शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वाळू उपसा रोखण्यासाठी तैनात पथकाकडून एका रात्रीचे घेतले जाताहेत ४० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, हा उपसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, हा उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांकडूनच एका रात्रीचे ४० हजार रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे रात्रीला सुरू असलेला हा उपसा महसूलच्या पथकासमोरच सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वाळू माफियांना संरक्षण दिले जात आहे.

गिरणा पात्रात सप्टेंबर महिन्यात आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी जलसत्याग्रह केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आव्हाणे, निमखेडी, बांभोरी या गावातील गिरणा पात्रात महसूलचे पथक नेमले होते. काही दिवस पथकाकडून गिरणा पात्रात नियमितपणे गस्त घालून, वाळू उपस्यावर नियंत्रण आणण्यात आले होते. मात्र, आता महिनाभरापासून पथकाच्या उपस्थितीतच वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यासाठी पथकाला एका रात्रीची किंमतदेखील निश्चित करण्यात आली. त्यामुळे महसूल प्रशासनाच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

‘क्वाॅलिस’कारमधून येते पथक

दिवसाला पूर्णपणे वाळूचा उपसा बंद असतो, यावेळी महसूलचे पथक केवळ एकच फेरी मारून परत जात असते. रात्रीच्या वेळेस उपसा सुरू झाल्यानंतर महसूलचे पथकदेखील रात्री ‘क्वालिस’ या गाडीतून गिरणा पात्रात दाखल होते. त्यावेळेस पात्रात सुमारे १५० हून अधिक डंपर व ट्रॅक्टर असतात, एवढे असूनही या पथकाकडून कोणत्याही डंपर किंवा ट्रॅक्टरवर कारवाई केली जात नाही. एका रात्रीसाठी महसूलच्या पथकाकडून ४० हजार रुपयांचा दर देखील निश्चित करण्यात आला आहे. ४० हजार रुपये दिले जात असल्याने अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

कारवाई करणारेच थांबले, मग नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन कोण करणार?

आव्हाणे, खेडी, फुपनगरी या भागातून गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने या भागातील भूजलात मोठी घट झाली आहे. केळीसाठी हा पूर्ण गिरणा काठचा परिसर ओळखला जातो. मात्र, अवैध वाळू उपसामुळे या भागातील भूजल पातळीत घट झाल्यामुळे उन्हाळ्यात या भागातील ट्यूबवेल्समधील पाणी आटले जात आहे. यासह गिरणा पात्रात आता खडकदेखील दिसू लागला आहे. यासह पात्रात, वेडी बाभूळ या वनस्पतीदेखील वाढत असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीचे पात्र कमी होत असल्याने नदीपात्रातच अनेकांनी जमिनी बळकाविल्या असून, त्याठिकाणी अनधिकृतपणे शेती केली जात आहे. अतिक्रमण, वाळू उपसा, गिरणेत येणारे सांडपाणी यामुळे गिरणा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यातच हा उपसा रोखण्यासाठी जबाबदारी असलेल्या महसूल प्रशासनाचीच वाळूमाफियांसोबत मिलीभगत असल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास थांबविणार तरी कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

---