शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:25 IST

दोन आठवड्यांपासून मागणी घटल्याने सर्वच डाळींचे भाव कमी

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने कडाडलेल्या डाळींचे भाव गेल्या कमी- कमी होत आहे. यात तूर डाळीचे भाव दोन आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. सोबतच इतरही डाळींचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी कमी होण्यासह वायदे बाजारही नियंत्रणात आल्याने हे भाव घसरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटत असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्यात भर म्हणजे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत डाळींचे भाव मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सतत वाढत गेले. यात तूर डाळ तर ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली. ही डाळ प्रती किलो शंभरी गाठणार असे वाटत असतानाच मागणी कमी-कमी होत गेल्याने डाळींचे भाव घटत गेले.दोन आठवड्यांपासून दिलासादोन आठवड्यांपूर्वी ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटल, उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवरून ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी-कमी होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.तूर डाळीने वाढविली होती चिंतापावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत गेली व ती आणखी वधारण्याची चिन्हे होती. मात्र उन्हाळ््यात सुरू असलेली वर्षभराची धान्य खरेदीकमी झाल्याने डाळींची मागणी घटली व भाव कमी होण्यास यामुळे मदत झाली.सरकार स्थापनेचाही परिणामलोकसभा निवडणूक काळात सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने वायदे बाजाराच्या चलतीने बाजार पेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढत गेले. मात्र आता सरकार स्थापनेनंतर वायदेबाजारावर सरकारचे नियंत्रण आल्याने भाव वाढ थांबून डाळी, धान्याचे भाव कमी होत असल्याचेही सांगितले जात आहे.उन्हाळी धान्य व डाळ खरेदी कमी झाल्याने मागणी घटून दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव