शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:25 IST

दोन आठवड्यांपासून मागणी घटल्याने सर्वच डाळींचे भाव कमी

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने कडाडलेल्या डाळींचे भाव गेल्या कमी- कमी होत आहे. यात तूर डाळीचे भाव दोन आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. सोबतच इतरही डाळींचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी कमी होण्यासह वायदे बाजारही नियंत्रणात आल्याने हे भाव घसरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटत असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्यात भर म्हणजे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत डाळींचे भाव मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सतत वाढत गेले. यात तूर डाळ तर ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली. ही डाळ प्रती किलो शंभरी गाठणार असे वाटत असतानाच मागणी कमी-कमी होत गेल्याने डाळींचे भाव घटत गेले.दोन आठवड्यांपासून दिलासादोन आठवड्यांपूर्वी ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटल, उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवरून ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी-कमी होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.तूर डाळीने वाढविली होती चिंतापावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत गेली व ती आणखी वधारण्याची चिन्हे होती. मात्र उन्हाळ््यात सुरू असलेली वर्षभराची धान्य खरेदीकमी झाल्याने डाळींची मागणी घटली व भाव कमी होण्यास यामुळे मदत झाली.सरकार स्थापनेचाही परिणामलोकसभा निवडणूक काळात सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने वायदे बाजाराच्या चलतीने बाजार पेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढत गेले. मात्र आता सरकार स्थापनेनंतर वायदेबाजारावर सरकारचे नियंत्रण आल्याने भाव वाढ थांबून डाळी, धान्याचे भाव कमी होत असल्याचेही सांगितले जात आहे.उन्हाळी धान्य व डाळ खरेदी कमी झाल्याने मागणी घटून दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव