शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नेपाळमध्ये आईचे अंत्यदर्शनही घेऊ न शकलेल्या सुरक्षा रक्षकाचे शिक्षकच झाले सगेसोयरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:25 IST

चाळीसगावच्या शिक्षकांनीच घेतला दुखवटा

ठळक मुद्देमाणुसकीचा पाझरआईच्या निधनानंतर जावू शकले नाही नेपाळला

जिजाबराव वाघ / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - भाषिक, प्रांतिक अस्मिता टोकदार होत असताना परप्रांतीयांविरुद्ध स्थानिकांचे होणारे वादही माणुसकी हरवत चाललीयं का..? असा थेट प्रश्न उपस्थित करतात. याला समर्पक उत्तर चाळीसगाव येथील आ.बं.विद्यालयाच्या (मुलींचे) शिक्षकांनी नेपाळच्या रुपालालचे सात्वंन करून दिले आहे. शिक्षकांनी रुपालालच्या आईच्या निधनानंतर त्याला ‘दुखवटा’ घेऊन माणुसकीच्या फुलांच्या दरवळाला कोणत्याही सीमा आणि बंधने नसतात, हेच सिद्ध केले आहे.४५ वर्षीय रुपालाल करणसिंग राजपूत हे मुळचे नेपाळवासीय. रुकुम जिल्ह्यातील झुलखेत हा त्यांचा तालुका. याच तालुक्यातील दीडशे उंब-यांच्या ‘होल’ गावात त्यांची तीन भावंड आणि आई - वडील शेती करुन गुजराण करतात. रुपालाल हे गेल्या काही वषार्पासून चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं. विद्यालयात सुरक्षा रक्षक (गुरखा) म्हणून काम करतात. त्यांचा विवाह झाला असून त्यांना तेजस आणि सीमा अशी दोन अपत्ये आहेत.आईचे अंतिम दर्शनही नाहीरुपालाल यांची आई कलीबाई यांचे वयाच्या ७५व्या वर्षी नेपाळमध्ये गावी जानेवारीमध्ये अपघाती निधन झाले. त्याचवेळी नेपाळमध्ये स्वतंत्र राजधानी मागणीचे आंदोलनही पेटले होते. रुपालाल हे आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी जाण्यासाठी निघालेही. मात्र गोरखपूर पर्यंतच ते पोहचू शकले. पुढे नेपाळ आणि भारत सीमेवर तणावाची स्थिती असल्याने त्यांना माघारी निघावे लागले. रुपालाल यांनी सीमेवरुनच भरल्या डोळ््यांनी आईला शेवटचा निरोप दिला. त्यांच्या तिघा भावांनी आईला रुपालाल यांच्या अनुपस्थितीत मुखाग्नी दिला. वडील करणसिंग राजपूत हे ८० वर्षीय असून आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत.शिक्षक झाले सगेसोयरेरुपालाल यांचे महाराष्ट्रात कुठेही नातेवाईक नाहीत. आईच्या निधन आणि अंत्यसंस्कारावेळी आपण उपस्थितीत राहू न शकल्याचे शल्य त्यांना आजही आहेच. आ.ब. (मुलींचे) विद्यालयातील शिक्षकांनादेखील रुपालाल यांची दर्दभरी कहानी हलवून गेली. २१ शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना दुखवटा घेण्याचा निर्णय घेतला.अन् अश्रुंची झाली फुलेसोमवारी सकाळी शाळेची घंटा वाजली. रुपालाल नेहमी प्रमाणे कामे करीत होते. शिक्षकांनी त्यांचे शाळेच्या आवारातील घर गाठले. त्यांचे सात्वंन करताना त्यांच्यासाठी आणलेला दुखवटा (ड्रेस, पत्नीसाठी साडी, मुलांसाठी कपडे) त्यांच्या ओंजळ हातांवर ठेवले. डोक्यात गांधी टोपी घालून खांद्यावर बागायती रुमाल ठेवत त्यांना मिठी मारली, धीरही दिला. शिक्षकांची आपुलकी आणि माणुसकी पाहून रुपालाल आणि त्यांच्या पत्नी गीता यांचे डोळे भरुन आले. सहावीत शिकणारा तेजस आणि बालक मंदिरात शिकणारी चिमुरडी सीमा आई - वडिलांच्या डोळ्यातून वाहणा-या अश्रुंची झालेली फुले पाहून आनंदून गेली होती.रुपालाल हे गेल्या काही वषार्पासून शाळेत असल्याने सर्व शिक्षकांशी त्यांचे कौटुंबिक रुणानुबंध जुळले आहेत. हाच स्नेहाचा धागा त्यांचे दु:ख हलके करणारा ठरला. आम्ही त्यांचे सगेसोयरे होऊन सात्वंन केले. शाळा या संस्कार रुजवतात. याचाच हा खरोखरीचा धडा आहे.-दिनेश महाजन, शिक्षक , आ.बं. (मुलींचे) विद्यालय, चाळीसगावआई गेल्याचे दु:ख आभाळाएवढे आहे. ही पोकळ कधीही भरुन निघणारी नाही, हेही खरेच. मला आईचे अंतिम दर्शनदेखील घेता आले नाही. सीमेवरचा तणाव नाती तोडतो. शिक्षकांनी मात्र मला दुखवटा घेऊन माणुसकीचे नवे नाते जोडले.- रुपालाल राजपूत, सुरक्षा रक्षक, चाळीसगाव शिक्षण संस्था

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावSchoolशाळा