शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

By अमित महाबळ | Updated: March 27, 2023 18:55 IST

पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे.

अमित महाबळ

जळगाव : पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे. ते युरोपचे युद्ध आहे. हे सत्य सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ब्रिगेडीअर संजय अग्रवाल यांनी केले. ते ‘लोकमत’शी बोलत होते.

युद्ध सुरू झाले तेव्हा त्यामध्ये आफ्रिकेतील ५४ देशांचा समावेश नव्हता. नंतर दबाव टाकला गेला. दक्षिण अमेरिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देश युद्धात नाहीत. त्यामुळे याला जागतिक महायुद्ध म्हणता येत नाही. हे युद्ध किती लांबेल हे स्पष्टपणे कुणी सांगू शकत नाही. रशिया एवढा मजबूत आहे तो पराभूत होऊ शकत नाही आणि अमेरिका व नाटो यांचा पाठिंबा असलेला युक्रेन इतका कमकुवत आहे की, तो जिंकू शकत नाही. दोन्ही बाजूने तयारीने युद्धात उतरल्या आहेत.

अमेरिका व पाश्चात्य देश चर्चा किंवा तहाद्वारे मागे हटले तर नंतर चीनदेखील दादागिरी करू लागेल. हे अमेरिका जाणून आहे. युक्रेन नाटोमध्ये येणार नाही हे त्यांनी सांगितले तर युद्ध लागलीच संपेल; पण हे होणार नाही. रशिया व अमेरिकेतील युद्धाची ‘युद्धभूमी’ युक्रेन आहे. युक्रेन केवळ एक प्यादा आहे. रशियाला आर्थिकदृष्ट्या संपविणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.

म्हणून युद्ध लांबणार...

अमेरिका व पाश्चात्य देशांचा अंदाज होता की, निर्बंधाद्वारे रशियाचे आर्थिक कंबरडे मोडता येईल; पण रशिया २०१४ पासून तयारी करत आहे. निर्बंधांचा त्यांच्यावर परिणाम झाला; पण हा देश आर्थिकदृष्ट्या कोलमडला नाही. अमेरिका व पाश्चात्य देशांची लवकर विजय मिळविण्याची रणनीती चुकली आहे. रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर ते अण्वस्त्रे वापरू शकतात.

एमआयसीला युद्ध होण्यात रस

अमेरिकेचा प्रमुख शत्रू चीन आहे; पण राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे लक्ष चुकीच्या दिशेने वळविण्यात आले. अमेरिकेत मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स (एमआयसी) आहे. त्यांना जगात युद्ध होण्यात स्वारस्य असते. त्यांची शस्त्रास्त्रे विकली जातात, नफा होतो. रशिया चीनची मदत घेत आहे. त्यांच्यातही काही मुद्यांवर मतभेद आहेत; पण या दोघांचाही मोठा शत्रू अमेरिका आहे. त्याच्या विरुद्ध हे देश एकत्र आले. भारत आपली शक्ती, प्रभाव वाढवत आहे. कोणा एकाच्या बाजूने झुकण्यापेक्षा स्वत:चे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. जगात भारताच्या मताला महत्त्व प्राप्त होत आहे.

पाकिस्तानचे काय?

पाकिस्तानात सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या नाजूक परिस्थिती आहे. पाकिस्तानचे तुकडे झाले तर त्यांच्याकडे १५० अण्वस्त्रे आहेत, ती शस्त्रे अयोग्य हातात पडावीत हे जगाला मंजूर नाही. म्हणून परिस्थिती असली तरी पाकिस्तान तुटणार नाही. चीन आपल्या कॉलनी बनविण्यासाठी पाकिस्तानला तुटू देणार नाही. कर्जे देऊन आधीच दबावात घेतले आहे. अमेरिकेला अण्वस्त्रांची भीती आहे. अमेरिका चीनविरोधासाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहे; पण पाकिस्तानात सरकारविरोधात बलूच नाराज आहेत. यामध्ये भारताला विशेष काही करण्याची गरज नाही. पाकिस्तान आपल्या विनाशाकडे स्वत:हून पुढे सरकत आहे. पाकिस्तानी जनता त्यांच्या सरकारमुळे त्रासलेली आहे. त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत. भारताने त्यामध्ये हस्तक्षेप करू नयेत.