शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शिवसेना आक्रमक : जळगाव मनपा समोरच भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:00 IST

अवैध हॉकर्सला हटवून रस्ते मोकळे करा

जळगाव : शहराची पुर्वीची ओळख ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’ ही आता बदलत जात असून, जळगाव शहर आता ‘अतिक्रमणाचे, वाहतूक कोंडीचे’ शहर होत जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृत हॉकर्सकडून सर्रासपणे व्यवसाय थाटला जात असल्याने नागरिकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा मागणीसाठी शिवसेनेने मंगळसारी सकाळी ११ वाजता चक्क मनपासमोरच भाजीपाला व फळे विक्री करून अनोखे आंदोलन केले.यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, नगसेवक गणेश सोनवणे, अमर जैन, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, शोभा चौधरी, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी येणाऱ्या जाणाºया नागरिकांना कमी दरात भाजीपाला व फळे देखील विक्री केली. रस्त्यावर व्यवसाय थाटले जात असल्याने शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना वाहने चालविणे तर सोडाच पायी चालणे देखील कठीण झाले असल्याचे शिवसेनेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.उपायुक्तांनी येवून स्वीकारले निवेदनशिवसेनेने फळ व भाजीपाला विक्री करून केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी तत्काळ आंदोलकांची भेट घेट घेवून त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. तसेच अतिक्रमण कारवाई सुरुच असून, कारवाईअजून तीव्र करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, १५ दिवसात शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.लाखो रुपयांची अवैध वसुलीचा आरोपशिवसेनेकडून महापौरांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुमारे १० हजार २८४ फेरीवाले मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. अशा फेरीवाल्यांकडून अनेकजण लाखो रुपयांची दररोज अवैधपणे वसुली करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच रात्रीच्या वेळेस मांसाहारी व विविध खाद्यपदार्थ विक्री करणाºया फेरीवाल्यांच्या दुकानांवर जास्त करून दारु पिणारेच ग्राहक असतात. त्यामुळे अनेक वाद याच ठिकाणी निर्माण होतात यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.या भागात होते अतिक्रमणशहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चित्रा चौक, गोविंंदा रिक्षा स्टॉप ते टॉवर चौक, सुभाष चौक ते राजकमल चौक, टॉवर चौक ते भिलपूरा, बळीराम पेठ, रेल्वे स्टेशन ते नेहरू चौक, महाबळ परिसर, प्रभात चौक व महाराणा प्रताप पुतळा, गुजरात पेट्रोल पंप,रामानंदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक देखील रस्त्यावरच वाहने उभे करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत असते. त्यामुळे मनपाने तत्काळ अनधिकृत हॉकर्सचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव