शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 08:44 IST

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे.

मुंबई/जळगाव - मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाच्या शुभारंभाचा कार्यक्रम पाडला. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील खेडी येथे उभारण्यात येणार असलेल्या भव्य 'वारकरी भवना'चे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. उत्तरम महाराष्ट्रातील हे पहिलेच एवढे मोठे वारकरी भवन असून पंढरीच्या वारीसाठी विठु-माऊलीच्या दर्शनाची आस घेऊन वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या भवनच्या माध्यमातून हक्काचं निवासस्थान उपलब्ध होत आहे.

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा असून तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, त्यातील किर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मंरण करुन समाज प्रबोधनाचे काम करत आहे. उत्तर महाराष्ट्रात ५५ एकरावर हे पहिलेच 'वारकरी भवन' उभारले जात असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६ कोटी ६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे वारकरी भवन पूर्ण होईपर्यंत त्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.      पंढरपुरचा विकास होत असतांना राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतुद केल्याची माहितीही यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिली. 

दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला मोठी गर्दी होत असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्तजण पंढरपुरात दाखल होतात. लाखोंच्या संख्येने हे वारकरी पायी वारी करत इथे पोहोचतात. वाटेत अनेक ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. तर, अनेक मानाच्या पालख्या घेऊनही वारकरी संस्था पंढरीकडे येत असतात. जळगावमधून संत मुक्ताबाईंची पालखी हजारो वारकरी भक्तांच्या सोबतीने पंढरीत येत असते. आता, याच जळगाव जिल्ह्यातील खेडमध्ये उभारण्यात येत असलेले हे वारकरी भवन भक्तांसाठी उत्तम सोय म्हणून सेवेत दाखल होईल.  

 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावvarkariवारकरीPandharpurपंढरपूर