शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘वरखेडे लोंढे’ला ५२६ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 19:07 IST

खर्चात २९० कोटींची वाढ

ठळक मुद्देकेंद्राच्या बळीराजा जल संजीवनी योजनेत जिल्ह्यातील दोन प्रकल्प ३१ गावांच्या ७५४२ हेक्टरचे सिंचनडिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करणार

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावापासून दीड किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित ‘वरखेडे लोंढे’ (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात २९०.६३ कोटींनी वाढ करीत एकूण ५२६ कोटी ६४ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीने दोन दिवसांपूर्वीच दिली असून त्याआधारे सोमवारी, केंद्रीय जल आयोगाने या प्रकल्पाला तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली.३१ गावांच्या ७५४२ हेक्टरचे सिंचनचाळीसगाव शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित या प्रकल्पात एकूण ३५.३८ दलघमी (१.२६ टीएमसी) पाणी होणार आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील २० गावांचे ५१०० हेक्टर व भडगाव तालुक्यातील ११ गावांचे २४४२ हेक्टर असे एकूण ३१ गावांचे ७५४२ हेक्टर सिंचन क्षेत्र ३८ किमी लांबीच्या कालव्याद्वारे सिंचीत होणार आहे.१९९९ पासून रखडलाय प्रकल्पया प्रकल्पाला १९९७-९८च्या दरसुचीनुसार ७५.६४ कोटींच्या खर्चासह मूळ प्रशासकीय मान्यता १ मार्च १९९९ रोजी देण्यात आली होती. त्यानंतर २००७-०८ च्या दरसुचीनुसार या खर्चात वाढ होऊन २३६.०२ कोटी झाली. त्यास प्रथम सुधारीत मान्यता १८ फेब्रुवारी २००९ रोजी देण्यात आली. मात्र भूसंपादनापासून सर्वच काम रखडल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे २०१४-१५ च्या दरसुचीनुसार आता त्यात सुमारे २९०.६३ कोटींच्या वाढीसह ५२६.६४ कोटीच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जलसंपदामंत्र्यांचा पुढाकारअनेक वर्षांपासून रखडलेला वरखेडे लोंढे तसेच शेळगाव बॅरेज हे दोन प्रकल्प डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरू ठेवले आहेत. त्यामुळेच ९ मार्च २०१८ रोजी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या उपस्थितीत झालेल्या शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत गिरीश महाजन यांनी या धरणाच्या सुधारीत प्रशासकीय मंजुरीचा विषय लावून मंजुरी मिळवल्याचे समजते.केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदीलराज्य शासनाची सुधारीत प्रशासकीय मंजुरी मिळताच तातडीने सोमवार, १२ मार्च रोजी केंद्रीय जलआयोगाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. त्यात आयोगाने या प्रकल्पाना तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली आहे.डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करणारया प्रकल्पासाठी कोणतेही पुनर्वसन नाही. मुख्य धरणाचे कामे २०१३ पासून सुरू आहे. त्यात डाव्या तिरावरील मातीकाम ७० टक्के पूर्ण झाले असून उजव्या तीराचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे काम सुरू असून या प्रकल्पावर आॅक्टोबर २०१७ अखेर ६९.९४ कोटी रूपये खर्च झाला आहे. आता या प्रकल्पाचे उर्वरीत काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.----------बळीराजा जल संजीवनी योजनेत जिल्ह्यातील दोन प्रकल्पकेंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत जिल्ह्यातील वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेज या दोन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आता केंद्राचा किमान २५ टक्के निधी मिळू शकतो. त्यामुळे या धरणांचे काम तातडीने मार्गी लागणार आहे.