शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

‘वरखेडे लोंढे’ला ५२६ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 19:07 IST

खर्चात २९० कोटींची वाढ

ठळक मुद्देकेंद्राच्या बळीराजा जल संजीवनी योजनेत जिल्ह्यातील दोन प्रकल्प ३१ गावांच्या ७५४२ हेक्टरचे सिंचनडिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करणार

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावापासून दीड किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित ‘वरखेडे लोंढे’ (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात २९०.६३ कोटींनी वाढ करीत एकूण ५२६ कोटी ६४ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीने दोन दिवसांपूर्वीच दिली असून त्याआधारे सोमवारी, केंद्रीय जल आयोगाने या प्रकल्पाला तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली.३१ गावांच्या ७५४२ हेक्टरचे सिंचनचाळीसगाव शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर गिरणा नदीवर प्रस्तावित या प्रकल्पात एकूण ३५.३८ दलघमी (१.२६ टीएमसी) पाणी होणार आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील २० गावांचे ५१०० हेक्टर व भडगाव तालुक्यातील ११ गावांचे २४४२ हेक्टर असे एकूण ३१ गावांचे ७५४२ हेक्टर सिंचन क्षेत्र ३८ किमी लांबीच्या कालव्याद्वारे सिंचीत होणार आहे.१९९९ पासून रखडलाय प्रकल्पया प्रकल्पाला १९९७-९८च्या दरसुचीनुसार ७५.६४ कोटींच्या खर्चासह मूळ प्रशासकीय मान्यता १ मार्च १९९९ रोजी देण्यात आली होती. त्यानंतर २००७-०८ च्या दरसुचीनुसार या खर्चात वाढ होऊन २३६.०२ कोटी झाली. त्यास प्रथम सुधारीत मान्यता १८ फेब्रुवारी २००९ रोजी देण्यात आली. मात्र भूसंपादनापासून सर्वच काम रखडल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे २०१४-१५ च्या दरसुचीनुसार आता त्यात सुमारे २९०.६३ कोटींच्या वाढीसह ५२६.६४ कोटीच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जलसंपदामंत्र्यांचा पुढाकारअनेक वर्षांपासून रखडलेला वरखेडे लोंढे तसेच शेळगाव बॅरेज हे दोन प्रकल्प डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरू ठेवले आहेत. त्यामुळेच ९ मार्च २०१८ रोजी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या उपस्थितीत झालेल्या शासनाच्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत गिरीश महाजन यांनी या धरणाच्या सुधारीत प्रशासकीय मंजुरीचा विषय लावून मंजुरी मिळवल्याचे समजते.केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदीलराज्य शासनाची सुधारीत प्रशासकीय मंजुरी मिळताच तातडीने सोमवार, १२ मार्च रोजी केंद्रीय जलआयोगाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. त्यात आयोगाने या प्रकल्पाना तांत्रीक व आर्थिक मंजुरी (टेक्नीकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिकल क्लिअरन्स) दिली आहे.डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करणारया प्रकल्पासाठी कोणतेही पुनर्वसन नाही. मुख्य धरणाचे कामे २०१३ पासून सुरू आहे. त्यात डाव्या तिरावरील मातीकाम ७० टक्के पूर्ण झाले असून उजव्या तीराचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे काम सुरू असून या प्रकल्पावर आॅक्टोबर २०१७ अखेर ६९.९४ कोटी रूपये खर्च झाला आहे. आता या प्रकल्पाचे उर्वरीत काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.----------बळीराजा जल संजीवनी योजनेत जिल्ह्यातील दोन प्रकल्पकेंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत जिल्ह्यातील वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेज या दोन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आता केंद्राचा किमान २५ टक्के निधी मिळू शकतो. त्यामुळे या धरणांचे काम तातडीने मार्गी लागणार आहे.