शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सांडपाण्यामुळे गिरणा नदीचा झाला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 04:06 IST

जलप्रदूषणामुळे जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर; मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून कागदावरच

- अजय पाटील जळगाव : संपूर्ण जळगाव शहरातील सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने ते थेट तीन नाल्यांद्वारे गिरणा नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून मंजूर असून, हा प्रकल्प सुरू व्हायला चार ते पाच वर्षांचा काळ लागणार आहे. तोपर्यंत नदीचा नाला असाच वाहता राहणार आहे.

जळगाव शहराला एका दिवसात जवळपास १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. त्यातून निम्मे पाणी हे सांडपाण्याच्या माध्यमातून गटारीत सोडले जाते. लेंडी, दवंड्या व गुंजारी या तीन नाल्यांद्वारे हे सर्व सांडपाणी थेट गिरणेच्या पात्रात जाते. आधीच बेसुमार वाळू उपसा सुरू असताना या सांडपाण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणीही गिरणेत जात आहे. शिवाय आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणीही गिरणेतच जाते. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना पर्यावरणवादी संघटनांचे. नदीकाठच्या गावकऱ्यांनाही या प्रश्नाचे देणेघेणे राहिले नाही. जलप्रदूषणामुळे देशी-विदेशी पक्ष्यांची जत्रा भरणाºया गिरणा काठावर आता पक्ष्यांचे थवे दिसेनासे झाले आहेत.

पाच प्रकारचे मासे गिरणा नदीत सापडायची. यातील एक-दोन प्रजातीच शिल्लक असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. शहराचे वैभव समजल्या जाणाºया मेहरूण तलावाचे सुुशोभीकरण होत असताना, परिसरातील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात आहे.कधीकाळी आकाशाच्या प्रतिबिंबाने निळेशार दिसणारे तलावाचे पाणी या सांडपाण्यामुळे काळेशार झाले आहे. ६२ हेक्टरमध्ये पसरलेल्या आणि एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या तलावाची आज वाईट अवस्था आहे.

वाघांच्या अधिवासाचा साक्षीदार असलेला या तलावाच्या परिसरातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे. पंधरा ते वीस सापांच्या प्रजातींचा अधिवास असलेल्या क्षेत्रात आज सात प्रजाती आढळून येतात़ ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध कीटक सापडतात. मात्र, जलप्रदूषणामुळे हे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या तलावाच्या सुशोभिकरणापेक्षा शुध्दीकरणाची गरज असल्याचे मत भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

केळीचे क्षेत्र धोक्यात

या परिसरात जवळपास ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. बेसुमार वाळू उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनच गिरणा पट्ट्यातील बोअरवेल्स आटतात. त्यामुळे केळीसाठी ओळखल्या जाणाºया सावखेडा ते पळसोदपर्यंतच्या भागातील केळीचे उत्पादन कमी होत आहे.

सांडपाण्यात विषारी बॅक्टेरिया असतात. नद्यांमध्ये हे पाणी मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. कंपन्यांमधील विषारी रसायन पाण्यात सोडल्यामुळे नदीमधील जीव जंतू व मासे मरण्याची शक्यता असते.- डॉ. एस. टी. इंगळे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख,

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

शहरासाठी मलनिस्सारण योजना मंजूर झाली आहे. काही वर्षांनंतर गिरणेत शहराचे सांडपाणी न जाता त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी त्या पाण्याचा वापर केला जाईल. ही योेजना पूर्ण होत नाही तोपर्यंत गिरणेत जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल का, यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे.- डॉ. उदय टेकाळे, आयुक्त, महापालिका, जळगाव

आरोग्यालाही धोका

गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा, आमोदा ते गाढोदा अशा ४० कि.मी.च्या गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील आव्हाणे, आव्हाणी, भोकणी या गावांमध्ये प्रत्येक वर्षी अतीसाराची साथ वाढते आहे.

सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाणार

शहरासाठी अमृत अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५० कि.मी.चे, तर दुसºया टप्प्यात २५० कि.मी.चे काम होणार आहे. या कामाला किमान चार ते पाच वर्षे लागणार आहेत. या प्रकल्पात सर्व सांडपाण्यावरप्रक्रिया होऊन ते शेतीसाठी वापरले जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावpollutionप्रदूषणWaterपाणी