शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वाळू उपसा रोखण्यासाठी तैनात पथकाकडून एका रात्रीचे घेतले जाताहेत ४० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, हा उपसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, हा उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांकडूनच एका रात्रीचे ४० हजार रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे रात्रीला सुरू असलेला हा उपसा महसूलच्या पथकासमोरच सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वाळू माफियांना संरक्षण दिले जात आहे.

गिरणा पात्रात सप्टेंबर महिन्यात आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी जलसत्याग्रह केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आव्हाणे, निमखेडी, बांभोरी या गावातील गिरणा पात्रात महसूलचे पथक नेमले होते. काही दिवस पथकाकडून गिरणा पात्रात नियमितपणे गस्त घालून, वाळू उपस्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. मात्र, आता महिनाभरापासून पथकाच्या उपस्थितीतच वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यासाठी पथकाला एका रात्रीची किंमतदेखील निश्चित करण्यात आली. त्यामुळे महसूल प्रशासनाच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

‘क्वाॅलिस’कारमधून येते पथक

दिवसाला पूर्णपणे वाळूचा उपसा बंद असतो, यावेळी महसूलचे पथक केवळ एकच फेरी मारून परत जात असते. रात्रीच्या वेळेस उपसा सुरू झाल्यानंतर महसूलचे पथकदेखील रात्री ‘क्वालिस’ या गाडीतून गिरणा पात्रात दाखल होते. त्यावेळेस पात्रात सुमारे १५० हून अधिक डंपर व ट्रॅक्टर असतात, एवढे असूनही या पथकाकडून कोणत्याही डंपर किंवा ट्रॅक्टरवर कारवाई केली जात नाही. एका रात्रीसाठी महसूलच्या पथकाकडून ४० हजार रुपयांचा दर देखील निश्चित करण्यात आला आहे. ४० हजार रुपये दिले जात असल्याने अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

कारवाई करणारेच थांबले, मग नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन कोण करणार?

आव्हाणे, खेडी, फुपनगरी या भागातून गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने या भागातील भूजलात मोठी घट झाली आहे. केळीसाठी हा पूर्ण गिरणा काठचा परिसर ओळखला जातो. मात्र, अवैध वाळू उपसामुळे या भागातील भूजल पातळीत घट झाल्यामुळे उन्हाळ्यात या भागातील ट्यूबवेल्समधील पाणी आटले जात आहे. यासह गिरणा पात्रात आता खडकदेखील दिसू लागला आहे. यासह पात्रात, वेडी बाभूळ या वनस्पतीदेखील वाढत असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीचे पात्र कमी होत असल्याने नदीपात्रातच अनेकांनी जमिनी बळकाविल्या असून, त्याठिकाणी अनधिकृतपणे शेती केली जात आहे. अतिक्रमण, वाळू उपसा, गिरणेत येणारे सांडपाणी यामुळे गिरणा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यातच हा उपसा रोखण्यासाठी जबाबदारी असलेल्या महसूल प्रशासनाचीच वाळूमाफियांसोबत मिलीभगत असल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास थांबविणार तरी कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

---