शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादेयं विराजते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:35 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये नामवंत वकील तथा लेखक अॅड.सुशील अत्रे गेल्या पाच महिन्यांपासून ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहीत होते. आज त्यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग.

सर्व ज्ञात-अज्ञात वाचक मित्र हो, गेले पाच महिने आपण ‘प्रसंग असता लिहिले’ या सदराच्या माध्यमातून भेटतो आहोत. या लेखमालेला निमित्त झालं ते एका छोटय़ाशा ‘पोस्ट’चं. फेसबुकवरती मी ‘चंदाराणी’ नावाची एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर एक-दोन दिवसातच ‘लोकमत’चे निवासी संपादक आणि माङो मित्र मिलिंद कुलकर्णी भेटले. ते म्हणाले, तीच पोस्ट थोडी आणखी सविस्तर लिहा. आपण छापू. मग मी तेच ‘लेख’ या स्वरुपात लिहून पाठवलं. त्यावर त्यांचा लगेच फोन आला, की एक स्वतंत्र लेख छापण्यापेक्षा आपण लेखमाला सुरू करू आणि मी लिहिता झालो. ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहिण्यासाठी कोणताही विशिष्ट विषय नव्हता. तसं बंधनही नव्हतं. त्यामुळे मला हव्या त्या विषयावर मोकळेपणाने लिहिता आलं. ‘सोनू, तुझा माङयावर भरोसा नाय का?’सारख्या अल्पजीवी आणि तात्पुरत्या विषयापासून ‘जनरेशन गॅस’सारख्या सर्वकालीन, सार्वत्रिक विषयार्पयत मी इथे लिहिलं. केवळ लेखनाच्या माध्यमातूनही अनेक नवे मित्र मिळतात, हा अनुभव मी घेतला. काही मित्रांनी उत्साहाने आणि आपुलकीने विषयसुद्धा सुचवले. माङोच विषय आता मी वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की अनेक लेखांमध्ये ‘आमच्या काळी असं होतं..’ हा मुद्दा येतोच येतो. बहुदा हा वयाचा आणि प्रचंड गतीने बदलत चाललेल्या जीवनमानाचा एकत्रित परिणाम असावा. आपल्या जेव्हा हे लक्षात येतं, की आपल्या लहानपणीचे साधेसुधे, मजेशीर दिवस आपण काही झालं तरी परत आणू शकत नाही आणि आणले तरी ते आता कुणालाच नको आहेत. तेव्हा मग अशा लेखांमधून ‘त्या’ दिवसांचं कौतुक करण्याचा अट्टाहास आपण करतो. अशा वेळी मूळ लेखाचा विषय काहीही असला तरी कुठेतरी चुकारपणे एखादं वाक्य ‘आमच्या काळी..’च्या धर्तीवर डोकावतंच. माङया लेखांवर ज्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, त्यावरून हे लक्षात आलं, की केवळ लिहिणा:या मलाच नव्हे तर वाचणा:या अनेकांनाही त्यांचे ‘जुने दिवस’ आठवले. त्यात ते रंगून गेले. खरं तर असे लेख म्हणजे केवळ एक निमित्त होतं. त्यांचं महत्त्व तेवढंच ! कुठल्यातरी लेखाच्या निमित्ताने वाचणा:याच्या मनातली आठवणींची पोतडी उघडली जाते आणि त्यातून जादूसारख्या अनेक आठवणी बाहेर पडतात. मग तो लेख बाजूला पडतो आणि वाचक स्वत:मधेच गुंगून जातो. अशा निदान काही जणांच्या मनातल्या पोतडीची गाठ सोडवण्याचं काम माङया लेखांनी केलं असेल तरी त्याचा मला आनंद आहे. जिथे सर्वच प्रकारचे संवाद हळूहळू आटत चाललेत तिथे स्वत:शी संवाद तरी कुठे होतो आजकाल? त्याचीसुद्धा आता मुद्दाम, जाणीवपूर्वक सवय करून ठेवावी लागते. लेखन आणि वाचन हे स्वत:शी संवाद करण्याचे उत्तम मार्ग आहेत. अलिकडच्या काळात खरं तर लेखन खूप सोपं झालंय. म्हणजे असं की, त्या लेखनाला ‘आऊटलेट’ हमखास मिळतो. पूर्वी ‘लेखक’ म्हणजे एक स्वतंत्र वर्ग होता. ज्यांनी लिहिलेलं छापलं जातं किंवा इतर लोक वाचतात. असं काहीतरी लिहिणारे फारच थोडे होते. छपाईची साधनं, तंत्र या गोष्टी लक्षात घेता एखाद्याचं पुस्तक छापून ते प्रकाशित होणे हा दुर्मिळ योग होता. आपलं नाव कागदावर छापलेले याची देही याचि डोळा बघण्याची एकच संधी होती-लग्नपत्रिकेवरती ‘चि.’ किंवा ‘चि.सौ.कां.’च्या पुढे छापलं जाईल तेव्हाच ! पण आता तसं नाही. ‘छापणे’ याला उत्तम पर्याय आता उपलब्ध आहेत. फेसबुक किंवा व्हॉटस्अॅपवर आता कुणीही स्वत:ची मते ‘लिहू’ शकतो. त्याच्या कोणत्याही लेखनाला हा हक्काचा ‘आऊटलेट’ आता मिळू शकतो. कुणी ना कुणीतरी त्याचं लेखन वाचतंच ! पण अशा वेळी एक धोका कायम असतो. एखादी गोष्ट अति सोपी, अतिसुलभ झाली, की तिचा दर्जा आपोआपच घसरू लागतो. लेखनाचंही तेच होऊ शकतं. मग वाचणारा कुठेतरी, नकळत फेसबुक लेखनापेक्षा छापील मजकुराला जास्त पसंत करतो. जास्त विश्वासार्ह मानतो. बहुदा, त्यामुळेच वृत्तपत्रातल्या लेखमालेचं, पुरवणीचं महत्त्व आजही टिकून आहे- पुढेही राहीलच. शिरीष कणेकरांनी कुठल्याशा हिंदी चित्रपटाबद्दल लिहिलं होतं की त्या सिनेमाची एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे शेवटी तो (एकदाचा) संपतो. हे असलं काहीतरी ‘प्रसंग असता लिहिले’बाबत कोणी म्हणण्यापूर्वीच आपण थांबणे शहाणपणाचे आहे. विषय ‘लेखन’ असो की ‘राजकारण’.. वेळेवरती थांबणं फार महत्त्वाचं आहे अन्यथा आपला ‘अडवाणी’ होतो ! खरं की नाही? तेव्हा आता आपला सप्रेम निरोप घेतो आणि इथेच थांबतो. - मर्यादेयं विराजते !