शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

तूर डाळीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:25 IST

दोन आठवड्यांपासून मागणी घटल्याने सर्वच डाळींचे भाव कमी

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने कडाडलेल्या डाळींचे भाव गेल्या कमी- कमी होत आहे. यात तूर डाळीचे भाव दोन आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. सोबतच इतरही डाळींचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी कमी होण्यासह वायदे बाजारही नियंत्रणात आल्याने हे भाव घसरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटत असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्यात भर म्हणजे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत डाळींचे भाव मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सतत वाढत गेले. यात तूर डाळ तर ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली. ही डाळ प्रती किलो शंभरी गाठणार असे वाटत असतानाच मागणी कमी-कमी होत गेल्याने डाळींचे भाव घटत गेले.दोन आठवड्यांपासून दिलासादोन आठवड्यांपूर्वी ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटल, उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवरून ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी-कमी होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.तूर डाळीने वाढविली होती चिंतापावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत गेली व ती आणखी वधारण्याची चिन्हे होती. मात्र उन्हाळ््यात सुरू असलेली वर्षभराची धान्य खरेदीकमी झाल्याने डाळींची मागणी घटली व भाव कमी होण्यास यामुळे मदत झाली.सरकार स्थापनेचाही परिणामलोकसभा निवडणूक काळात सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने वायदे बाजाराच्या चलतीने बाजार पेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढत गेले. मात्र आता सरकार स्थापनेनंतर वायदेबाजारावर सरकारचे नियंत्रण आल्याने भाव वाढ थांबून डाळी, धान्याचे भाव कमी होत असल्याचेही सांगितले जात आहे.उन्हाळी धान्य व डाळ खरेदी कमी झाल्याने मागणी घटून दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव