्यापूर्वीच आपण थांबणे शहाणपणाचे आहे. विषय ‘लेखन’ असो की ‘राजकारण’.. वेळेवरती थांबणं फार महत्त्वाचं आहे अन्यथा आपला ‘अडवाणी’ होतो ! खरं की नाही? तेव्हा आता आपला सप्रेम निरोप घेतो आणि इथेच थांबतो. - मर्यादेयं विराजते !